शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी : २१ लाख मे. टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:57 IST

जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी सरत्या हंगामात २१ लाख ७१६ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एमआरपीपोटी २२५ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी सरत्या हंगामात २१ लाख ७१६ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एमआरपीपोटी २२५ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे.जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड शुगर, पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वर शुगर, पाथरी येथील रेणुका शुगर, पूर्णा येथील बळीराजा शुगर आणि परभणी तालुक्यातील त्रिधारा शुगर या पाच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम मार्च महिन्यात संपले आहेत. साधारणत: नोव्हेंबर २०१८ मध्ये कारखान्यांनी ऊस गाळपास सुरुवात केली. गतवर्षी जायकवाडीचे पाणी जिल्ह्याला मिळाल्याने उसाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता होती; परंतु, पाचही साखर कारखान्यांनी चांगल्या प्रकारे गाळप करुन उसाचा प्रश्न मार्गी लावला. या हंगामात गंगाखेड शुगर कारखान्याने ९ लाख १ हजार ११९ मे. टन उसाचे गाळप केले. त्यापोटी या कारखान्याने एफआरपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ८९ कोटी ५५ लाख रुपये वितरित केले आहेत. आणखी ५१ कोटी ३० लाख रुपये शेतकºयांना वितरित करणे बाकी आहे. लिंबा येथील योगेश्वरी साखर कारखान्याने यावर्षी १ लाख ९५ हजार २ मे.टन उसाचे गाळप केले. त्यामाध्यमातून शेतकºयांना २० कोटी ४० लाख रुपये एफआरपीपोटी वितरित केले. आणखी २१ कोटी ४३ लाख रुपये वितरित करणे बाकी आहेत. पूर्णा येथील बळीराजा साखर कारखान्याने ५ लाख ५६ हजार २८२ मे.टन उसाचे गाळप केले. त्या माध्यमातून ८२ कोटी २५ लाख रुपये एफआरपीद्वारे शेतकºयांना वितरित केले असून आणखी २१ कोटी २ लाख रुपये एफआरपीपोटी शेतकºयांना वितरित करणे बाकी आहे. पाथरी येथील रेणुका शुगर साखर कारखान्याने यावर्षी १ लाख ९० हजार ४६० मे.टन उसाचे गाळप केले. त्यातून एफआरपीपोटी शेतकºयांना २१ कोटी ६४ लाख रुपये वितरित केले आहेत. आणखी १५ कोटी ७३ लाखांची एफआरपीची रक्कम थकित आहे.परभणी तालुक्यातील त्रिधारा शुगर कारखान्याने यावर्षी २ लाख ५७ हजार ८५३ मे.टन उसाचे गाळप केले. एफआरपीपोटी या कारखान्याने शेतकºयांना ११ कोटी ७९ लाख रुपये वितरित केले आहेत. उर्वरित ३६ कोटी ९ लाख रुपये एफआरपीची थकबाकी राहिली आहे. पाच कारखान्यांनी एकूण २१ लाख ७१६ मे.टन उसाचे गाळप केले. त्यापोटी या कारखान्याने २२५ कोटी ६५ लाख रुपये एफआरपीपोटी दिले आहेत. तर १४५ कोटी ५७ लाख रुपये एफआरपी या कारखान्यांकडे बाकी आहे. या संदर्भातील थकित ऊस दर देय बाकीचा गोषवारा १५ एप्रिल रोजी राज्याचे साखर संचालक शेखर गायकवाड यांनी घोषित केला आहे.नृसिंह व महाराष्ट्र शुगर साखर कारखान्यांकडे : १२ कोटी रुपयांची थकबाकीजिल्ह्यातील २ साखर कारखान्यांकडे मागील सर्व गळीत हंगामातील १२ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी राहिली आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील लोहगाव येथील नृसिंह साखर कारखान्याकडे २ कोटी २० लाख ५३ हजार रुपये शेतकºयांचे थकले असून ही रक्कम २०११-१२ या आर्थिक वर्षातील आहे. तसेच सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर कारखान्याकडे शेतकºयांचे तब्बल ९ कोटी ९२ लाख रुपये थकले आहेत.त्यामध्ये २०१४-१५ मधील ५ कोटी ६९ लाख, २०१५-१६ या आर्थिक वर्षातील ४ कोटी २२ लाख ४७ हजार रुपयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शेतकºयांचे २ कोटी ५ लाख २५ हजार ९८५ रुपये थकविल्या प्रकरणी या कारखान्याचे चेअरमन अभिजीत देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.२५ एप्रिल रोजीच देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी फेटाळला आहे. दरम्यान, २४० शेतकºयांनी फसवणुकीची तक्रार केली होती. अनेक महिन्यांपासून हे शेतकरी थकबाकीची रक्कम मागत आहेत; परंतु, त्यांना दाद दिली जात नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. आता या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरु झाल्याने शेतकºयांना थकबाकीची रक्कम कधी मिळेल, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSugar factoryसाखर कारखाने