शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परभणी: ६० हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:07 IST

२०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीत सापडून बाधित झालेले ६० हजारा पेक्षा अधिक कोरडवाहू व बागायतदार शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी अनुदान तात्काळ मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीत सापडून बाधित झालेले ६० हजारा पेक्षा अधिक कोरडवाहू व बागायतदार शेतकरीदुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी अनुदान तात्काळ मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड या चारही महसुल मंडळात गेल्यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. या भागातील शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. राज्य शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळाले नाही. त्यातच चालू वर्षातही पावसाने पाठ फिरविल्याने येथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळ घोषित झालेल्या महसुली मंडळातील शेतकºयांना तातडीने दुष्काळी अनुदान उपलब्ध व्हावे, यासाठी तहसील प्रशासनाने तालुक्यातील चार ही मंडळातील २ हेक्टर व त्यापेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कोरडवाहू तसेच बागायतदार शेतकºयांची स्वतंत्र यादी तयार केली. त्यानंतर या यादीनुसार तालुक्यातील कोरडवाहू ५९ हजार २५० व बागायतदार ८४३ अशा एकूण ६० हजार ९३ शेतकºयांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. यामध्ये गंगाखेड महसूल मंडळातील २ हेक्टर कोरडवाहू शेतजमीन असलेले १० हजार २२७ व २ हेक्टरपेक्षा अधिक; परंतु, कोरडवाहू शेतजमीन असलेले १ हजार ३८३ असे ११ हजार ६१० शेतकरी, माखणी महसूल मंडळातील १६ हजार ८८३ शेतकरी, महातपुरी मंडळातील १२ हजार ८५५ शेतकरी व राणीसावरगाव मंडळातील १७ हजार ९०२ शेतकरी असे एकुण ५९ हजार २५० नुकसान झालेल्या शेतकºयांचा समावेश आहे. तर याच ४ महसूल मंडळातील बागायतदार शेतकºयांची यादीही दुष्काळी अनुदानासाठी पाठविण्यात आली आहे. कोरडवाहू शेतजमीन असलेल्या शेतकºयांना ३९ कोटी ५९ लाख ३९ हजार २७५ रुपये व बागायतदार शेतकºयांना १ कोटी १२ लाख ४७ हजार ४८० रुपये असे एकूण ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपये दुष्काळी अनुदान मिळण्याची प्रतिक्षा आहे. गतवर्षीचे दुष्काळी अनुदान तातडीने शेतकºयांना मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.शेतकºयांची परिस्थिती झाली बिकट४गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड या चारही महसुल मंडळात गेल्यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. या भागातील शेतकºयांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. राज्य शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान तत्काळ मिळेला, या अपेक्षेवर तालुक्यातील चार महसूल मंडळातील ६० हजार शेतकरी होते.४तालुक्यातील कोरडवाहू ५९ हजार २५० व बागायतदार ८४३ अशा एकूण ६० हजार ९३ शेतकºयांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. यासाठी महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागणी करुन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला आहे; परंतु, अनुदानाची मागणी केलेल्या प्रस्तावावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.४गेल्या काही वर्षापासून पाऊसकाळ कमी होत आहे. चालू वर्षात तर पावसाळा सुरू होऊन २ महिने संपत आले, तरीही वार्षिक सरासरीनुसार केवळ २० टक्के एवढाच पाऊस झाला आहे. काळेकुट ढग जमा होऊनही पाऊस पडत नाही. खरीप हंगामात केलेली पहिली पेरणी वाया गेल्यानंतर बहुतांश शेतकºयांना दुबार पेरणी केल्यानंतर आलेले पिकही पावसाअभावी हातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.४पाऊसकाळ नसल्याने अल्पभूधारक शेतकºयांच्या हाताला काम मिळत नसल्याने बहुतांश शेतकºयांनी कामाच्या शोधात गाव सोडून शहर गाठल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना बळ देण्यासाठी शासनाने वेळीच मदत करणे आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.असे आहेत बागायतदार शेतकरी४गंगाखेड महसूल मंडळातील २ हेक्टर बागायती शेतजमीनचे ११७ व २ हेक्टरपेक्षा अधिक बागायती शेतजमीनचे ६७ असे १८४ शेतकरी, माखणी महसूल मंडळातील २१६ शेतकरी, महातपुरी मंडळातील २०१ शेतकरी व राणीसावरगाव मंडळातील २०२ शेतकरी असे एकूण ८४३ नुकसान झालेले शेतकरी आहेत.४या शेतकºयांसाठी लागणाºया अनुदानाची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहे. ही रक्कम मिळताच या शेतकºयांना दुष्काळी अनुदान वाटप होणार आहे. अनुदान वाटप होत असल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.गंगाखेड तालुक्यातील शेतकºयांची गाव, मंडळ निहाय यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे. लवकरच दुष्काळी अनुदान मिळेल. हे अनुदान प्राप्त होताच तातडीने शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याची व्यवस्था करण्यात येईल.-स्वरुप कंकाळ,तहसीलदार, गंगाखेडमागील काही वर्षापासून तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या गंगाखेड तालुक्यातील शेतकºयांना २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी अनुदानाचे तात्काळ वाटप करण्यात यावे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांची भेट घेऊन दुष्काळी अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणी करणार करणार आहे.-आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, गंगाखेडनिसर्गाच्या अवकृपेमुळे वेळवर पाऊस पडत नसल्याने शेतात कोणत्याच प्रकारची पिके व्यवस्थित येत नाही. थोड्याफार प्रमाणात आलेली पिके पाण्याअभावी हातून जात आहेत. बाजारात शेतीमालास योग्य किंमत मिळत नाही. यामुळे तालुक्यातील शेतकºयांची अवस्था वाईट आहे. चालू वर्षातील खरीप हंगामातील पेरणी केल्यानंतर पिकांना तारणारा, असा मोठा पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकºयांनी उधार बी बियाणे घेऊन दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळी अनुदानाचे वाटप करून आधार द्यावा,-रमेशराव पवार, शेतकरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ