शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

परभणी : साडेदहा कोटी कंत्राटदाराच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:32 IST

शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे.महानगरपालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येक नळ जोडणीसाठी २ हजार रुपये अनामत रक्कम व ९ हजार रुपये एजन्सीसाठी नळ जोडणी, मीटर, रस्ता दुरुस्ती, १५ मीटर पाईप आदी साहित्य देण्यासाठी असे एकूण ११ हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. मनपात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधी पक्षात असताना या पक्षाचे पदाधिकारी या विषयावर गप्प बसले असताना सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकानेच आता या योजनेचा ढिसाळ कारभार आता चव्हाट्यावर आणला आहे. या संदर्भात काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी सांगितले की, नवीन नळ जोडणीसाठी २ हजार रुपये अनामत व ९ हजार रुपये नळ जोडणी देण्यासाठी मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीला नागरिकांनी द्यायचे आहेत. यामध्ये सदरील खाजगी एजन्सी १५ मीटर पाईप, कपलिंग, पाण्याचे मीटर व रस्ता दुरुस्तीसाठी काँक्रिट वापरणे आदी कामे करणार आहे. शहरामध्ये नवीन पाईपलाईन रस्त्याच्या एका बाजुला टाकलेली असून नागरिकांना नळ जोडणी घेण्यासाठी तीन मीटर पाईप लागणार आहे, असे असताना नागरिकांकडून सक्तीने १५ मीटरचे पैसे एजन्सीला द्यावे लागणार आहेत. तसेच एका बाजूस असलेल्या नळजोडणी धारकास रस्ता खोदण्याचे काम पडणार नसतानाही रस्ता दुरुस्तीचे व पुर्ण खोदकामाचे पैसे एजन्सीला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास ३५ हजार नळधारकांचे अंदाजे प्रत्येकी तीन हजार रुपये काहीही काम न करता एजन्सीला फुकटात मिळणार आहेत. म्हणजेच जवळपास १० कोटी ५० लाख रुपये हे आयते एजन्सीच्या खिशात जाणार आहेत. त्यामुळे सदरील तीन हजार रुपयांची रक्कम एकूण रक्कमेतून कपात करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांची मागणी योग्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.२६ हजार नळधारकांच्या अनामत रकमेवर मनपाचा कब्जा४महानगरपालिकेकडील अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या २६ हजार नळजोडणीधारक आहेत. प्रत्येक नळ जोडणीधारकाने नळ जोडणी घेताना मनपाकडे अनामत रक्कम जमा केलेली आहे. नवीन योजनेंतर्गत नळ जोडणी घेताना जुन्या रक्कमे संदर्भात कोणतीही भूमिका मनपाने घेतलेली नाही. त्यामुळे प्रत्येक नळ जोडणीधारकास मनपाने निश्चित केलेली ११ हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे ज्या २६ हजार नळ जोडणी धारकांनी अनामत रक्कम मनपाकडे अनेक वर्षापासून जमा केली होती. त्या रक्कमेवर मनपाचा कब्जा झाला आहे. सदरील रक्कमही अनामत रक्कमेमधून वजा करावी, अशी मागणी नगरसेवक सचिन देशमुख यांनी केली आहे.एजन्सीला झुकते माप४नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या एजन्सीला सत्ताधारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून झुकते माप देण्यात येत असल्याची चर्चा मनपात सुरु आहे. या संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच एजन्सी निश्चित करण्यात आली होती व सदरील एजन्सी ही यापूर्वीच पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मनपाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या संदर्भातील एजन्सी निवडत असताना स्पर्धाच झाली नसल्याचे समजते. त्यामुळे सदरील एजन्सीला झुकते माप देण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी