शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

परभणी : २७ कोटी ३५ लाखांचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:41 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार रुपयांचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार रुपयांचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे़जिल्ह्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला़ त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईच्या झळा मागील वर्षीच्या तुलनेत तेवढ्या तीव्र जाणवणार नसल्या तरी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होवू शकते़ ही शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत़ उन्हाळ्यात पाणी पातळी खालावणे, सार्वजनिक हातपंप, विहिरींचे पाणी आटणे आणि प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होवून टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते़ अशा वेळी जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी संभाव्य कृती आराखडा तयार केला जातो़ यावर्षीही जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या अहवालावरुन संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ हा आराखडा जानेवारी ते जून २०२० याप्रमाणे ६ महिन्यांचा करण्यात आला आहे़ त्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर त्यासाठी एकूण ७८६ योजना तयार करण्यात आल्या आहेत़ त्यावर साधारणत: १५ कोटी ७ लाख ९० हजार रुपयांचा खर्च होईल, असे प्रशासनाला अपेक्षित आहे़एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ४७२ योजनांची आखणी केली असून, त्यावर १२ कोटी २८ लाख ७ हजार रुपये खर्च होण्याचे अपेक्षित धरले आहे़ जिल्हा प्रशासनाने हा कृती आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे़ सद्यस्थितीला जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवलेली नाही़ मात्र भविष्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते, अशा वेळी या कृती आराखड्यातून टंचाईची कामे केली जाणार आहेत़जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक तरतूद४जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा आराखडा तयार करताना तालुकानिहाय आढावा घेतला आहे़ त्यात जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक ४ कोटी ८९ लाख १८ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४या तालुक्यातील १६९ गावे आणि २६ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाली तर त्यासाठी १९७ योजनांची आखणी केली आहे़ त्याच प्रमाणे पूर्णा तालुक्यातील १९५ गावे आणि ४ वाड्यांसाठी ४ कोटी १ लाख ८४ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४गंगाखेड तालुक्यातील ११० गावे आणि ५६ वाड्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ९४ हजार, परभणी तालुक्यात १६१ गावे व २४ वाड्यांसाठी ३ कोटी ४१ लाख ४५ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४सेलू तालुक्यातील १२७ गावे आणि ६ वाड्यांसाठी ३ कोटी १९ लाख १८ हजार, पालम तालुक्यातील १०७ गावे आणि ४३ वाड्यांसाठी ३ कोटी १३ लाख १७ हजार, मानवत तालुक्यातील ८१ गावे आणि ३ वाड्यांसाठी १ कोटी ९५ लाख ८२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़४ सोनपेठ तालुक्यातील ७९ गावे आणि १० वाड्यांसाठी १ कोटी ९० लाख ३९ हजार, पाथरी तालुक्यातील ३८ गावे आणि ११ वाड्यांसाठी १ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रशासनस्तरावर उन्हाळ्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसून येते़...या योजना प्रशासन राबविणार४ग्रामीण भागात टंचाई निर्माण झाल्यास नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी कामे केली जाणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी