शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

परभणी : नव महाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्या- आदित्य ठाकरे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:43 IST

नव महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाच आहे आणि तो घेण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त परभणीत आलो आहे. त्यामुळे नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: नव महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाच आहे आणि तो घेण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त परभणीत आलो आहे. त्यामुळे नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.शिवसेनेच्या वतीने आयोजित जनआशीर्वाद यात्रेनिमित्त शनिवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जिंतूर रस्त्यावर नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, चंद्रकांत खैरे, सचिन आहेर, खा. संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, अर्जुन सामाले, गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, सखूबाई लटपटे, अंबिका डहाळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेने मला आशीर्वाद द्यावेत. यासाठी हा दौरा आहे. राजकारणाशी या जनआशीर्वाद यात्रेचा कोणताही संबंध नाही. परभणीकरांचे प्रेम खूप मोठे आहे. परभणी शहराला विकसित बनविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. नव महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात परभणीपासूनच सुरु करण्यात येणार आहे. अडचणीच्या काळात शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे. पीक विमा किंवा पाण्याचा प्रश्न किंवा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला आहे. यापुढेही तो कायम आहे. माझ्या नव्हे तर तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी तरुणांसह वयोवृद्धांनी मला आशीर्वाद द्यावेत, असे ते म्हणाले.यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांनी अवघा महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांना नवे नेतृत्व म्हणून पाहत आहे. मराठी मुलांना नवीन तंत्रज्ञान मिळाले पाहिजे, यासाठी आदित्य ठाकरे पुढाकार घेत आहेत. या रोजगार मेळाव्यातून ७ हजार ५०० तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाईल, असेही आ.डॉ.पाटील यांनी प्रस्ताविकात म्हटले. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.यशस्वीतेसाठी शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.दीड हजार दिव्यांगांना साहित्य वाटप४ंआ.डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने आयोजित रोजगार महामेळाव्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील दीड हजार दिव्यांगाना श्रवणयंत्र, ब्रेल मोबाईल,स्वयंचलित स्काय सायकल, कृत्रिम अवयव आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे दिव्यांगाच्या चेहºयावर समाधान होते.४दुष्काळावर मात करण्यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून वृक्ष क्रांती अभियानाचे उद्घाटही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानांतर्गत शहरात ५० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. या वृक्षांचे संवर्धनही शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र