शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: कृषी विद्यापीठ गेटवर होणार उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:27 IST

शहरातील रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या विद्यापीठ गेटजवळ उड्डाणपूल बनविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची वाहनधारकांची समस्या सुटण्याचा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या विद्यापीठ गेटजवळ उड्डाणपूल बनविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची वाहनधारकांची समस्या सुटण्याचा आशेचा किरण निर्माण झाला आहे.परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून रेल्वेमार्ग गेला आहे. नांदेडकडे जाणाऱ्या या मार्गावर रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. परभणी रेल्वेस्थानकावर दररोज येणाऱ्या ४० आणि जाणाºया ४० अशा ८० रेल्वेगाड्यांचा प्रवास या मार्गावरुन होतो. शहराच्या ऐन मध्यवस्तीत रेल्वेमार्ग असल्याने रेल्वेवाहतुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जाणाºया दोन मार्गावर रेल्वेगेट असून रेल्वेस्थानकाला लागूनच असलेले गेट विद्यापीठ गेट म्हणून ओळखले जाते. कृषी विद्यापीठ परिसरामध्ये दररोज हजारो नागरिक दाखल होतात. त्यामध्ये कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी विद्यापीठात कंत्राटी तत्वावर काम करणारे शेतमजूर, कारागीर आणि या विद्यापीठात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठ परिसरामध्ये नागपूर येथील पशू विज्ञान विद्यापीठाचे पशूवैद्यकीय महाविद्यालय असून या महाविद्यालयातील अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थ्यांनाही रेल्वेरुळ ओलांडून विद्यापीठ गाठावे लागते. याशिवाय विद्यापीठाच्या पलीकडील बाजुस असलेल्या चार ते पाच खेड्यांमधून शहरात येणाºया ग्रामस्थांनाही रेल्वेगेट ओलांडूनच यावे लागते.रेल्वेगेट ओलांडून दररोज हजारो वाहनधारक प्रवास करतात. या वाहनधारकांना रेल्वेगेटवर अनेक वेळा ताटकळत उभे रहावे लागते. रेल्वे येण्याच्या जाण्याच्या वेळेमध्ये किमान १५ मिनिटे रेल्वेगेट बंद राहते. त्यामुळे २४ तासांमध्ये तब्बल १० तास हे रेल्वेगेट बंद राहते.या रेल्वेगेटचा होणारा त्रास लक्षात घेऊन या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात होती. रेल्वे विभागाने या मागणीची दखल घेऊन नुकताच उड्डाणपुलाचा प्रस्ताव रेल्वेबोर्डाकडे पाठविला आहे. प्राथमिकस्तरावर उड्डाणपुलाचे डिझायनिंग तयार करुन रेल्वेच्या हद्दीत हा उड्डापूल उभारण्यासाठी किमान २५ कोटी रुपये लागतील, असा अंदाजही प्रस्तावात नमूद केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसली तरी येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाची उभारणी होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.मातीच्या तपासणीला सुरुवात४उड्डाणपूल उभारण्यासाठी सर्वप्रथम या भागातील मातीची तपासणी केली जाते. प्रस्तावित उड्डाणपूल परिसरात कोणत्या स्वरुपाची माती आहे, खडक किती फुटावर आहे आणि किती खोलीपर्यंत पुलाचे बांधकाम घ्यावे लागेल, याचा अंदाज या तपासणीवरुन बांधला जातो. आठवडाभरापासून या परिसरात बोअर मशीनच्या सहाय्याने ही तपासणी केली जात आहे. विद्यापीठ भागात दोन ठिकाणी आणि अक्षदा मंगल कार्यालयाच्या बाजुने चार ठिकाणी बोअर पाडून तपासणी सुरु असल्याचे दिसून आले.उड्डाणपूल उभारण्यापूर्वी मातीचा दर्जा तपासला जातो. त्यानंतरच प्रत्यक्ष पुलाचा आराखडा तयार करुन त्याचाही प्रस्ताव रेल्वे विभागाला सादर केला जातो. त्यामुळे ही तपासणी महत्त्वपूर्ण असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :parabhaniपरभणीTrafficवाहतूक कोंडीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ