शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :२७ कोटींचा कृती आराखडा ; पाणीटंचाई बाबत ६ महिन्यांच्या कामांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:03 IST

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने २७ कोटी ४६ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. जिल्हास्तरावर हा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने २७ कोटी ४६ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. जिल्हास्तरावर हा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१७ मध्येच जिल्ह्यातील अनेक गावांमधील भूजल पातळीत लक्षणीय घट झाली. भूजल पातळीतील ही घट जिल्हावासियांसाठी चिंतेची असून उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढविणारी आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेने २ महिन्यांपूर्वी अहवाल देऊन जिल्ह्यात जवळपास ४४८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात ८०४ गावे आणि वाडी, तांडे असून त्यापैकी ४४८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविल्याने जिल्हा प्रशासनानेही डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईचे कृती आराखडे तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले होते.३१ डिसेंबरपर्यंत हे आराखडे तयार करण्यात आले असून पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्ह्याला २७ कोटी ४६ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे.उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ही रक्कम प्रशासनाच्या हाती पडली तर टंचाईच्या कामांना गती मिळून नागरिकांना दिलासा देता येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हे टंचाई आराखडे तयार केले आहेत.संभाव्य पाणीटंचाईच्या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजना आणि त्यासाठी लागणारा निधी असे नियोजन करीत हा टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासन विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. दरम्यान, उशिराने का होईना; टंचाई आराखडे तयार झाल्याने टंचाईग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.जून महिन्यापर्यंतचे नियोजनजानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०१८ अशा सहा महिन्यांचा आराखडा तयार झाला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ११ कोटी ५८ लाख ६८ हजार रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांमध्ये नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी १ कोटी ५२ लाख ६० हजार, नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी ८१ लाख ५० हजार, तात्पुरत्या पूरक योजनेसाठी २८ लाख, विंधन विहिरीच्या दुरुस्तीसाठी २० लाख ६५ हजार, खाजगी विहीर, बोअर अधिग्रहणासाठी ३ कोटी ७६ लाख ६८ हजार, टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ४ कोटी ९५ लाख २५ हजार, विहिरीतील गाळ काढण्यासाठी ४ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत.मार्चंपर्यंत १५ कोटी ८८ लाखांची कामेजिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात आराखडे तयार केले आहेत. त्यात जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांसाठी १५ कोटी ८८ लाख १६ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. एकूण २ हजार ४५५ योजना प्रस्तावित असून १३३४ गावांमध्ये आणि २९३ वाड्यांमध्ये कामे केली जाणार आहेत.यात ३५२ गावांसाठी ७४३ ठिकाणी नवीन विंधन विहीर घेतली जाणार आहे. यासाठी ३ कोटी ६१ लाख ६२ हजार रुपये, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी ३ कोटी २ लाख, ३८ गावांमध्ये तात्पुरती पूरक योजना प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी १ कोटी ५९ लाख, ३८६ गावांमध्ये ७७३ विंधन विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी १ कोटी ९० लाख ३७ हजार रुपये.३१० गावांमध्ये खाजगी विहीर, बोअर अधिग्रहणासाठी २ कोटी ४० लाख ३२ हजार, ९३ गावे आणि २८ वाड्यामध्ये टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३ कोटी ९ लाख ७५ हजार आणि विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी २५ लाख १० हजार रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांसाठी १५ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी लागणार असून या निधीची मागणी वरिष्ठांकडे केली जाणार आहे.