शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

परभणी : मोंढा बाजारात आर्थिक उलाढालीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:07 IST

पावसाळ्यातील एक नक्षत्र संपल्यानंतर मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने येथील बाजार समितीत कृषी निविष्ठांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बळीराजा पावसाच्या तर व्यापारी बळीराजाच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाळ्यातील एक नक्षत्र संपल्यानंतर मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने येथील बाजार समितीत कृषी निविष्ठांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बळीराजा पावसाच्या तर व्यापारी बळीराजाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन महत्त्वपूर्ण हंगाम असून खरीप हंगामात जिल्हाभरात ७० ते ८० कोटी रुपयांची उलाढाल होते. वर्षभरापासून जिल्ह्यातील कृषी बाजारपेठ ठप्प आहे. या पावसाळ्यात खरीप हंगामासाठी व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे. महिनाभरापासूनच कोट्यवधी रुपयांचा माल परभणीच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. खत, बियाणे, कीटकनाशके मूबलक प्रमाणात व्यापाऱ्यांनी उपलब्ध केले असले तरी अजूनही शेतकरी बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाला नाही. यावर्षी ८ जूनपासून पावसाळ्याला प्रारंभ झाला असला तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता लागली आहे. मोठा पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतील; परंतु, दररोज आभाळ भरुन येत असून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सर्वच दुकानांमध्ये शांतता दिसून आली. खरेदी- विक्री होत नसल्याने व्यापारी, मजूर मंडळी हातावर हात देऊन बसून आहेत. बाजार समिती भागात सुमारे १२५ कृषी निविष्ठा विक्रेते असून त्यातील ३० दुकानांतून खतांची विक्री होते. तर उर्वरित दुकानांतून बियाणे आणि कीटकनाशके विक्री केली जाते. पाऊस पडल्यानंतरच या दुकानांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरु होईल, असे चित्र आहे.सध्या तरी परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या नव्या मोंढ्या शुकशुकाट दिसून आला़ शेतकरी बाजारपेठेत येत असले तरी केवळ बियाणे आणि खतांचे दरांबाबत विचारपूस केली जात आहे़ प्रत्यक्षात खरेदी मात्र होत नाही़ त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या कृषी निविष्टा सध्या तरी दुकानांमध्ये पडून आहेत़ मान्सूनच्या पावसानंतरच प्रत्यक्षात उलाढाल वाढणार आहे़सोयाबीनसह इतर कृषी निविष्ठाची विक्री ठप्पकापूस आणि खताची विक्री काही प्रमाणात झाली असली तरी सोयाबीनची विक्री मात्र ठप्प आहे. कापूस आणि सोयाबीन हे दोन जिल्ह्यातील दोन नगदी पिके असून या पिकांची उलाढालच सर्वाधिक होते. पाऊस नसल्याने ही उलाढाल ठप्प आहे. पाऊस आणखी लांबला तर तूर आणि मुगाचे बियाणे विक्री होतात की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. एकंदर जिल्ह्यातील कृषी बाजारपेठेत शुकशुकाट असून पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकºयांना लागली आहे.२ लाख पाकिटे कापूस बियाणांची विक्रीच्जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस झाला नसला तरी काही भागात पूर्व मान्सून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसावर शेतकºयांनी धूळ पेरणी करण्याचा धोका पत्कारला आहे.च्मागील वर्षी ज्या शेतकºयांनी धूळ पेरणी केली होती, अशा शेतकºयांच्या कापसाला चांगला उतारा आल्याने अनेक शेतकºयांनी यावर्षी देखील धूळ पेरणी केली आहे. जिल्ह्यात साधारणत: ५ लाख कापूस पाकिटांची खरीप हंगामामध्ये विक्री होते.च्यावर्षी सर्व साधारणपणे २ लाख कापूस पाकिटांची विक्री झाली असून त्यातून सरासरी ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेते रमेशराव देशमुख यांनी दिली.४० टक्के खताची विक्रीच्येथील बाजार समिती परिसरात बियाणे, कीटकनाशकांची विक्री झाली नसली तरी श्ोतकºयांनी खत मात्र खरेदी केला आहे.च्बाजार समिती परिसरात उपलब्ध असलेल्या खतांपैकी सुमारे ४० ते ५० टक्के खत विक्री झाला आहे. त्यातून साधारणत: ३० कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारFarmerशेतकरी