शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

परभणी: मार्केट यार्डात ४ लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:58 IST

बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत असून शेवटच्या टप्प्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीत झाली असून कापसाला वाढीव भाव मिळत असल्याने शेवटी पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांना तारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत असून शेवटच्या टप्प्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीत झाली असून कापसाला वाढीव भाव मिळत असल्याने शेवटी पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांना तारले आहे.शेतमालाचा उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यामुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला येतो. त्यातच शासनाकडून दिल्या जाणाºया हमीभावाने शेतीमाल विक्री करताना शेतकऱ्यांना अटीची व निकषांची परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे अनेकदा शेतमालाच्या विक्रीतून उत्पादन खर्चही पडत नाही, अशी स्थिती असते.यंदा कापूस पीक जगविण्यासाठी अधिक झळ शेतकºयांना बसली आहे. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे व कापूस वेचणीसाठी ८ ते १० रुपये किलो प्रमाणे पैसे माजावे लागले होते. मात्र कापूस हंगाम २०१८- १९ अंतर्गत आॅक्टोबर महिन्यात बाजार समितीच्या यार्डात लिलाव सुरु झाल्यानंतर लिलावात प्रत्यक्ष कापसाला हमीभावा पेक्षा जास्त भाव मिळाला. मधल्या काळात ५ हजार ४८० पर्यंत कापसाचे भाव खाली आले होते.मात्र मागील आठवड्यापासून कापसाच्या भावात सतत वाढ होत असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. २६ मार्च रोजी रोजी कापूस सहा हजारी झाल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून येत होते.माल विक्री केल्यानंतर नगदी पैसे मिळत असल्याने परभणी, सोनपेठ, पाथरी तालुक्यांसह मानवत तालुक्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी मानवत बाजारपेठ जवळ करतात. खाजगी परवानाधारक खरेदीदारासह सीसीआयने २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. बाजारपेठेतील एकूण चित्र पाहता सद्यस्थितीत कापसाचा भाव वाढत असल्याने कापूस विक्री न करता घरात राखून ठेवलेल्या शेतकºयांना कापसाने तारले आहे.शेतकºयांची खाजगी व्यापाºयांना पसंतीशासनाचा हमीभाव ५४५० आहे. सीसीआयने आतापर्यंत १८ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र अटीची पूर्तता व कापूस विक्री केल्यानंतर पैशासाठी वाट पाहावी लागत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना माल विक्री करुन नगदी पैसे घेण्याला पंसती देत असल्याचे दिसून येत आहे. २७ मार्च रोजी बाजार समितीच्या यार्डात झालेल्या लिलावात कापसाला ६ हजार रुपये वरचा दर मिळाला. लिलावात गिरीश कत्रुवार, विजय पोरवाल, भगवान गोलाईत, संदीप पेन्सलवार, गौरव अग्रवाल, रामनिवास टवानी, रामनिवास सारडा, जुगल काबरा, राहुल कडतन आदी खरेदीदार सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी