शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

परभणी : येलदरी प्रकल्पात ३१ टक्के जिवंत पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 00:03 IST

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून सध्या या प्रकल्पात ३१.३० टक्के पाणीसाठा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून सध्या या प्रकल्पात ३१.३० टक्के पाणीसाठा झाला आहे.येलदरी प्रकल्प दोन वर्षापासून मृतसाठ्यात गेल्याने जिंतूरसह परभणी, पूर्णा, हिंगोली, वसमत आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने संपूर्ण पावसाळा संपत आला तरी प्रकल्पात पाणी साठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. महिनाभरापूर्वी पूर्णा नदीवर बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने हा प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरला असून या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग येलदरी प्रकल्पात येत आहे.मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस होत आहे. विशेष म्हणजे सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून खडकपूरा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या कन्नड, सोयगाव, सिल्लोड, जाफराबाद, बुलढाणा, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार आदी भागात पाऊस होत आहे. या पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात दाखल होत असलेले पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे. २३ आॅक्टोबर रोजी या प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले.५८ हजार ४०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला होता. २४ आॅक्टोबर रोजी हे पाणी येलदरी प्रकल्पामध्ये दाखल झाल्याने त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी येलदरी प्रकल्पामध्ये १६ टक्के जिवंत पाणीसाठा होता.गुरुवारी हा पाणीसाठा २२.३० टक्यावर गेला होता. तर शुक्रवारी त्यात आणखी वाढ होत ३१.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब ठरत आहे. यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील मुख्य शहरांसह २३० हून अधिक खेडे, वाड्या, तांड्यांची वर्षभराची तहान भागणार आहे. विशेष म्हणजे या धरणावर अवलंबून असलेल्या तिन्ही जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा सिंचनाचा प्रश्नही मिटणार आहे.येलदरी प्रकल्पात : २५६ दलघमी पाणी४९३४ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये ३८१.०८८ दलघमी पाणीसाठा झाला असून त्यामध्ये २५६.२०० दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३१.३० टक्के एवढी होते.४२५ आॅक्टोबर रोजी येलदरी पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला. त्यामुळे या प्रकल्पात अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. मागील २४ तासात प्रकल्पामध्ये ७० दलघमी पाण्याची आवक झाली आहे.४प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आतापर्यंत ९१४ मि.मी. पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून २६१ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मृतसाठ्याबाहेर पडला. त्याचा फायदा जिल्हावासियांना होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प