शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

परभणी बाजार समिती;केवळ साडेनऊ हजार शेतकऱ्यांचीच नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:36 IST

शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरु केलेल्या ई-नाम कार्यप्रणालीमध्ये आतापर्यंत केवळ साडेनऊ हजार शेतकºयांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे या कार्यप्रणालीत शेतकºयांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरु केलेल्या ई-नाम कार्यप्रणालीमध्ये आतापर्यंत केवळ साडेनऊ हजार शेतकºयांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे या कार्यप्रणालीत शेतकºयांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत कामकाज केले जाते. व्यापारी आणि शेतकºयांमधील दुवा म्हणून बाजार समित्यांकडे पाहिले जाते. आतापर्यंत बाजार समितीच्या मार्केट यार्डात स्थानिक व्यापाºयांच्या उपस्थितीत लिलाव होऊन शेतमालाची विक्री होत होती. राज्यशासनाने या प्रक्रियेला व्यापक रुप दिले असून आॅनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व बाजार समित्यांचा अंतर्भाव करुन आॅनलाईन मार्केट शेतकºयांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ई-नाम ही कार्यप्रणाली सुरु केली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळांतर्गत ई-नामचे कामकाज चालविले जात आहे. पहिल्याच टप्प्यात परभणी जिल्ह्यातील परभणी आणि सेलू या दोन बाजार समित्यांचा ई-नाममध्ये समावेश झाला आहे. अधिकाधिक शेतकºयांना आॅनलाईन पद्धतीने शेतमालाला चांगला भाव मिळावा, या उद्देशाने ई-नाम प्रक्रिया राबविली जात असून बाजार समितीअंतर्गत ई-नाम कार्यप्रणालीतूनच काम करणे बंधनकारक केले आहे. त्यात शेतकºयांची नोंद घेणे, व्यापाºयांची नोंदणी करणे, आलेल्या मालाची गेट एंट्री, ई-आॅक्शन, ई-पेमेंट अशी कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष ई-नामच्या कामकाजाला सुरुवात झाली. बाजार समिती परिसरात ई-नामचा स्वतंत्र कक्षही सुरु करण्यात आला आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत साधारणत: ५० हजार शेतकरी बाजार समितीत कृषी मालाची विक्री करतात; परंतु, प्रत्यक्षात केवळ ९ हजार ६६२ शेतकºयांचीच ई-नाममध्ये नोंदणी झाली आहे. शेतकºयांनी ई-नाममध्ये नोंदणी करताना सातबारा, बँक खाते क्रमांक आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. मात्र नोंदणीलाच धिमा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.९८ टक्के शेतमालाचे ई-आॅक्शनपरभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात ५ हजार ६४१ क्विंटल धान्याची ई-नाम प्रणालीत आवक झाली. ई-नाम प्रणालीमध्ये केलेल्या कामकाजाला लगेच शेरा दिला जात आहे. त्यात झालेल्या आवकपैकी २ हजार ४२९ क्विंटल शेतमालाची ईन-गेट एंट्री नोंदविण्यात आली. हे काम ४३ टक्के झाले असून ते साधारण असल्याचा शेरा पणन मंडळाने दिला आहे. तर ईन-गेट एंट्री व ई- आॅक्शनमध्ये ९८ टक्के काम झाले असून या कामास उत्कृष्ट असा शेरा मिळाला आहे. इनगेट एंट्री व प्रयोगशाळा अहवालातही उत्कृष्ट शेरा मिळाला आहे. शेतमालाच्या एका लॉटसाठी तीन बिडस्साठीही उत्कृष्ट शेरा मिळाला आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये बाजार समितीने ४६ टक्के शेतकºयांना ४१ लाख ५७ हजार रुपये ई-पेमेंट केले असून हे काम साधारण असल्याचे पणन मंडळाचे म्हणणे आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीonlineऑनलाइन