शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १२८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:10 IST

जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना आधार मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना आधार मिळाला आहे.मागील वर्षी जिल्ह्यात ७१ टक्के पाऊस झाला. परतीचा पाऊस न झाल्याने संपूर्ण रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी काढल्यानंतर सहा तालुक्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी निघाली. परिणामी हे तालुके शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झाले. परभणीसह पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि सेलू तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने पहिल्या टप्प्यात हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले.या तालुक्यातील शेतकºयांना दुष्काळापोटी शासनाने दुष्काळ अनुदान जाहीर केले होते. महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४७९ गावांमधील २ लाख ६४ हजार ३६ शेतकºयांसाठी १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले होते.दोन टप्प्यात हे अनुदान जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाकडून तालुकानिहाय तहसील कार्यालयांना अनुदानाचे वितरण करण्यात आले. तहसीलस्तरावरुन पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करुन हे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७१ टक्के निधी बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. उर्वरित निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुष्काळी स्थितीमध्ये अनुदान जमा होत असल्याने शेतकºयांना आर्थिक आधार झाला आहे.सोनपेठ तालुक्यात ९९ टक्के वाटप पूर्ण४सोनपेठ तालुक्यातील ६० गावांमधील ३० हजार २१३ शेतकºयांसाठी २० कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. तहसील प्रशासनाने २७ हजार ५७५ शेतकºयांच्या खात्यावर २० कोटी ३१ लाख ६९ हजार रुपये जमा केले असून वाटपाची ही टक्केवारी ९९.८६ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाटप सोनपेठ तालुक्यामध्ये झाले आहे. पालम तालुक्यातील ८२ गावांमधील २४ हजार ६५६ शेतकºयांसाठी २२ कोटी ५४ लाख ७२ हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. या तालुक्यात २२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाला आहे. तसेच पाथरी तालुक्यामध्ये २४ कोटी ४१ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. ४१ हजार ४१७ शेतकºयांपैकी ३५ हजार ८७० शेतकºयांच्या खात्यावर २३ कोटी ४८ लाख ८१ हजार वितरित करण्यात आले. सेलू तालुक्यामध्ये ५१ हजार ६४१ लाभार्थी शेतकºयांसाठी ३५ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपये प्राप्त झाले होते. या तालुक्यातील ४८ हजार ५३७ शेतकºयांच्या बँक खात्यावर २५ कोटी ६ लाख ९३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मानवत तालुक्यामध्ये ३२ हजार २६६ शेतकºयांच्या खात्यावर १३ कोटी ६९ लाख ४५ हजार रुपये आणि परभणी तालुक्यातील ५६ हजार ५३८ शेतकºयांच्या खात्यावर २३ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये जमा केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.४६० गावांच्या याद्या तयार४जिल्ह्यातील ४७९ दुष्काळग्रस्त गावांपैकी ४६० गावांमधील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये परभणी तालुक्यातील १३१ पैकी १२० गावातील शेतकºयांच्या याद्या तयार झाल्या आहेत.४ तसेच पालम तालुक्यातील ८२ पैकी ७७, पाथरी ५८ पैकी १, मानवत ५४ पैकी ५३, सोनपेठ ६० पैकी ६० आणि सेलू तालुक्यातील ९४ गावांमधील शेतकºयांच्या याद्या बँक खाते क्रमांकासह तयार करण्यात आल्या आहेत.आणखी २५ कोटींची आवश्यकतादुष्काळग्रस्त तालुक्यामधील शेतकºयांना राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे. २ हेक्टरपर्यंत जिरायती शेती असणाºया शेतकºयांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये आणि फळ पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकºयांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यासाठी प्रशासनाला आणखी २५ ते ३० कोटी रुपयांची आवश्यकता लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टीने माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक