शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

परभणी :४४८ गावांमध्ये यावर्षी देणार जमीन आरोग्य पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:41 IST

मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मृद आरोग्य सुधारण्यासाठी आणि मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/ सल्फर अच्छादित युरिया सारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाºया खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मृद आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.२०१४-१५ ते २०१७-१८ या तीन वर्षामध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्क्यांचा आर्थिक सहभाग आहे. योजनेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर म्हणाले की, जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४४८ गावांची मृद चाचणी व मृद आरोग्य पत्रिका वाटपासाठी निवड करण्यात आली असून या गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना या जमिनीच्या आरोग्य पत्रिका दिल्या जाणार आहेत. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ४०० गावांची निवड करण्यात येणार असून त्यामधील १ लाख ८३ हजार ५२२ शेतकºयांना जमीन आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे.मृद आरोग्यपत्रिकेत जमिनीचे आरोग्य म्हणजेच त्यातील घटकांची मात्रा सांगितली जाणार आहे. सुपिकता पातळीनुसार रासायनिक व सेंद्रीय खतांची मात्रा किती प्रमाणात वापरावी, याचेही या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.जमिनीत येणार सुपिकताखरीप व रब्बी हंगामातील पिकांना शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व औषधांची मात्रा देण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीतील सुपिकतेमध्ये गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. परंतु, कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक शेतकºयांच्या जमिनीची मृद तपासणी करुन आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. या पत्रिकेत पिकांना लागणाºया रासायनिक खतांचे मोजमाप देण्यात येणार आहे. त्यामुळे अवाजवी रासायनिक खतामुळे घटत चाललेली जमिनीची सुपिकता या आरोग्य पत्रिकेमुळे वाढणार असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे.