शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६ तालुके कापूस उत्पादक म्हणून जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:07 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सहकार तत्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरीता शासकीय भागभांडवलाची योजना कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, जिंतूर व सेलू अशा ६ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. मानवत, पालम व पूर्णा हे तीन तालुके मात्र वगळण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: राज्य शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सहकार तत्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरीता शासकीय भागभांडवलाची योजना कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, जिंतूर व सेलू अशा ६ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. मानवत, पालम व पूर्णा हे तीन तालुके मात्र वगळण्यात आले आहेत.राज्य शासनाने १५ फेब्रुवारी २०१८ रोजी वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार सहकारी तत्वावर चालविण्यात येणाºया सूतगिरण्यांकरीता शासकीय भागभांडवली योजना ही कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ज्या तालुक्यांमध्ये उत्पादित होणाºया कापसापैकी ५० टक्केपेक्षा कमी कापूस सूतगिरण्यांसाठी वापरला जातो, फक्त अशाच तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.सर्वसाधारणपणे २५ हजार २०० चात्या पूर्णक्षमतेने सुरु असणाºया सहकारी सूतगिरणीस वर्षाला किमान २८ हजार ८०० गाठी (१ गाठ म्हणजे १७० किलो कापूस) आवश्यक असतात. गाठी कापूस म्हणजे सर्वसाधारणपणे ४ हजार ८९६ टन इतका कापूस होतो, म्हणजेच सूतगिरणीसाठी वार्षिक किमान ४ हजार ८९६ टन इतक्या कापसाची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी नव्याने सूतगिरणी स्थापन होणार आहे, असे सूतगिरणी प्रकल्प यशस्वी होण्याकरीता दुप्पट म्हणजेच किमान ९ हजार ६०० टन कापसाची आवश्यकता आहे. याबाबींचा विचार करुन राज्यातील कापूस उत्पादक तालुके जाहीर करण्यात आले आहेत. एका तालुक्यात सहकारी सूतगिरणी स्थापन करण्यासाठी वार्षिक किमान ४ हजार ८०० टन कापूस उत्पादन असणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करुन यापुढे भविष्यात स्थापन होणारी सहकारी सूतगिरणी सक्षमपणे चालविण्यासाठी ज्या तालुक्यात वार्षिक ९ हजार ६०० टन कापूस उत्पादन होत आहे, अशा तालुक्यांना कापूस उत्पादक तालुके म्हणून जाहीर करण्यात आले आहे.यामध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, जिंतूर व सेलू या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्णा, पालम व मानवत हे तीन तालुके मात्र वगळण्यात आले आहेत. त्यामुळे या सहाही तालुक्यांमध्ये आता सहकारी सूतगिरणी स्थापन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी तालुक्यात सहकार तत्वावर महिलांची सूतगिरणी स्थापन करण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वीच आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. ही सूतगिरणी चालू झाल्यास जवळपास अडीच हजार महिलांना रोजगार मिळेल, अशी माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी