शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: ६० हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:07 IST

२०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीत सापडून बाधित झालेले ६० हजारा पेक्षा अधिक कोरडवाहू व बागायतदार शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी अनुदान तात्काळ मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीत सापडून बाधित झालेले ६० हजारा पेक्षा अधिक कोरडवाहू व बागायतदार शेतकरीदुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी अनुदान तात्काळ मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड या चारही महसुल मंडळात गेल्यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. या भागातील शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. राज्य शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळाले नाही. त्यातच चालू वर्षातही पावसाने पाठ फिरविल्याने येथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळ घोषित झालेल्या महसुली मंडळातील शेतकºयांना तातडीने दुष्काळी अनुदान उपलब्ध व्हावे, यासाठी तहसील प्रशासनाने तालुक्यातील चार ही मंडळातील २ हेक्टर व त्यापेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कोरडवाहू तसेच बागायतदार शेतकºयांची स्वतंत्र यादी तयार केली. त्यानंतर या यादीनुसार तालुक्यातील कोरडवाहू ५९ हजार २५० व बागायतदार ८४३ अशा एकूण ६० हजार ९३ शेतकºयांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. यामध्ये गंगाखेड महसूल मंडळातील २ हेक्टर कोरडवाहू शेतजमीन असलेले १० हजार २२७ व २ हेक्टरपेक्षा अधिक; परंतु, कोरडवाहू शेतजमीन असलेले १ हजार ३८३ असे ११ हजार ६१० शेतकरी, माखणी महसूल मंडळातील १६ हजार ८८३ शेतकरी, महातपुरी मंडळातील १२ हजार ८५५ शेतकरी व राणीसावरगाव मंडळातील १७ हजार ९०२ शेतकरी असे एकुण ५९ हजार २५० नुकसान झालेल्या शेतकºयांचा समावेश आहे. तर याच ४ महसूल मंडळातील बागायतदार शेतकºयांची यादीही दुष्काळी अनुदानासाठी पाठविण्यात आली आहे. कोरडवाहू शेतजमीन असलेल्या शेतकºयांना ३९ कोटी ५९ लाख ३९ हजार २७५ रुपये व बागायतदार शेतकºयांना १ कोटी १२ लाख ४७ हजार ४८० रुपये असे एकूण ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपये दुष्काळी अनुदान मिळण्याची प्रतिक्षा आहे. गतवर्षीचे दुष्काळी अनुदान तातडीने शेतकºयांना मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.शेतकºयांची परिस्थिती झाली बिकट४गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड या चारही महसुल मंडळात गेल्यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. या भागातील शेतकºयांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. राज्य शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान तत्काळ मिळेला, या अपेक्षेवर तालुक्यातील चार महसूल मंडळातील ६० हजार शेतकरी होते.४तालुक्यातील कोरडवाहू ५९ हजार २५० व बागायतदार ८४३ अशा एकूण ६० हजार ९३ शेतकºयांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. यासाठी महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागणी करुन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला आहे; परंतु, अनुदानाची मागणी केलेल्या प्रस्तावावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.४गेल्या काही वर्षापासून पाऊसकाळ कमी होत आहे. चालू वर्षात तर पावसाळा सुरू होऊन २ महिने संपत आले, तरीही वार्षिक सरासरीनुसार केवळ २० टक्के एवढाच पाऊस झाला आहे. काळेकुट ढग जमा होऊनही पाऊस पडत नाही. खरीप हंगामात केलेली पहिली पेरणी वाया गेल्यानंतर बहुतांश शेतकºयांना दुबार पेरणी केल्यानंतर आलेले पिकही पावसाअभावी हातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.४पाऊसकाळ नसल्याने अल्पभूधारक शेतकºयांच्या हाताला काम मिळत नसल्याने बहुतांश शेतकºयांनी कामाच्या शोधात गाव सोडून शहर गाठल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना बळ देण्यासाठी शासनाने वेळीच मदत करणे आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.असे आहेत बागायतदार शेतकरी४गंगाखेड महसूल मंडळातील २ हेक्टर बागायती शेतजमीनचे ११७ व २ हेक्टरपेक्षा अधिक बागायती शेतजमीनचे ६७ असे १८४ शेतकरी, माखणी महसूल मंडळातील २१६ शेतकरी, महातपुरी मंडळातील २०१ शेतकरी व राणीसावरगाव मंडळातील २०२ शेतकरी असे एकूण ८४३ नुकसान झालेले शेतकरी आहेत.४या शेतकºयांसाठी लागणाºया अनुदानाची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहे. ही रक्कम मिळताच या शेतकºयांना दुष्काळी अनुदान वाटप होणार आहे. अनुदान वाटप होत असल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.गंगाखेड तालुक्यातील शेतकºयांची गाव, मंडळ निहाय यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे. लवकरच दुष्काळी अनुदान मिळेल. हे अनुदान प्राप्त होताच तातडीने शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याची व्यवस्था करण्यात येईल.-स्वरुप कंकाळ,तहसीलदार, गंगाखेडमागील काही वर्षापासून तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या गंगाखेड तालुक्यातील शेतकºयांना २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी अनुदानाचे तात्काळ वाटप करण्यात यावे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांची भेट घेऊन दुष्काळी अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणी करणार करणार आहे.-आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, गंगाखेडनिसर्गाच्या अवकृपेमुळे वेळवर पाऊस पडत नसल्याने शेतात कोणत्याच प्रकारची पिके व्यवस्थित येत नाही. थोड्याफार प्रमाणात आलेली पिके पाण्याअभावी हातून जात आहेत. बाजारात शेतीमालास योग्य किंमत मिळत नाही. यामुळे तालुक्यातील शेतकºयांची अवस्था वाईट आहे. चालू वर्षातील खरीप हंगामातील पेरणी केल्यानंतर पिकांना तारणारा, असा मोठा पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकºयांनी उधार बी बियाणे घेऊन दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळी अनुदानाचे वाटप करून आधार द्यावा,-रमेशराव पवार, शेतकरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ