शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

परभणी :४४८ गावांमध्ये यावर्षी देणार जमीन आरोग्य पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:41 IST

मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मृद आरोग्य सुधारण्यासाठी आणि मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/ सल्फर अच्छादित युरिया सारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाºया खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मृद आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.२०१४-१५ ते २०१७-१८ या तीन वर्षामध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्क्यांचा आर्थिक सहभाग आहे. योजनेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर म्हणाले की, जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४४८ गावांची मृद चाचणी व मृद आरोग्य पत्रिका वाटपासाठी निवड करण्यात आली असून या गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना या जमिनीच्या आरोग्य पत्रिका दिल्या जाणार आहेत. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ४०० गावांची निवड करण्यात येणार असून त्यामधील १ लाख ८३ हजार ५२२ शेतकºयांना जमीन आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे.मृद आरोग्यपत्रिकेत जमिनीचे आरोग्य म्हणजेच त्यातील घटकांची मात्रा सांगितली जाणार आहे. सुपिकता पातळीनुसार रासायनिक व सेंद्रीय खतांची मात्रा किती प्रमाणात वापरावी, याचेही या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.जमिनीत येणार सुपिकताखरीप व रब्बी हंगामातील पिकांना शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व औषधांची मात्रा देण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीतील सुपिकतेमध्ये गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. परंतु, कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक शेतकºयांच्या जमिनीची मृद तपासणी करुन आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. या पत्रिकेत पिकांना लागणाºया रासायनिक खतांचे मोजमाप देण्यात येणार आहे. त्यामुळे अवाजवी रासायनिक खतामुळे घटत चाललेली जमिनीची सुपिकता या आरोग्य पत्रिकेमुळे वाढणार असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे.