शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पीक विम्यासाठी उरले ११ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:22 IST

२०१९-२० या रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा व उन्हाळी भूईमुग या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २८ नोव्हेंबरपासून पीक विमा भरुन घेण्यात येत आहे. पीक विमा भरण्याची शेवटची मुदत ही ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिके संरक्षित करण्यासाठी ११ दिवसांचा कालावधी उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१९-२० या रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा व उन्हाळी भूईमुग या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २८ नोव्हेंबरपासून पीक विमा भरुन घेण्यात येत आहे. पीक विमा भरण्याची शेवटची मुदत ही ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिके संरक्षित करण्यासाठी ११ दिवसांचा कालावधी उरला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीच्या रब्बी हंगामासाठी राज्य शासनाने भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड केली आहे. या कंपनीकडे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भूईमुग या पिकांचा विमा उतरविता येणार आहे. ज्वारीसाठी प्रति हेक्टर ३९० रुपये, गव्हासाठी ५२५ रुपये, हरभरा या पिकासाठी ३६० रुपयांचा हप्ता तर उन्हाळी भूईमुगासाठी ५७० रुपये प्रति हेक्टरसाठी हप्ता भरावा लागणार आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. पीक विमा भरण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसूचित पिकांची पेरणी केलेले घोषणापत्र, बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे घेऊन जिल्ह्यातील सीएसी केंद्र व बँकांमध्ये विमा भरावयाचा आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबरपासून विमा भरण्यासाठी राज्य शासनाने सुरुवात केली आहे; परंतु, रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. त्यामुळे शेतकºयांनी शेवटच्या दिवसात बँक व सीएससी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी ३१ डिेसेंबर या मुदतीत पीक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.शेतकºयांमध्ये उदासिनता४मागील दोन खरीप हंगाम व दोन्ही रब्बी हंगामात जिल्ह्याला मिळालेल्या विमा कंपनीने केवळ शेतकºयांकडून विमा हप्ता भरुन घेताना काळजी घेतली; परंतु, शेतकºयांचे या चारही हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची मदत देताना मात्र या कंपन्यांनी आखडता हात घेतला. काही हंगामात तर शेतकºयांना मदतच मिळाली नाही. त्यामुळे विमा काढण्याकडे शेतकºयांमध्ये उदासिनता दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी