शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाकडे बँकांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:25 IST

तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पालम शहरात राष्ट्रीयकृत बँकांच्या दोन व ग्रामीण भागामध्ये २ शाखा कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी शेतकºयांना नेहमीच कर्ज देताना हात आखडता घेतला जात आहे. मागील वर्षी तर उन्हाळ्यात राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज देऊन प्रताप केला होता.खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकºयांना पेरणीपूर्वक पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. प्रस्ताव दाखल करूनही अधिकाºयांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. तसेच शेतकºयांना पीक कर्ज मागण्यासाठी गेले असता तुच्छतेची वागणूक दिली जात आहे.खरीप हंगामाची लगबग सुरू होऊनही बँकांनी मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसून शेतकºयांना कर्ज देण्याकडे पाठ फिरवलेली आहे. वेळेवर कर्ज दिले जात नसल्याने शेतकºयांना खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत असून मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे.पाऊस पडताच पेरणी करावी लागत असल्याने शेतकºयांनी अगोदरच बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केलेली आहे.पेरणी झाल्यानंतर बँकाचे पीककर्ज घेऊन काय उपयोग? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे. दरवर्षीच पीक कर्ज देताना बँक वेळेचे बंधन न पाळता मनमानी पद्धतीने पीककर्ज वाटप करीत असल्याने पालम तालुक्यातील शेतकºयांना पीक कर्जाचा फारसा उपयोग होत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरी