शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

परभणी : निवडणूक आचारसंहितेची प्रशासनाने घेतली धसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:12 IST

राज्याच्या ग्रामविकास विभागाने विकास कामांच्या निविदांचा कालावधी २५ वरून चक्क ७ दिवसांवर आणण्याचा घाईघाईत आदेश काढला असून, आगामी लोकसभा निवडणुकीची धसकी या विभागाने चांगलीच घेतल्याचे दिसून येत आहे़ न्यायालयीन प्रक्रियेंतर्गत असलेल्या कामांबाबत मात्र निर्णय झाला नसल्याने जिल्हास्तरावरील यंत्रणा संभ्रमात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्याच्या ग्रामविकास विभागाने विकास कामांच्या निविदांचा कालावधी २५ वरून चक्क ७ दिवसांवर आणण्याचा घाईघाईत आदेश काढला असून, आगामी लोकसभा निवडणुकीची धसकी या विभागाने चांगलीच घेतल्याचे दिसून येत आहे़ न्यायालयीन प्रक्रियेंतर्गत असलेल्या कामांबाबत मात्र निर्णय झाला नसल्याने जिल्हास्तरावरील यंत्रणा संभ्रमात आहे़देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्च महिन्याच्या प्रारंभी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ त्यामुळे प्रशासकीय स्तरावरून कामांच्या मंजुरीची घाईगर्दी सुरू झाली आहे़ यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली असून, त्या दृष्टीकोणातून आदेशही काढले जाऊ लागले आहेत़ असाच एक आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने १८ जानेवारी रोजी काढला आहे़ यामध्ये ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधीच्या निविदा प्रसिद्ध करण्याबाबत सूचना दिल्या आहेत़ या आदेशानुसार नोव्हेंबर २०१८ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेली कामे, रस्त्याची कामे व पुलाच्या दुरुस्तीची कामे १३ व्या वित्त आयोगामार्फत मंजूर झालेली इतर कामे तसेच लोकहिताची विविध कामे तातडीने व वेळेवर पूर्ण होणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने सदरील कामांची जाहीर निविदा सूचना काढणे, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे व प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करणे ही सर्व प्रक्रिया त्वरेने पूर्ण करण्यासाठी अल्प कालावधीची निविदा प्रसिद्ध करण्याकरीताच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यानुसार ५ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कामांच्या निविदांचा कालावधी पहिल्यावेळी ७ दिवस, दुसऱ्यांदा ४ व तिसºयांदा ३ दिवसांचा करावा, असे आदेशित करण्यात आले आहे़ प्रत्यक्षात २३ सप्टेंबर २०१३ रोजी याच विभागाने काढलेल्या आदेशात हा कालावधी प्रथम ८ दिवसांचा, द्वितीय ५ तर तृतीय ३ दिवसांचा होता़ १८ जानेवारीच्या आदेशानुसार ५ ते ५० लाख रुपयापर्यंतच्या कामांचा कालावधीही अनुक्रमे ७, ५ व ३ दिवसांचा देण्यात आला आहे़ परंतु, २३ सप्टेंबर २०१३ च्या निर्णयानुसार हा कालावधी अनुक्रमे १५, ८ आणि ५ दिवसांचा होता़ म्हणजेच या कामांसाठी ८ दिवसांचा कालावधी कमी करण्यात आला आहे़५० लाखांपेक्षा अधिक कालावधींच्या कामांसाठी २३ सप्टेंबर २०१३ च्या निर्णयानुसार पूर्वी प्रथम कालावधी २५ दिवस, द्वितीय १५ दिवस व तृतीय १० दिवसांचा होता़ आता नव्या आदेशानुसार यामध्ये तब्बल १८ दिवसांचा कालावधी कमी करून तो ७ दिवसांचा करण्यात आला आहे़ शिवाय द्वितीय निविदा कालावधी ५ तर तृतीय निविदा कालावधी ३ दिवसांचाच ठेवण्यात आला आहे़ त्यामुळे या विभागाने आपणच काढलेल्या २३ सप्टेंबर २०१३ च्या आदेशात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बदल केला आहे़विशेष म्हणजे हा आदेश फक्त ३१ मार्च २०१९ पर्यंतच लागू राहणार आहे़ त्यानंतर घटविलेल्या कालावधीची सूचना आपोआप रद्द होवून २३ सप्टेंबर २०१३ आणि २६ जुलै २०१६ च्या तरतुदी पुन्हा लागू होतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे़ त्यामुळे केवळ ७१ दिवसांसाठी हा आदेश लागू राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी प्रत्यक्षात मार्चच्या प्रारंभीच आचारसंहिता लागू होणार आहे़एकदा आचारसंहिता लागू झाली की, निविदा प्रक्रिया बंद होते़ त्यामुळे हा आदेश जवळपास ४१ दिवसच अंमलात असू शकतो़ आचारसंहितेनंतर तो अडगळीत पडेल, असा जानकारांचा कयास आहे़न्यायालयीन प्रकरणांबाबत : चकार शब्द नाहीग्रामविकास विभागाने निविदांचा कालावधी घटविण्याच्या काढलेल्या आदेशात न्यायालयीन प्रकरणांबाबत चकार शब्दाचा उल्लेख केलेला नाही़ त्यामुळे निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने काही प्रकरणे न्यायालयात गेली असतील व त्याचा निकाल उशिराने लागल्यास संबंधित संस्था किंवा व्यक्तीला त्याचा कितपत फायदा होईल, असा सवाल उपस्थित होत आहे़ दप्तर दिरंगाईमुळे निविदा प्रक्रियेला वेळ लागू नये, हा प्रशासनाचा हेतू असला तरी निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सगळा उठाठेव सुरू असल्याचे अप्रत्यक्षरित्या दिसून येत आहे़रस्त्यांसाठी देखील काढला आदेश४ग्रामविकास विभागाने १३ व्या वित्त आयोगाचा निधी, नोव्हेंबर २०१८ च्या अधिवेशनात पुरक मागण्याद्वारे मंजूर झालेली कामे आदींबाबतच्या कामाच्या निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी असाच काहीसा निर्णय मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामाबाबतही घेतला आहे़४यामध्ये ५ लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदांचा कालावधी प्रथम १० दिवस, द्वितीय व तृतीय प्रत्येकी ८ दिवसांचा देण्यात आला आहे़ विशेष म्हणजे हा आदेशही १ एप्रिल २०१९ पासून आपोआप रद्द होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक