शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: मनरेगाच्या २८ नव्या कामांना मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:10 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये ५ नोव्हेंबर रोजी २८ कामांचा समावेश करण्यात आल्याने या योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढून जिल्ह्यातील मजुरांना त्याचा फायदा होईल, अशी अ‍ेपक्षा होती. मात्र प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे या नवीन २८ कामांना ५ महिन्यांचा कालावधी उलटूनही मुहूर्त मिळाला नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये ५ नोव्हेंबर रोजी २८ कामांचा समावेश करण्यात आल्याने या योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढून जिल्ह्यातील मजुरांना त्याचा फायदा होईल, अशी अ‍ेपक्षा होती. मात्र प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे या नवीन २८ कामांना ५ महिन्यांचा कालावधी उलटूनही मुहूर्त मिळाला नसल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या नियोजन (रोहयो) विभागाने या संदर्भात ५ नोव्हेंबर रोजी अद्यादेश काढला होता. या आदेशान्वये राज्यातील विविध यंत्रणामार्फत सुरु असलेल्या कामांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेशी अभिसरण करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार इतर विभागांच्या योजनांशी अभिसरणाद्वारे गुणवत्ता व उत्पादकता वाढीस मदत होणार आहे. या धोरणानुसार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत इतर विभागांबरोबर सांगड घालून कामे घेण्याच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हास्तरीय योजनेमध्ये या योजनांचे अभिसरण केल्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील निधीही अधिक प्रमाणात वापरात येणार आहे. या निर्णयानुसार शासनाने विविध विभागांमध्ये २८ प्रकारची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कामांवर मजूर फिरकत नाहीत. परिणामी कामे उपलब्ध असताना मजुरांची संख्या मात्र कमी आहे. नव्या स्वरुपाची कामे या योजनेंतर्गत समाविष्ट झाल्याने मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होईल, असे वाटले होते; परंतु तसे झाले नसल्याने कामाच्या शोधात मजूर मंडळी जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होत आहे. काही मजूर ग्रामीण भागातून शहरी भागात येत आहेत. मनरेगामध्ये २८ प्रकारच्या कामांचा समावेश होऊन त्याची अंमलबजावणी झाली तर ग्रामपातळीवर मजुरांना काम उपलब्ध होईल, अशी शेतकरी व मजूरांना अपेक्षा होती; परंतु, जिल्हा प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही अद्याप २८ कामांमधून एकही नवीन काम जिल्ह्यात सुरू झाले नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत हाताला काम मिळेल, अशी मजूर वर्गाची अपेक्षा फोल ठरली आहे.अशी आहेत नवीन कामे४शासनाच्या या निर्णयानुसार मनरेगाअंतर्गत नवीन २८ कामांचा समावेश झाला असून त्यात शाळा, खेळाच्या मैदानासाठी संरक्षण भिंत बांधणे, छतासह बाजारओटा तयार करणे, शालेय स्वयंपाकगृह निवारा, नाला, मोरी बांधकाम, सार्वजनिक जागेवरील गोदाम, सिमेंट रस्ता, शाळा, खेळाच्या मैदानासाठी साखळी कुंपन, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक जागेवरील शेततळे, कॉंक्रिट नाला बांधकाम, भूमिगत बंधारा, बचतगटाच्या जनावरांसाठी सामूहिक ओटे, स्मशानभूमी शेड बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. या योजनेची जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी सुरु झाली असती तर पाच महिन्यांच्या कालावधीत अनेक गावांमध्ये मोठी कामे झाली असती. या कामांमधून मजूर वर्गाला दुष्काळी परिस्थितीत हाताला काम मिळाले असते; परंतु, केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने मजूर वर्गाला कामाच्या शोधात स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार