शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : घरकुल लाभार्थ्यांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:30 IST

पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले असून, नव्याने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनीही कामे सुरू केली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले असून, नव्याने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनीही कामे सुरू केली आहेत़केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेंतर्गत तालुक्यासह शहरातील लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली़ त्यासाठीची पंचायत समिती प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण करून संबंधित लाभार्थ्यांना पैसाही उपलब्ध करून दिला; परंतु, घरकुलाची ही बांधकामे करण्यासाठी लाभार्थ्यांकडे वाळू उपलब्ध होत नव्हती़ तालुक्यातील एकाही वाळू धक्क्याचा लिलाव झाला नव्हता़ त्यातच बाजारातील वाळू विकत घ्यायची असेल तर ३ ब्राससाठी जवळपास २० हजार रुपये मोजावे लागत होते़ त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना बाजारातील वाळू विकत घेऊन घरकुलाची उभारणी करणे अशक्य होते़ त्यामुळे मानवत शहरातील लाभार्थ्यांनी पंचायत समिती, तहसील प्रशासनाची भेट घेऊन घरकुलाच्या बांधकामासाठी शासकीय भावात वाळू उपलब्ध करून द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला़ परंतु, लाभार्थ्यांना वेळेवर वाळू काही मिळाली नाही़ परिणामी पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजनेतील मंजूर झालेली घरकुलांची कामे ठप्प पडली होती़रमाई घरकुल योजनेंतर्गत मानवत शहरातील आंबेडकर नगर, बुद्धनगर यासह विविध ठिकाणी लाभार्थ्यांची घरकुलांची कामे सुरू आहेत़ बांधकाम अर्ध्यापर्यंत आल्यानंतर वाळूची आवश्यकता भासू लागली़ मात्र लिलावाची प्रक्रिया सुरू नसल्याने वाळूची टंचाई निर्माण झाली होती़अवैधरीत्या साठून ठेवणाºया वाळूची अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू केल्याने गोरगरीब लाभार्थ्यांना या दराने वाळू घेणे परवडत नव्हते़ तालुक्यातील वांगी आणि कुंभारी येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाल्याने मुबलक वाळू उपलब्ध होत आहे़सद्यस्थितीत ३ ब्रास वाळूसाठी १२ हजार रुपये किंमत मोजावी लागत आहे. पूर्वीपेक्षा वाळूचे भाव कमी झाल्याने लाभार्थी वाळूची मागणी करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे़१०२ घरकुलांची कामे सुरू४मानवत नगरपालिकेंतर्गत रमाई घरकुल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ६८ घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी ३४ घरकुलांची कामे सुरू आहेत़ तर दुसºया टप्प्यात १०५ घरकुलांना मंजुरी असून, ६८ घरकुलांची कामे सुरू असल्याची माहिती नगरपालिकेने दिली़ सुरुवातीला ३ ब्रास वाळू २० हजार रुपये अशा सोन्याच्या भावाने गोरगरीब लाभार्थ्यांना घ्यावी लागली़ यामुळे आर्थिक फटका बसला आहे़ सरते शेवटी तालुक्यातील वाळू धक्के सुटल्याने भाव उतरले असून, रमाई घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाsandवाळू