शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :४४८ गावांमध्ये यावर्षी देणार जमीन आरोग्य पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:41 IST

मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मृद आरोग्य सुधारण्यासाठी आणि मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/ सल्फर अच्छादित युरिया सारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाºया खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मृद आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.२०१४-१५ ते २०१७-१८ या तीन वर्षामध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्क्यांचा आर्थिक सहभाग आहे. योजनेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर म्हणाले की, जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४४८ गावांची मृद चाचणी व मृद आरोग्य पत्रिका वाटपासाठी निवड करण्यात आली असून या गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना या जमिनीच्या आरोग्य पत्रिका दिल्या जाणार आहेत. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ४०० गावांची निवड करण्यात येणार असून त्यामधील १ लाख ८३ हजार ५२२ शेतकºयांना जमीन आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे.मृद आरोग्यपत्रिकेत जमिनीचे आरोग्य म्हणजेच त्यातील घटकांची मात्रा सांगितली जाणार आहे. सुपिकता पातळीनुसार रासायनिक व सेंद्रीय खतांची मात्रा किती प्रमाणात वापरावी, याचेही या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.जमिनीत येणार सुपिकताखरीप व रब्बी हंगामातील पिकांना शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व औषधांची मात्रा देण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीतील सुपिकतेमध्ये गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. परंतु, कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक शेतकºयांच्या जमिनीची मृद तपासणी करुन आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. या पत्रिकेत पिकांना लागणाºया रासायनिक खतांचे मोजमाप देण्यात येणार आहे. त्यामुळे अवाजवी रासायनिक खतामुळे घटत चाललेली जमिनीची सुपिकता या आरोग्य पत्रिकेमुळे वाढणार असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे.