शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

परभणी : ६० वर्षांनी आली लाल परी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 23:55 IST

जिंतूर तालुक्यातील विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी या गावांमध्ये तब्बल ६० वर्षानंतर बससेवा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ.विजय भांबळे यांनी याकामी प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी या गावांमध्ये तब्बल ६० वर्षानंतर बससेवा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ.विजय भांबळे यांनी याकामी प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी ही गावे दुर्गम भागातील असून रस्त्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या गावात बससेवा पोहोचत नव्हती. परिणामी तालुक्याशी संपर्क करताना ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असे. यागावांसाठी बससेवा सुरु करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आ.विजय भांबळे यांच्याकडे केली. गावकऱ्यांचा प्रश्न आ.विजय भांबळे यांनी वरील गावांतील रस्त्यांचे डांबरीकरण करुन घेतले. रस्ते चांगले झाल्यामुळे बससेवा सुरु करण्यातील अडथळे दूर झाले होते. त्यामुळे बससेवेसाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यासही यश आले. जिंतूर ते विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी, मांडवा, इटोली, अशी बससेवा सुरु करण्यात आली असून २ दिवसांपूर्वी गावात बस पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी या बससेवेचे जोरदार स्वागत केले. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ.विजय भांबळे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, तालुकाध्यक्ष मनोज थिटे, नगरसेवक उस्मान पठाण, शाहेद बेग मिर्झा, शिवाजी जाधव, शंकर गंजे, वाजीद भाई, हबीब शेख, शांतिलाल चोरडिया आदींची उपस्थिती होती.दळणवळण : प्रश्न सुटल्याने समाधान४जिंतूर तालुक्यातील घेवंडा तांडासह अनेक गावे दुर्गभ भागात आहेत. या गावांमध्ये दळणवळणाची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी कसरत करावी लागत होती. खाजगी वाहनांच्या सहाय्याने तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत.४त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बससेवा सुरु नसल्याने आ.विजय भांबळे यांनी हा प्रश्न उचलून धरत आधी रस्त्यांचे डांबरीकरण केले आणि त्यानंतर बससेवा सुरु केली. त्यामुळे ग्रामस्थांनी गैरसोय दूर झाली अहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी