शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

परभणी: मार्केट यार्डात ४ लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:58 IST

बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत असून शेवटच्या टप्प्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीत झाली असून कापसाला वाढीव भाव मिळत असल्याने शेवटी पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांना तारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत असून शेवटच्या टप्प्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीत झाली असून कापसाला वाढीव भाव मिळत असल्याने शेवटी पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांना तारले आहे.शेतमालाचा उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यामुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला येतो. त्यातच शासनाकडून दिल्या जाणाºया हमीभावाने शेतीमाल विक्री करताना शेतकऱ्यांना अटीची व निकषांची परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे अनेकदा शेतमालाच्या विक्रीतून उत्पादन खर्चही पडत नाही, अशी स्थिती असते.यंदा कापूस पीक जगविण्यासाठी अधिक झळ शेतकºयांना बसली आहे. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे व कापूस वेचणीसाठी ८ ते १० रुपये किलो प्रमाणे पैसे माजावे लागले होते. मात्र कापूस हंगाम २०१८- १९ अंतर्गत आॅक्टोबर महिन्यात बाजार समितीच्या यार्डात लिलाव सुरु झाल्यानंतर लिलावात प्रत्यक्ष कापसाला हमीभावा पेक्षा जास्त भाव मिळाला. मधल्या काळात ५ हजार ४८० पर्यंत कापसाचे भाव खाली आले होते.मात्र मागील आठवड्यापासून कापसाच्या भावात सतत वाढ होत असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. २६ मार्च रोजी रोजी कापूस सहा हजारी झाल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून येत होते.माल विक्री केल्यानंतर नगदी पैसे मिळत असल्याने परभणी, सोनपेठ, पाथरी तालुक्यांसह मानवत तालुक्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी मानवत बाजारपेठ जवळ करतात. खाजगी परवानाधारक खरेदीदारासह सीसीआयने २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. बाजारपेठेतील एकूण चित्र पाहता सद्यस्थितीत कापसाचा भाव वाढत असल्याने कापूस विक्री न करता घरात राखून ठेवलेल्या शेतकºयांना कापसाने तारले आहे.शेतकºयांची खाजगी व्यापाºयांना पसंतीशासनाचा हमीभाव ५४५० आहे. सीसीआयने आतापर्यंत १८ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र अटीची पूर्तता व कापूस विक्री केल्यानंतर पैशासाठी वाट पाहावी लागत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना माल विक्री करुन नगदी पैसे घेण्याला पंसती देत असल्याचे दिसून येत आहे. २७ मार्च रोजी बाजार समितीच्या यार्डात झालेल्या लिलावात कापसाला ६ हजार रुपये वरचा दर मिळाला. लिलावात गिरीश कत्रुवार, विजय पोरवाल, भगवान गोलाईत, संदीप पेन्सलवार, गौरव अग्रवाल, रामनिवास टवानी, रामनिवास सारडा, जुगल काबरा, राहुल कडतन आदी खरेदीदार सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी