शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वझर परिसरातील १६ गावे ५० तासांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:28 IST

जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़

जयंत मते।लोकमत न्यूज नेटवर्कवझर बु़ (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़१५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वझर आणि परिसरात वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसात ३३ केव्ही उपकेंद्रातून वीज पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळले़ परिणामी, १६ गावांमधील वीज पुरवठा बंद झाला आहे़ वीज नसल्याने या गावात पाण्याचा प्रश्नही अधिकच बिकट झाला आहे़ शिवाय घराबाहेर रात्र काढावी लागत आहे़ वीज वितरण कंपनीने अजूनही दुरुस्तीची कामे सुरू केली नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे़ सायखेडा, बेलखेडा, कवडा, उमरद, सावंगी, धमधम, असोला इ. गावांतील वीज पुरवठा खंडित झालेला आहे़ विशेष म्हणजे सावंगी भांबळे परिसरात ३५ ते ४० विजेचे खांब पडले आहेत़ सोमवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा शनिवारी उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता़ वीज वितरण कंपनी संथगतीने काम करीत आहे़ शुक्रवारी या भागात विजेचे खांब आणून टाकले आहेत़ सहा दिवसानंतर आतापर्यंत केवळ खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे़ उन्हाळ्यातील कडक ऊन आणि रात्री उकाडा सहन करावा लागत असल्याने वीज कंपनीच्या कारभाराविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़ एकदाच १६ गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासह दैनंदिन प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPower Shutdownभारनियमन