शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

परभणी : पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची होतेय हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:01 IST

तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मागील वर्षभरापासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पशुपालकांना खाजगी दुकानावरून औषधी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मागील वर्षभरापासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पशुपालकांना खाजगी दुकानावरून औषधी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.पालम तालुक्यात पालम शहर, रावराजूर, पेठ शिवणी, बनवस, तांदुळवाडी व चाटोरी या सहा ठिकाणी पशूसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशूधनाला वेळेवर उपचार मिळावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शासनाने हे दवाखाने कार्यरत केलेले आहेत; परंतु, येथील दवाखान्यात गेल्यानंतर औषधींचा तुटवडा असल्याने उपचाराविना जनावरे परतण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. उपचारासाठी लागणारे बँडेज, जखमेवर टाकावयाचे आयोडीन, मिनरल मिक्सर विविध प्रकारच्या लस, औषधींसह जनावरांच्या आजारावर उपचार करणारे इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने दवाखान्यात आलेल्या शेतकºयांचा हिरमोड होत आहे. आजारी पडलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकरी डॉक्टरांशी वाद घालत असल्याचे प्रकार घडतात. वेळप्रसंगी नाईलाजाने शेतकºयांना खाजगी दुकानावर जाऊन औषधी विकत घ्यावी लागत आहे. मागील वर्षभरापासून पशुवैद्यकीय दवाखान्यात महत्त्वाच्या औषधींचा नेहमीच तुटवडा निर्माण होत असून वरिष्ठ अधिकारी याकडे पूर्णत: डोळेझाक करीत आहेत. सध्या सर्वत्र पेरणीचे दिवस चालू असून आजारी पडलेली जनावरे शेतकºयांच्या पेरणीत अडथळा निर्माण करीत असतात. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच ूउपचार होणे गरजेचे आहे.सहा रुग्णालयांवर: ५५ हजार पशुधनाचा भार४पालम तालुक्यात पालम शहर, रावराजूर, पेठ शिवणी, बनवस, तांदुळवाडी व चाटोरी या सहा ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. तालुक्यात ३१ हजार ८०२ बैल, गाय, ९ हजार १७५ म्हैस, १० हजार ७८३ शेळ्या तर ३ हजार ५८५ मेंढ्या आहेत.४ या ५५ हजार पशूधनांचा भार तालुक्यातील सहा पशूवैद्यकीय रुग्णालयावर असला तरी या रुग्णालयात औषधींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. वरिष्ठ विभागाने याकडे लक्ष देऊन या रुग्णालयांना औषधींचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.पालम तालुक्यात सहा पशुवैद्यकीय रुग्णालये असून या ठिकाणी जनावरांवर उपचार करण्यासाठी औषधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे पशुपालक शेतकºयांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन दवाखान्यांमध्ये औषधींचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा.-रत्नाकर शिंदे , उपसभापती पं.स.पालम

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीmedicineऔषधं