शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ४५६ घरकुलांच्या प्रस्तावांना दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:48 IST

शहरातील नगरपालिकेकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे १७०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्यात त्यापैकी ४५६ घरकूले मंजूर झाली असून उर्वरित घरकूले दुसऱ्या आणि तिसºया टप्प्यात मंजूर होणार आसल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान, मंजूर झालेल्या घरकुलांना शासकीय दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : शहरातील नगरपालिकेकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे १७०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्यात त्यापैकी ४५६ घरकूले मंजूर झाली असून उर्वरित घरकूले दुसऱ्या आणि तिसºया टप्प्यात मंजूर होणार आसल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान, मंजूर झालेल्या घरकुलांना शासकीय दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली महत्वकांक्षी योजना आहे. प्रत्येक गरिबाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने योजनेची आखणी करण्यात आली आहे. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांबरोबरच अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. ४ टप्यापर्यंत अनुदान लाभार्थ्याला दिले जाते.या अनुदानातूून शौचालयासह घरकुलाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत पालिकेने शहरातील नागरिकांकडून मार्च-एप्रिल २०१८ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. नागरिकांनी याला प्रतिसाद देत १७०० अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची पालिका प्रशासनाच्या वतीने छाननी करण्यात आली. या नंतर सर्वेक्षण करून ८ आॅक्टोबर २०१८ ला नगरपालिकेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याकडे ४५६ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले होते. या घरकुलांना मंजुरी मिळाली असून लवकरच संबंधित लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.ही योजना २०२२ पर्यंत अविरत चालणार असल्याने दुसºया आणि तिसºया टप्यात उर्वरित घरकुलांच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव महाराष्टÑ गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेने दिली. दरम्यान, घरकूल मंजूर झालेल्या लाभार्र्थ्यांना बांधकाम करण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ११ डिसेंबर रोजी नगरपालिकेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.‘शासकीय दरात वाळू उपलब्ध करून द्या’४पालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात ४५६ घरकूल मंजूर केले असले तरी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकाम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.४सद्य स्थितीत वाळुचे लिलाव झाले नसल्याने कृत्रिम टंचाई निर्माण करून काही जण आवाच्या सव्वा दराने वाळू विक्री करीत आहेत. लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध न झाल्यास बांधकाम लांबू शकते. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय दरात वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्याकडे करणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्षा राणी अंकूश लाड यांनी दिली. त्याच बरोबर मानवत शहरातील एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नसल्याचे लाड यांनी सांगितले.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधकाम प्रक्रिया संदर्भात ११ डिसेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.-उमेश ढाकणे, मुख्याधिकारी नगरपालिका, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीprime ministerपंतप्रधानHomeघर