शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

परभणी :पुन्हा बोंडअळीची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:23 IST

परभणी आणि सेलू तालुक्यामध्ये कापसावर अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळीची धास्ती घेतली आहे. कापसावर आढळणारी अळी नेमकी कोणती, अशी चर्चा कापूस उत्पादकांमध्ये होत असून शेतकºयांनी बोंडअळीची धास्ती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी आणि सेलू तालुक्यामध्ये कापसावर अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळीची धास्ती घेतली आहे. कापसावर आढळणारी अळी नेमकी कोणती, अशी चर्चा कापूस उत्पादकांमध्ये होत असून शेतकºयांनी बोंडअळीची धास्ती घेतली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादूर्भावाने सर्वचच्या सर्व कापसाचे पीक फस्त झाले होते. शासनाला नुकसान भरपाई देखील द्यावी लागली होती. त्यानंतर यावर्षी कापूस लागवडीकडे शेतकºयांचा कल कमी झाला. असे असले तरी १ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. अनेक भागामध्ये या पिकांवर अळीचा प्रादूर्भाव दिसत आहे. परभणी, सेलू या दोन तालुक्यात हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून कापसावर निघालेली अळी ही बोंडअळीच असल्याची शेतकºयांची धारणा झाली आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणेच यावर्षी नुकसान सहन करावे लागते की काय, अशी भितीही व्यक्त होत आहे. कापसाच्या पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथे १० एकर क्षेत्रावरील कापूस पाळी घालून काढून टाकण्यात आला. कृषी विभागातील अधिकाºयांनीही घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतापासूनच शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.पात्यांमध्येच आढळल्या अळ्यापरभणी आणि सेलू तालुक्यात कापसाच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव आढळत आहे. सध्या या तालुक्यातील कापसाचे पीक हे पाते आणि फुले लागवडीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी कापूस पात्या-फुलांमध्ये आला असून या पात्यांमध्येच अळी निघत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी कापूस पिकाच्या बोंडामधून अळी निघत होती. हे बोंड परिपक्क्व होण्याच्या अवस्थेत असतानाच अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती.४कापसावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण पीक या अळीने नेस्तानाबुत केले होते. मागील वर्षी सारखीच परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी परिणामकारक कीटकनाशकांचा वापर होणे आवश्यक आहे. कापसावर प्रादूर्भाव झालेली ही अळी कोणती, याचा शोध घेऊन कृषी विभागाने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी