शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

परभणी :२७ कोटींचा कृती आराखडा ; पाणीटंचाई बाबत ६ महिन्यांच्या कामांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:03 IST

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने २७ कोटी ४६ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. जिल्हास्तरावर हा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने २७ कोटी ४६ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. जिल्हास्तरावर हा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१७ मध्येच जिल्ह्यातील अनेक गावांमधील भूजल पातळीत लक्षणीय घट झाली. भूजल पातळीतील ही घट जिल्हावासियांसाठी चिंतेची असून उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढविणारी आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेने २ महिन्यांपूर्वी अहवाल देऊन जिल्ह्यात जवळपास ४४८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात ८०४ गावे आणि वाडी, तांडे असून त्यापैकी ४४८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविल्याने जिल्हा प्रशासनानेही डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईचे कृती आराखडे तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले होते.३१ डिसेंबरपर्यंत हे आराखडे तयार करण्यात आले असून पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्ह्याला २७ कोटी ४६ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे.उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ही रक्कम प्रशासनाच्या हाती पडली तर टंचाईच्या कामांना गती मिळून नागरिकांना दिलासा देता येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हे टंचाई आराखडे तयार केले आहेत.संभाव्य पाणीटंचाईच्या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजना आणि त्यासाठी लागणारा निधी असे नियोजन करीत हा टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासन विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. दरम्यान, उशिराने का होईना; टंचाई आराखडे तयार झाल्याने टंचाईग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.जून महिन्यापर्यंतचे नियोजनजानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०१८ अशा सहा महिन्यांचा आराखडा तयार झाला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ११ कोटी ५८ लाख ६८ हजार रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांमध्ये नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी १ कोटी ५२ लाख ६० हजार, नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी ८१ लाख ५० हजार, तात्पुरत्या पूरक योजनेसाठी २८ लाख, विंधन विहिरीच्या दुरुस्तीसाठी २० लाख ६५ हजार, खाजगी विहीर, बोअर अधिग्रहणासाठी ३ कोटी ७६ लाख ६८ हजार, टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ४ कोटी ९५ लाख २५ हजार, विहिरीतील गाळ काढण्यासाठी ४ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत.मार्चंपर्यंत १५ कोटी ८८ लाखांची कामेजिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात आराखडे तयार केले आहेत. त्यात जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांसाठी १५ कोटी ८८ लाख १६ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. एकूण २ हजार ४५५ योजना प्रस्तावित असून १३३४ गावांमध्ये आणि २९३ वाड्यांमध्ये कामे केली जाणार आहेत.यात ३५२ गावांसाठी ७४३ ठिकाणी नवीन विंधन विहीर घेतली जाणार आहे. यासाठी ३ कोटी ६१ लाख ६२ हजार रुपये, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी ३ कोटी २ लाख, ३८ गावांमध्ये तात्पुरती पूरक योजना प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी १ कोटी ५९ लाख, ३८६ गावांमध्ये ७७३ विंधन विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी १ कोटी ९० लाख ३७ हजार रुपये.३१० गावांमध्ये खाजगी विहीर, बोअर अधिग्रहणासाठी २ कोटी ४० लाख ३२ हजार, ९३ गावे आणि २८ वाड्यामध्ये टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३ कोटी ९ लाख ७५ हजार आणि विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी २५ लाख १० हजार रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांसाठी १५ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी लागणार असून या निधीची मागणी वरिष्ठांकडे केली जाणार आहे.