शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी : २६ गाढवं कोंडवाड्यात;मालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:33 IST

गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं तहसीलच्या पथकाने पकडली असून या गाढवांना धारखेडच्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं तहसीलच्या पथकाने पकडली असून या गाढवांना धारखेडच्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. वाळूच्या वाहतुकीसाठी टिप्पर, ट्रॅक्टर या वाहनांबरोबरच गाढवांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. महसूलचे पथक प्रत्येक वेळी ट्रॅक्टर, टिप्पर या वाहनांवर कारवाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाळू माफियांनी शक्कल लढवित गाढवांचा वापर वाढविला होता. गोदावरी नदीपात्रातून उपसलेली वाळू गाढवांच्या सहाय्याने नदीपासून दूर अंतरावर वाहून नेली जात होती. या ठिकाणी वाळूचा साठा केल्यानंतर तेथून वाहनांच्या सहाय्याने वाळू वाहतूक होत होती. त्यामुळे दिवसाढवळ्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरुन नेली जात असल्याचे लक्षात आल्याने ११ डिेसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्यासह नायब तहसीलदार किरण नारखे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, अक्षय नेमाडे, गजानन फड, रुपेश मुलंगे, दिलीप कासले यांच्या पथकाने धारखेड भागात वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं पकडली. तहसीलचे पथक कारवाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर गाढवांच्या मालकांनी तेथून धूम ठोकली. पथकाने पकडलेली गाढवं धारखेड ग्रामपंचायतीचे सेवक मुंजाजी मुगाजी चोरघडे यांच्या ताब्यात दिली असून ग्रा.पं.च्या कोंडवाड्यात ही गाढवं बंदिस्त करण्यात आली आहेत. पकडलेल्या २६ गाढवांचे मालक कोंडवाड्याकडे आले तर त्यांना परस्पर गाढवं न देता तहसील कार्यालयात हजर होण्याच्या सूचना सरपंच, ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत....तर गाढवांचा होणार लिलावअवैध वाळू वाहतूक करणारे गाढवं धारखेड ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बंदिस्त करण्यात आली आहेत. या गाढवांचे मालक समोर येण्यासाठी तीन दिवसांचा कालवधी दिला असून या तीन दिवसांत गाढवं नेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही तर तहसील प्रशासनाच्या वतीने २६ गाढवांचा लिलाव केला जाईल, अशी माहिती तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी दिली.एक गाढव दगावलेदरम्यान, तहसील प्रशासनाने २६ गावढं धारखेड येथील ग्रा.पं. कार्यालयात बंदिस्त केल्यानंतर एक गाढव दगावल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनिवास कारले यांनी धारखेड येथे जावून शवविच्छेदन केले. हे गाढव कशामुळे दगावले, हे समजू शकले नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग