शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : लोकन्यायालयात १६९७ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:18 IST

येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये रविवारी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली़ परभणी जिल्हा न्यायालयात सकाळी १०़३० वाजता प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांच्या हस्ते लोक न्यायालयाचे उद्घाटन झाले़ यावेळी जिल्हा न्यायाधीश ए़एम़ पाटील, वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड़ मनोज कुंभारीकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर शेख जाफर यांनी प्रास्ताविकात लोकन्यायालयातील पॅनल विषयी माहिती दिली़ अध्यक्षीय समारोप करताना प्रमुख जिल्हा सत्र न्या़ उर्मिला जोशी म्हणाल्या, जास्तीत जास्त प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवून ती निकाली काढावीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कुलकर्णी यांनी केले़ न्या़ एस़एस़ खिरापते यांनी आभार मानले़ या लोकन्यायालयामध्ये फौजदारी, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवाविषयक प्रकरणे, महसूल, दिवाणी आणि बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती़ त्यात दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या ५४० प्रकरणांमध्ये तडजोड झाली़ त्यातून ६ कोटी ८२ लाख ५६ हजार १ रुपयांची वसुली झाली़ तसेच ११५७ वाद दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात २ कोटी ६६ लाख ३२ हजार ६८६ रुपये वसूल झाले़ दोन्ही मिळून १६९७ प्रकरणे निकाली निघाली असून, ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती न्यायालयाच्या सूत्राने दिली़पाथरीत २८ प्रकरणे निकालीपाथरी तालुका विधि सेवा समितीच्या वतीने आयोजित लोक न्यायालयात २८ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ पाथरी न्यायालयात आयोजित या लोक न्यायालयास बँक व्यवस्थापक दास, उपशाखा व्यवस्थापक डी़एम़ गोयले, वसुली प्रतिनिधी प्रकाश मोरे यांची उपस्थिती होती़ या लोकन्यायालयात भारतीय स्टेट बँक कृषी शाखेने ४० वादपूर्व प्रकरणे ठेवली होती़ त्यापैकी २८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली़ त्यात ५१ लाख ४२ हजार रुपयांपैकी २६ लाख ९२ हजार रुपये जमा करण्यात आले़ तडजोड प्रकरणे ३१ मार्चपर्यंत पूर्ण केली असून, कृषी क्षेत्रातील कर्ज प्रकरणात तडजोड झाल्यानंतर लाभधारकास नवीन कर्ज दिले जाईल, असे शाखा व्यवस्थापक दास यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीconsumerग्राहक