शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परभणी ; गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:13 IST

जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास ८ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप मोठा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. १४ जून २०१८ चा विचार करता या दिवसापर्यंत जिल्ह्यात गतवर्षी १११.३५ मि.मी. पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १४ जूनपर्यंत फक्त २२.४१ मि.मी. पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याची या दिवसापर्यंतची १२६.६१ मि.मी. पावसाची सरासरी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २५ टक्केच पाऊस झाल्याने यावर्षीही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहते की नाही, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी बळीराजाचे आकाशाकडे डोळे लागले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. राज्य शासनानेही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या दुष्काळातून जिल्हावासिय अद्यापही सावरलेले नाहीत. अशातच पाणीटंचाईमुळे सर्व सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. सिद्धेश्वर धरणात १४ जूनपर्यंत १६९.८९ दलघमी मृत पाणीसाठा आहे. तर येलदरी धरणात १२४.६७ दलघमी मृतसाठा आहे. जिवंत पाणीसाठा नसल्याने या मृतसाठ्यातूनच या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना पाणी द्यावे लागत आहे. याशिवाय निम्न दुधना प्रकल्पात १३ जूनपर्यंत २४२.२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीही या धरणात अत्यल्प पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे लवकर पाऊस पडावा, अशी अपेक्षा नागरिकांना वाटू लागली आहे.२८ जूनपर्यंत : दोनच दिवस पावसाचा अंदाज४हवामानाचा अंदाज व्यक्त करणाºया स्कायमेट या खाजगी संस्थेने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात २८ जूनपर्यंत फक्त दोनच दिवस पाऊस पडेल, असे सांगितले आहे. त्यामध्ये १६ आणि २० जून या दोन दिवशीच काहीसा पाऊस पडेल, अन्यथा २८ जूनपर्यंत पावसाची सुताराम शक्यता नाही, असे या वेबसाईटचे म्हणणे आहे.४स्कायमेटच्या या अंदाजामुळे जिल्हावासियांच्या घशाची कोरड वाढली आहे. त्यामुळे या संस्थेचा अंदाज खोटा ठरुन धो-धो पाऊस बरसावा, अशीच मनोमन अपेक्षा जिल्हावासियांना वाटू लागली आहे.मानवतमध्ये सर्वाधिक पाऊस४यावर्षी १४ जूनपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३८.९९ मि.मी. पाऊस मानवत तालुक्यात पडल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यात ३६.२५ मि.मी. तर पालम तालुक्यात ३२ मि.मी. पाऊस झाला आहे.४ पूर्णा तालुक्यात २४.६० मि.मी. तर सोनपेठ तालुक्यात १८.५० मि.मी., परभणी तालुक्यात १७.१४, पाथरी तालुक्यात १६ मि.मी., जिंतूर तालुक्यात ११ मि.मी. आणि सेलू तालुक्यात फक्त ७ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशल