शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

परभणी: दोन वर्षानंतरही शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:36 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ २ लाख ३७ हजार ३१ शेतकऱ्यांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाल्याची प्रशासनाची माहिती आहे़ परंतु, नेमक्या कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली? याबाबतचा संभ्रम शेतकºयांमध्ये दोन वर्षानंतरही कायम असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ २ लाख ३७ हजार ३१ शेतकऱ्यांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाल्याची प्रशासनाची माहिती आहे़ परंतु, नेमक्या कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली? याबाबतचा संभ्रम शेतकºयांमध्ये दोन वर्षानंतरही कायम असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे़ २०१५-१६ या खरिप हंगामात बी-बियाणे, खते व औषधांची खरेदी करण्यासाठी शेतकºयांनी बँकेची दारे ठोठावली़ शेतकºयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बँकांनीही मोठ्या प्रमाणात शेतकºयांना पीक कर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती़ मात्र २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षातील खरीप व रबी हंगामात शेतकºयांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला़ या दोन्ही हंगामांतून जे काही उत्पन्न शेतकºयांच्या हाती लागले़ त्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळाला नाही़ त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक संकट अधिकच गंभीर बनले़ त्यामुळे या आर्थिक कोंडीतून जिल्ह्यातील शेतकºयांनी मृत्यूलाही जवळ केले़जिल्ह्यासह राज्यातील शेतकºयांची परिस्थिती पाहून राज्य शासनाने मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंमलात आणली़ या योजनेंतर्गत शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले़ राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिवसरात्र एक करून महा- ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र व आॅनलाईन सेंटरच्या समोर शेतकºयांनी रांगा लावल्या व आपले फॉर्म भरून घेतले़ ही योजना अंमलात आणून दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी या योजनेबाबत समाधानी नाहीत़ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २१ राष्ट्रीयकृत, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती व महाराष्ट्र ग्रामीण या शाखेद्वारे २ लाख ३७ हजार ३१ शेतकºयांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांची कर्जमाफी दिल्याची माहिती आहे़ ज्या शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली आहे व ज्याचे कर्ज माफ झाले आहे त्यांनाही पुसटशी कल्पना बँक प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने दोन वर्षानंतरही राज्य शासनाने सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेबाबत शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे दिसून येत आहे़सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीराज्य शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांतून होत आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांना कर्जातून मुक्त करावे, अशीही मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी