शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:23 IST

महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जेद्वारे चालणारे कृषीपंप उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत.ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जेद्वारे चालणारे कृषीपंप उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.या योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे. तसेच कृषीपंपासाठी वीज जोडणी घेतली नाही, अशा शेतकºयांना सौर कृषीपंप योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.या योजनेत परभणी जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज केले असून ३४२ शेतकºयांना कोटेशन देण्यात आले आहे. तर ४२ शेतकºयांनी त्यांच्या हिस्याची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे.महावितरणच्या वतीने मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेच्या निविदा प्रक्रियेला शासनाने मंजुरी दिली आहे. या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषीपंपाची ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ रुपये, ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकºयांना फायदा होणार आहे.पूर्वी ३ एचपी डीसी पंपासाठी २ लाख ५५ हजार आणि ५ एचपी डीसी पंपासाठी ३ लाख ८५ हजार लागत होते. या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० रुपये, अनुसूचित जाती-जमाती गटासाठी लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ रुपये रक्कम भरावी लागत होती. आता अनुक्रमे १६ हजार ५६० रुपये व ८ हजार २८० रुपये ही रक्कम भरावी लागत आहे. ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी लाभार्थ्यांना पूर्वी ३८ हजार ५०० रुपये तर अनुसूचित जाती जमातीसाठी गटातील लाभार्थ्यांना १९ हजार २५० रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती आता अनुक्रमे २४ हजार ७१० रुपये व १२ हजार ३५५ रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. कृषी सौरपंप उपलब्ध झाल्यानंतर शेतकºयांचा शेती पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.वीज जोडणी घेतलेल्या शेतकºयांनाही लाभमहावितरण आपल्या दारी योजनेत लाभार्थ्यांना वीज जोडणीचा लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकºयांनी वीज जोडणीसाठी पैसे भरुनही त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यात ६४ हजार ९३८ शेतकºयांनी अर्ज केले असून त्यापैकी १७ हजार १६ शेतकºयांना कोटेशन दिले असल्याची माहिती महावितरणने दिली.शेतकºयांचा होणार फायदा४जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विजेची मागणी वाढत चालली असून अशा काळात कृषीपंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे अनेक शेतकºयांना वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर रात्र जागून पिकांना पाणी द्यावे लागते. दिवसा सौर ऊर्जेवर चालणारा पंप शेतकºयांकडे असेल तर वीज प्रवाह खंडित झाल्यानंतरही पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकºयांना लाभ होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण