शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

परभणी : वझर परिसरातील १६ गावे ५० तासांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:28 IST

जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़

जयंत मते।लोकमत न्यूज नेटवर्कवझर बु़ (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़१५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वझर आणि परिसरात वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसात ३३ केव्ही उपकेंद्रातून वीज पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळले़ परिणामी, १६ गावांमधील वीज पुरवठा बंद झाला आहे़ वीज नसल्याने या गावात पाण्याचा प्रश्नही अधिकच बिकट झाला आहे़ शिवाय घराबाहेर रात्र काढावी लागत आहे़ वीज वितरण कंपनीने अजूनही दुरुस्तीची कामे सुरू केली नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे़ सायखेडा, बेलखेडा, कवडा, उमरद, सावंगी, धमधम, असोला इ. गावांतील वीज पुरवठा खंडित झालेला आहे़ विशेष म्हणजे सावंगी भांबळे परिसरात ३५ ते ४० विजेचे खांब पडले आहेत़ सोमवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा शनिवारी उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता़ वीज वितरण कंपनी संथगतीने काम करीत आहे़ शुक्रवारी या भागात विजेचे खांब आणून टाकले आहेत़ सहा दिवसानंतर आतापर्यंत केवळ खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे़ उन्हाळ्यातील कडक ऊन आणि रात्री उकाडा सहन करावा लागत असल्याने वीज कंपनीच्या कारभाराविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़ एकदाच १६ गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासह दैनंदिन प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPower Shutdownभारनियमन