शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परभणी ; गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:13 IST

जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास ८ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप मोठा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. १४ जून २०१८ चा विचार करता या दिवसापर्यंत जिल्ह्यात गतवर्षी १११.३५ मि.मी. पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १४ जूनपर्यंत फक्त २२.४१ मि.मी. पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याची या दिवसापर्यंतची १२६.६१ मि.मी. पावसाची सरासरी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २५ टक्केच पाऊस झाल्याने यावर्षीही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहते की नाही, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी बळीराजाचे आकाशाकडे डोळे लागले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. राज्य शासनानेही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या दुष्काळातून जिल्हावासिय अद्यापही सावरलेले नाहीत. अशातच पाणीटंचाईमुळे सर्व सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. सिद्धेश्वर धरणात १४ जूनपर्यंत १६९.८९ दलघमी मृत पाणीसाठा आहे. तर येलदरी धरणात १२४.६७ दलघमी मृतसाठा आहे. जिवंत पाणीसाठा नसल्याने या मृतसाठ्यातूनच या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना पाणी द्यावे लागत आहे. याशिवाय निम्न दुधना प्रकल्पात १३ जूनपर्यंत २४२.२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीही या धरणात अत्यल्प पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे लवकर पाऊस पडावा, अशी अपेक्षा नागरिकांना वाटू लागली आहे.२८ जूनपर्यंत : दोनच दिवस पावसाचा अंदाज४हवामानाचा अंदाज व्यक्त करणाºया स्कायमेट या खाजगी संस्थेने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात २८ जूनपर्यंत फक्त दोनच दिवस पाऊस पडेल, असे सांगितले आहे. त्यामध्ये १६ आणि २० जून या दोन दिवशीच काहीसा पाऊस पडेल, अन्यथा २८ जूनपर्यंत पावसाची सुताराम शक्यता नाही, असे या वेबसाईटचे म्हणणे आहे.४स्कायमेटच्या या अंदाजामुळे जिल्हावासियांच्या घशाची कोरड वाढली आहे. त्यामुळे या संस्थेचा अंदाज खोटा ठरुन धो-धो पाऊस बरसावा, अशीच मनोमन अपेक्षा जिल्हावासियांना वाटू लागली आहे.मानवतमध्ये सर्वाधिक पाऊस४यावर्षी १४ जूनपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३८.९९ मि.मी. पाऊस मानवत तालुक्यात पडल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यात ३६.२५ मि.मी. तर पालम तालुक्यात ३२ मि.मी. पाऊस झाला आहे.४ पूर्णा तालुक्यात २४.६० मि.मी. तर सोनपेठ तालुक्यात १८.५० मि.मी., परभणी तालुक्यात १७.१४, पाथरी तालुक्यात १६ मि.मी., जिंतूर तालुक्यात ११ मि.मी. आणि सेलू तालुक्यात फक्त ७ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशल