शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परभणी : २७ कोटी ३५ लाखांचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:41 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार रुपयांचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार रुपयांचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे़जिल्ह्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला़ त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईच्या झळा मागील वर्षीच्या तुलनेत तेवढ्या तीव्र जाणवणार नसल्या तरी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होवू शकते़ ही शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत़ उन्हाळ्यात पाणी पातळी खालावणे, सार्वजनिक हातपंप, विहिरींचे पाणी आटणे आणि प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होवून टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते़ अशा वेळी जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी संभाव्य कृती आराखडा तयार केला जातो़ यावर्षीही जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या अहवालावरुन संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ हा आराखडा जानेवारी ते जून २०२० याप्रमाणे ६ महिन्यांचा करण्यात आला आहे़ त्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर त्यासाठी एकूण ७८६ योजना तयार करण्यात आल्या आहेत़ त्यावर साधारणत: १५ कोटी ७ लाख ९० हजार रुपयांचा खर्च होईल, असे प्रशासनाला अपेक्षित आहे़एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ४७२ योजनांची आखणी केली असून, त्यावर १२ कोटी २८ लाख ७ हजार रुपये खर्च होण्याचे अपेक्षित धरले आहे़ जिल्हा प्रशासनाने हा कृती आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे़ सद्यस्थितीला जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवलेली नाही़ मात्र भविष्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते, अशा वेळी या कृती आराखड्यातून टंचाईची कामे केली जाणार आहेत़जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक तरतूद४जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा आराखडा तयार करताना तालुकानिहाय आढावा घेतला आहे़ त्यात जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक ४ कोटी ८९ लाख १८ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४या तालुक्यातील १६९ गावे आणि २६ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाली तर त्यासाठी १९७ योजनांची आखणी केली आहे़ त्याच प्रमाणे पूर्णा तालुक्यातील १९५ गावे आणि ४ वाड्यांसाठी ४ कोटी १ लाख ८४ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४गंगाखेड तालुक्यातील ११० गावे आणि ५६ वाड्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ९४ हजार, परभणी तालुक्यात १६१ गावे व २४ वाड्यांसाठी ३ कोटी ४१ लाख ४५ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४सेलू तालुक्यातील १२७ गावे आणि ६ वाड्यांसाठी ३ कोटी १९ लाख १८ हजार, पालम तालुक्यातील १०७ गावे आणि ४३ वाड्यांसाठी ३ कोटी १३ लाख १७ हजार, मानवत तालुक्यातील ८१ गावे आणि ३ वाड्यांसाठी १ कोटी ९५ लाख ८२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़४ सोनपेठ तालुक्यातील ७९ गावे आणि १० वाड्यांसाठी १ कोटी ९० लाख ३९ हजार, पाथरी तालुक्यातील ३८ गावे आणि ११ वाड्यांसाठी १ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रशासनस्तरावर उन्हाळ्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसून येते़...या योजना प्रशासन राबविणार४ग्रामीण भागात टंचाई निर्माण झाल्यास नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी कामे केली जाणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी