शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

परभणी: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाकडे बँकांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:25 IST

तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पालम शहरात राष्ट्रीयकृत बँकांच्या दोन व ग्रामीण भागामध्ये २ शाखा कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी शेतकºयांना नेहमीच कर्ज देताना हात आखडता घेतला जात आहे. मागील वर्षी तर उन्हाळ्यात राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज देऊन प्रताप केला होता.खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकºयांना पेरणीपूर्वक पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. प्रस्ताव दाखल करूनही अधिकाºयांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. तसेच शेतकºयांना पीक कर्ज मागण्यासाठी गेले असता तुच्छतेची वागणूक दिली जात आहे.खरीप हंगामाची लगबग सुरू होऊनही बँकांनी मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसून शेतकºयांना कर्ज देण्याकडे पाठ फिरवलेली आहे. वेळेवर कर्ज दिले जात नसल्याने शेतकºयांना खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत असून मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे.पाऊस पडताच पेरणी करावी लागत असल्याने शेतकºयांनी अगोदरच बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केलेली आहे.पेरणी झाल्यानंतर बँकाचे पीककर्ज घेऊन काय उपयोग? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे. दरवर्षीच पीक कर्ज देताना बँक वेळेचे बंधन न पाळता मनमानी पद्धतीने पीककर्ज वाटप करीत असल्याने पालम तालुक्यातील शेतकºयांना पीक कर्जाचा फारसा उपयोग होत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरी