शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

परभणी : १२८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:10 IST

जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना आधार मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना आधार मिळाला आहे.मागील वर्षी जिल्ह्यात ७१ टक्के पाऊस झाला. परतीचा पाऊस न झाल्याने संपूर्ण रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी काढल्यानंतर सहा तालुक्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी निघाली. परिणामी हे तालुके शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झाले. परभणीसह पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि सेलू तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने पहिल्या टप्प्यात हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले.या तालुक्यातील शेतकºयांना दुष्काळापोटी शासनाने दुष्काळ अनुदान जाहीर केले होते. महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४७९ गावांमधील २ लाख ६४ हजार ३६ शेतकºयांसाठी १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले होते.दोन टप्प्यात हे अनुदान जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाकडून तालुकानिहाय तहसील कार्यालयांना अनुदानाचे वितरण करण्यात आले. तहसीलस्तरावरुन पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करुन हे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७१ टक्के निधी बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. उर्वरित निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुष्काळी स्थितीमध्ये अनुदान जमा होत असल्याने शेतकºयांना आर्थिक आधार झाला आहे.सोनपेठ तालुक्यात ९९ टक्के वाटप पूर्ण४सोनपेठ तालुक्यातील ६० गावांमधील ३० हजार २१३ शेतकºयांसाठी २० कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. तहसील प्रशासनाने २७ हजार ५७५ शेतकºयांच्या खात्यावर २० कोटी ३१ लाख ६९ हजार रुपये जमा केले असून वाटपाची ही टक्केवारी ९९.८६ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाटप सोनपेठ तालुक्यामध्ये झाले आहे. पालम तालुक्यातील ८२ गावांमधील २४ हजार ६५६ शेतकºयांसाठी २२ कोटी ५४ लाख ७२ हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. या तालुक्यात २२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाला आहे. तसेच पाथरी तालुक्यामध्ये २४ कोटी ४१ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. ४१ हजार ४१७ शेतकºयांपैकी ३५ हजार ८७० शेतकºयांच्या खात्यावर २३ कोटी ४८ लाख ८१ हजार वितरित करण्यात आले. सेलू तालुक्यामध्ये ५१ हजार ६४१ लाभार्थी शेतकºयांसाठी ३५ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपये प्राप्त झाले होते. या तालुक्यातील ४८ हजार ५३७ शेतकºयांच्या बँक खात्यावर २५ कोटी ६ लाख ९३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मानवत तालुक्यामध्ये ३२ हजार २६६ शेतकºयांच्या खात्यावर १३ कोटी ६९ लाख ४५ हजार रुपये आणि परभणी तालुक्यातील ५६ हजार ५३८ शेतकºयांच्या खात्यावर २३ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये जमा केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.४६० गावांच्या याद्या तयार४जिल्ह्यातील ४७९ दुष्काळग्रस्त गावांपैकी ४६० गावांमधील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये परभणी तालुक्यातील १३१ पैकी १२० गावातील शेतकºयांच्या याद्या तयार झाल्या आहेत.४ तसेच पालम तालुक्यातील ८२ पैकी ७७, पाथरी ५८ पैकी १, मानवत ५४ पैकी ५३, सोनपेठ ६० पैकी ६० आणि सेलू तालुक्यातील ९४ गावांमधील शेतकºयांच्या याद्या बँक खाते क्रमांकासह तयार करण्यात आल्या आहेत.आणखी २५ कोटींची आवश्यकतादुष्काळग्रस्त तालुक्यामधील शेतकºयांना राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे. २ हेक्टरपर्यंत जिरायती शेती असणाºया शेतकºयांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये आणि फळ पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकºयांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यासाठी प्रशासनाला आणखी २५ ते ३० कोटी रुपयांची आवश्यकता लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टीने माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक