शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

परभणी : उच्चदाब प्रणाली योजनेत कंत्राटदारांना २६ नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:51 IST

उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषीपंपासह घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी ८६ कोटींची कामे मंजूर करण्यात आली; परंतु, या योजनेत मुदत संपूनही कामे पूर्ण न झाल्याने महावितरण कंपनीने २१ कंत्राटदारांना अमाधानकारक कामे असल्याच्या कारणावरून २६ नोटिसा पाठविल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषीपंपासह घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी ८६ कोटींची कामे मंजूर करण्यात आली; परंतु, या योजनेत मुदत संपूनही कामे पूर्ण न झाल्याने महावितरण कंपनीने २१ कंत्राटदारांना अमाधानकारक कामे असल्याच्या कारणावरून २६ नोटिसा पाठविल्या आहेत.जिल्ह्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरुन वीज जोडणीसाठी प्रलंबित असणाºया कृषी पंपाच्या लाभार्थ्यांसाठी महावितरणने उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंमलात आणली होती. या योजनेत ३ हजार ९६३ कृषीपंप धारकांचा समावेश करण्यात आला. या योजनेत ८६ कोटी रुपयांचा खर्च करुन ३ हजार ४८२ स्वतंत्र रोहित्रे व ७४१ किलोमीटर उच्चदाब वाहिनीचे काम समाविष्ट करण्यात आले. ही कामे करण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये २१ कंत्राटदारांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले. या योजनेतील कामे ३१ डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत संबंधित कंत्राटदाराने पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु, या कंत्राटदाराने ३ हजार ९६३ कृषीपंपधारकांपैकी १ हजार ४४२ कृषीपंपाना वीज जोडणी देण्याचेच काम पूर्ण केले. ज्याची टक्केवारी ही केवळ ३६.३८ एवढी राहिली आहे. जानेवारी २०२० अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यात केवळ १ हजार ७०५ वीज जोडण्या पूर्ण करण्यात आल्या असून २ हजार २७८ कामेही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या योजनेतील कंत्राटदारांकडून संथगतीने कामे होत असल्याने लाभार्थी कृषी पंपधारकांनी आ. डॉ. राहुल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत महावितरण कंपनीच्या उच्चदाब प्रणालीअंतर्गत कामे अपूर्ण असून, लाभार्थी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणने या योजनेतील कामाची चौकशी केली असून ज्या कंत्राटदारांच्या कामाची प्रगती अमसमाधानकारक आहे, अशा २१ कंत्राटदारांना आतापर्यत कामांमध्ये सुधारणा कराव्यात यासाठी २६ नोटिसा बजावल्याचे उतर दिले आहे. त्यामुळे या योजनेतील कामांचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.उपकंत्राटदारांचा भरणा झाल्यानेच कामे खोळंबली४राज्य शासन व उर्जा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ३ हजार ९६३ कृषीपंप धारकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी ८६ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. यामध्ये ३ हजार ९६३ स्वतंत्र कृषीपंप उभारणे, ७४१ किलोमीटर उच्चदाब वाहिनी अंथरणे ही कामे समाविष्ट करण्यात आली होती; परंतु, या कामासाठी महावितरण कंपनीने २१ कंत्राटदारांचा समावेश करुन त्यांना कार्यारंभ आदेश दिले; परंतु, या २१ कंत्राटदारांमध्ये बहुतांश कंत्राटदार हे उप कंत्राटदार असल्याने कामाच्या दर्जाबाबत सातत्य राखण्यात आले नाही. विशेष म्हणजे या योजनेतील कामे वेळेत पूर्ण करण्याकडेही या कंत्राटदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या योजनेतील कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. याचा कृषीपंपधारकांना बसला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण