शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:23 IST

महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जेद्वारे चालणारे कृषीपंप उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत.ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जेद्वारे चालणारे कृषीपंप उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.या योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे. तसेच कृषीपंपासाठी वीज जोडणी घेतली नाही, अशा शेतकºयांना सौर कृषीपंप योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.या योजनेत परभणी जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज केले असून ३४२ शेतकºयांना कोटेशन देण्यात आले आहे. तर ४२ शेतकºयांनी त्यांच्या हिस्याची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे.महावितरणच्या वतीने मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेच्या निविदा प्रक्रियेला शासनाने मंजुरी दिली आहे. या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषीपंपाची ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ रुपये, ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकºयांना फायदा होणार आहे.पूर्वी ३ एचपी डीसी पंपासाठी २ लाख ५५ हजार आणि ५ एचपी डीसी पंपासाठी ३ लाख ८५ हजार लागत होते. या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० रुपये, अनुसूचित जाती-जमाती गटासाठी लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ रुपये रक्कम भरावी लागत होती. आता अनुक्रमे १६ हजार ५६० रुपये व ८ हजार २८० रुपये ही रक्कम भरावी लागत आहे. ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी लाभार्थ्यांना पूर्वी ३८ हजार ५०० रुपये तर अनुसूचित जाती जमातीसाठी गटातील लाभार्थ्यांना १९ हजार २५० रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती आता अनुक्रमे २४ हजार ७१० रुपये व १२ हजार ३५५ रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. कृषी सौरपंप उपलब्ध झाल्यानंतर शेतकºयांचा शेती पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.वीज जोडणी घेतलेल्या शेतकºयांनाही लाभमहावितरण आपल्या दारी योजनेत लाभार्थ्यांना वीज जोडणीचा लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकºयांनी वीज जोडणीसाठी पैसे भरुनही त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यात ६४ हजार ९३८ शेतकºयांनी अर्ज केले असून त्यापैकी १७ हजार १६ शेतकºयांना कोटेशन दिले असल्याची माहिती महावितरणने दिली.शेतकºयांचा होणार फायदा४जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विजेची मागणी वाढत चालली असून अशा काळात कृषीपंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे अनेक शेतकºयांना वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर रात्र जागून पिकांना पाणी द्यावे लागते. दिवसा सौर ऊर्जेवर चालणारा पंप शेतकºयांकडे असेल तर वीज प्रवाह खंडित झाल्यानंतरही पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकºयांना लाभ होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण