शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १२८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:10 IST

जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना आधार मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना आधार मिळाला आहे.मागील वर्षी जिल्ह्यात ७१ टक्के पाऊस झाला. परतीचा पाऊस न झाल्याने संपूर्ण रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी काढल्यानंतर सहा तालुक्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी निघाली. परिणामी हे तालुके शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झाले. परभणीसह पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि सेलू तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने पहिल्या टप्प्यात हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले.या तालुक्यातील शेतकºयांना दुष्काळापोटी शासनाने दुष्काळ अनुदान जाहीर केले होते. महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४७९ गावांमधील २ लाख ६४ हजार ३६ शेतकºयांसाठी १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले होते.दोन टप्प्यात हे अनुदान जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाकडून तालुकानिहाय तहसील कार्यालयांना अनुदानाचे वितरण करण्यात आले. तहसीलस्तरावरुन पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करुन हे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७१ टक्के निधी बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. उर्वरित निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुष्काळी स्थितीमध्ये अनुदान जमा होत असल्याने शेतकºयांना आर्थिक आधार झाला आहे.सोनपेठ तालुक्यात ९९ टक्के वाटप पूर्ण४सोनपेठ तालुक्यातील ६० गावांमधील ३० हजार २१३ शेतकºयांसाठी २० कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. तहसील प्रशासनाने २७ हजार ५७५ शेतकºयांच्या खात्यावर २० कोटी ३१ लाख ६९ हजार रुपये जमा केले असून वाटपाची ही टक्केवारी ९९.८६ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाटप सोनपेठ तालुक्यामध्ये झाले आहे. पालम तालुक्यातील ८२ गावांमधील २४ हजार ६५६ शेतकºयांसाठी २२ कोटी ५४ लाख ७२ हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. या तालुक्यात २२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाला आहे. तसेच पाथरी तालुक्यामध्ये २४ कोटी ४१ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. ४१ हजार ४१७ शेतकºयांपैकी ३५ हजार ८७० शेतकºयांच्या खात्यावर २३ कोटी ४८ लाख ८१ हजार वितरित करण्यात आले. सेलू तालुक्यामध्ये ५१ हजार ६४१ लाभार्थी शेतकºयांसाठी ३५ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपये प्राप्त झाले होते. या तालुक्यातील ४८ हजार ५३७ शेतकºयांच्या बँक खात्यावर २५ कोटी ६ लाख ९३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मानवत तालुक्यामध्ये ३२ हजार २६६ शेतकºयांच्या खात्यावर १३ कोटी ६९ लाख ४५ हजार रुपये आणि परभणी तालुक्यातील ५६ हजार ५३८ शेतकºयांच्या खात्यावर २३ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये जमा केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.४६० गावांच्या याद्या तयार४जिल्ह्यातील ४७९ दुष्काळग्रस्त गावांपैकी ४६० गावांमधील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये परभणी तालुक्यातील १३१ पैकी १२० गावातील शेतकºयांच्या याद्या तयार झाल्या आहेत.४ तसेच पालम तालुक्यातील ८२ पैकी ७७, पाथरी ५८ पैकी १, मानवत ५४ पैकी ५३, सोनपेठ ६० पैकी ६० आणि सेलू तालुक्यातील ९४ गावांमधील शेतकºयांच्या याद्या बँक खाते क्रमांकासह तयार करण्यात आल्या आहेत.आणखी २५ कोटींची आवश्यकतादुष्काळग्रस्त तालुक्यामधील शेतकºयांना राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे. २ हेक्टरपर्यंत जिरायती शेती असणाºया शेतकºयांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये आणि फळ पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकºयांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यासाठी प्रशासनाला आणखी २५ ते ३० कोटी रुपयांची आवश्यकता लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टीने माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक