शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

परभणी : नव महाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्या- आदित्य ठाकरे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:43 IST

नव महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाच आहे आणि तो घेण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त परभणीत आलो आहे. त्यामुळे नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: नव महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाच आहे आणि तो घेण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त परभणीत आलो आहे. त्यामुळे नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.शिवसेनेच्या वतीने आयोजित जनआशीर्वाद यात्रेनिमित्त शनिवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जिंतूर रस्त्यावर नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, चंद्रकांत खैरे, सचिन आहेर, खा. संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, अर्जुन सामाले, गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, सखूबाई लटपटे, अंबिका डहाळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेने मला आशीर्वाद द्यावेत. यासाठी हा दौरा आहे. राजकारणाशी या जनआशीर्वाद यात्रेचा कोणताही संबंध नाही. परभणीकरांचे प्रेम खूप मोठे आहे. परभणी शहराला विकसित बनविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. नव महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात परभणीपासूनच सुरु करण्यात येणार आहे. अडचणीच्या काळात शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे. पीक विमा किंवा पाण्याचा प्रश्न किंवा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला आहे. यापुढेही तो कायम आहे. माझ्या नव्हे तर तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी तरुणांसह वयोवृद्धांनी मला आशीर्वाद द्यावेत, असे ते म्हणाले.यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांनी अवघा महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांना नवे नेतृत्व म्हणून पाहत आहे. मराठी मुलांना नवीन तंत्रज्ञान मिळाले पाहिजे, यासाठी आदित्य ठाकरे पुढाकार घेत आहेत. या रोजगार मेळाव्यातून ७ हजार ५०० तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाईल, असेही आ.डॉ.पाटील यांनी प्रस्ताविकात म्हटले. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.यशस्वीतेसाठी शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.दीड हजार दिव्यांगांना साहित्य वाटप४ंआ.डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने आयोजित रोजगार महामेळाव्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील दीड हजार दिव्यांगाना श्रवणयंत्र, ब्रेल मोबाईल,स्वयंचलित स्काय सायकल, कृत्रिम अवयव आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे दिव्यांगाच्या चेहºयावर समाधान होते.४दुष्काळावर मात करण्यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून वृक्ष क्रांती अभियानाचे उद्घाटही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानांतर्गत शहरात ५० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. या वृक्षांचे संवर्धनही शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र