शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

परभणी बाजार समिती;केवळ साडेनऊ हजार शेतकऱ्यांचीच नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:36 IST

शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरु केलेल्या ई-नाम कार्यप्रणालीमध्ये आतापर्यंत केवळ साडेनऊ हजार शेतकºयांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे या कार्यप्रणालीत शेतकºयांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरु केलेल्या ई-नाम कार्यप्रणालीमध्ये आतापर्यंत केवळ साडेनऊ हजार शेतकºयांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे या कार्यप्रणालीत शेतकºयांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत कामकाज केले जाते. व्यापारी आणि शेतकºयांमधील दुवा म्हणून बाजार समित्यांकडे पाहिले जाते. आतापर्यंत बाजार समितीच्या मार्केट यार्डात स्थानिक व्यापाºयांच्या उपस्थितीत लिलाव होऊन शेतमालाची विक्री होत होती. राज्यशासनाने या प्रक्रियेला व्यापक रुप दिले असून आॅनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व बाजार समित्यांचा अंतर्भाव करुन आॅनलाईन मार्केट शेतकºयांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ई-नाम ही कार्यप्रणाली सुरु केली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळांतर्गत ई-नामचे कामकाज चालविले जात आहे. पहिल्याच टप्प्यात परभणी जिल्ह्यातील परभणी आणि सेलू या दोन बाजार समित्यांचा ई-नाममध्ये समावेश झाला आहे. अधिकाधिक शेतकºयांना आॅनलाईन पद्धतीने शेतमालाला चांगला भाव मिळावा, या उद्देशाने ई-नाम प्रक्रिया राबविली जात असून बाजार समितीअंतर्गत ई-नाम कार्यप्रणालीतूनच काम करणे बंधनकारक केले आहे. त्यात शेतकºयांची नोंद घेणे, व्यापाºयांची नोंदणी करणे, आलेल्या मालाची गेट एंट्री, ई-आॅक्शन, ई-पेमेंट अशी कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष ई-नामच्या कामकाजाला सुरुवात झाली. बाजार समिती परिसरात ई-नामचा स्वतंत्र कक्षही सुरु करण्यात आला आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत साधारणत: ५० हजार शेतकरी बाजार समितीत कृषी मालाची विक्री करतात; परंतु, प्रत्यक्षात केवळ ९ हजार ६६२ शेतकºयांचीच ई-नाममध्ये नोंदणी झाली आहे. शेतकºयांनी ई-नाममध्ये नोंदणी करताना सातबारा, बँक खाते क्रमांक आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. मात्र नोंदणीलाच धिमा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.९८ टक्के शेतमालाचे ई-आॅक्शनपरभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात ५ हजार ६४१ क्विंटल धान्याची ई-नाम प्रणालीत आवक झाली. ई-नाम प्रणालीमध्ये केलेल्या कामकाजाला लगेच शेरा दिला जात आहे. त्यात झालेल्या आवकपैकी २ हजार ४२९ क्विंटल शेतमालाची ईन-गेट एंट्री नोंदविण्यात आली. हे काम ४३ टक्के झाले असून ते साधारण असल्याचा शेरा पणन मंडळाने दिला आहे. तर ईन-गेट एंट्री व ई- आॅक्शनमध्ये ९८ टक्के काम झाले असून या कामास उत्कृष्ट असा शेरा मिळाला आहे. इनगेट एंट्री व प्रयोगशाळा अहवालातही उत्कृष्ट शेरा मिळाला आहे. शेतमालाच्या एका लॉटसाठी तीन बिडस्साठीही उत्कृष्ट शेरा मिळाला आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये बाजार समितीने ४६ टक्के शेतकºयांना ४१ लाख ५७ हजार रुपये ई-पेमेंट केले असून हे काम साधारण असल्याचे पणन मंडळाचे म्हणणे आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीonlineऑनलाइन