शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

परभणी : वझर परिसरातील १६ गावे ५० तासांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:28 IST

जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़

जयंत मते।लोकमत न्यूज नेटवर्कवझर बु़ (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़१५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वझर आणि परिसरात वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसात ३३ केव्ही उपकेंद्रातून वीज पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळले़ परिणामी, १६ गावांमधील वीज पुरवठा बंद झाला आहे़ वीज नसल्याने या गावात पाण्याचा प्रश्नही अधिकच बिकट झाला आहे़ शिवाय घराबाहेर रात्र काढावी लागत आहे़ वीज वितरण कंपनीने अजूनही दुरुस्तीची कामे सुरू केली नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे़ सायखेडा, बेलखेडा, कवडा, उमरद, सावंगी, धमधम, असोला इ. गावांतील वीज पुरवठा खंडित झालेला आहे़ विशेष म्हणजे सावंगी भांबळे परिसरात ३५ ते ४० विजेचे खांब पडले आहेत़ सोमवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा शनिवारी उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता़ वीज वितरण कंपनी संथगतीने काम करीत आहे़ शुक्रवारी या भागात विजेचे खांब आणून टाकले आहेत़ सहा दिवसानंतर आतापर्यंत केवळ खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे़ उन्हाळ्यातील कडक ऊन आणि रात्री उकाडा सहन करावा लागत असल्याने वीज कंपनीच्या कारभाराविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़ एकदाच १६ गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासह दैनंदिन प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPower Shutdownभारनियमन