शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

परभणी : महिनाभरापासून १६ गाव पाणीपुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:45 IST

जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाला पाणीपुररवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे महिनाभरापासूून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दोन विभागाच्या वादात येथील पाणीपुरवठा बंद असल्याचे समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाला पाणीपुररवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे महिनाभरापासूून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दोन विभागाच्या वादात येथील पाणीपुरवठा बंद असल्याचे समोर येत आहे.जिंतूर तालुक्यातील कौसडी हे १० ते १२ हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाची तहान भागविण्यासाठी १६ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. जिंंतूर तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत असलेल्या गावांना मूबलक पाणी मिळत होते. या योजनेंतर्गत कौसडी, बोरी, कान्हड, हट्टा, कुपटा यासह अन्य गावांना पाणीपुरवठा केला जातो; परंतु, मागील काही दिवसांपासून या योजनेला नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे.कधी वीजपुरवठा खंडित होतो तर कधी विद्युत मोटार जळते. त्याचबरोबर सद्यस्थितीत या योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. ही गळती दुरुस्त केल्याशिवाय पाणीपुरवठा होणार नाही. मागील महिनाभरापासून गळती दुरुस्तीअभावी या योजनेंतर्गत पाणीपुरवठा बंद आहे. ही गळती दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसा नाही. या योजनेंतर्गत दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीेने जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाकडे २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव तयार करून पाठविला आहे; परंतु, अद्यापही हा पैसा ग्रा.पं.ला मिळाला नाही. त्यामुळे दुरुस्तीअभावीे पाणीपुरवठा बंद आहे. किरकोळ दुरुस्तीअभावी ग्रामस्थांना दोन ते तीन कि.मी. पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे.दुरुस्तीची कामे तत्काळ करून गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी कौसडी ग्रामस्थांच्या वतीने २८ जून रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली होती. निवेदनावर शेख रहीम शेख शिकूर, हरिभाऊ खैरे, सोनाजी जिवने, सय्यद कदीर, शेख गुलाब नबी, शेख नसीर, भगवान कुटे, आनंदा इखे, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद हराळे, नारायण काळे, शेख सलीम, महादू तायडे, दत्ता काळे, बाळासाहेब जिवने, विनायक ढवळशंख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, एकीकडे राज्य शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ग्रामस्थांना पाण्याची सुविधा करून देत आहे. तर दुसरीकडे किरकोळ दुरुस्तीअभावी ग्रामस्थांना पायपीट करीत पाणी आणावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.ग्रामसेवक नसल्याने कामे रखडलीकौसडी ग्रामपंचायतीला मागील महिनाभरापासून ग्रामसेवक नसल्याने ग्रा.पं.ची अनेक कामे रखडली आहेत. १६ गाव पाणीपुरवठा योजना केवळ एका लिकेजमुळे बंद आहे. ग्रामसेवकाचे पद रिक्त असल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे ग्रामसेवकाची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी जिंतूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी