शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

परभणी : साडेदहा कोटी कंत्राटदाराच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:32 IST

शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे.महानगरपालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येक नळ जोडणीसाठी २ हजार रुपये अनामत रक्कम व ९ हजार रुपये एजन्सीसाठी नळ जोडणी, मीटर, रस्ता दुरुस्ती, १५ मीटर पाईप आदी साहित्य देण्यासाठी असे एकूण ११ हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. मनपात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधी पक्षात असताना या पक्षाचे पदाधिकारी या विषयावर गप्प बसले असताना सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकानेच आता या योजनेचा ढिसाळ कारभार आता चव्हाट्यावर आणला आहे. या संदर्भात काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी सांगितले की, नवीन नळ जोडणीसाठी २ हजार रुपये अनामत व ९ हजार रुपये नळ जोडणी देण्यासाठी मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीला नागरिकांनी द्यायचे आहेत. यामध्ये सदरील खाजगी एजन्सी १५ मीटर पाईप, कपलिंग, पाण्याचे मीटर व रस्ता दुरुस्तीसाठी काँक्रिट वापरणे आदी कामे करणार आहे. शहरामध्ये नवीन पाईपलाईन रस्त्याच्या एका बाजुला टाकलेली असून नागरिकांना नळ जोडणी घेण्यासाठी तीन मीटर पाईप लागणार आहे, असे असताना नागरिकांकडून सक्तीने १५ मीटरचे पैसे एजन्सीला द्यावे लागणार आहेत. तसेच एका बाजूस असलेल्या नळजोडणी धारकास रस्ता खोदण्याचे काम पडणार नसतानाही रस्ता दुरुस्तीचे व पुर्ण खोदकामाचे पैसे एजन्सीला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास ३५ हजार नळधारकांचे अंदाजे प्रत्येकी तीन हजार रुपये काहीही काम न करता एजन्सीला फुकटात मिळणार आहेत. म्हणजेच जवळपास १० कोटी ५० लाख रुपये हे आयते एजन्सीच्या खिशात जाणार आहेत. त्यामुळे सदरील तीन हजार रुपयांची रक्कम एकूण रक्कमेतून कपात करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांची मागणी योग्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.२६ हजार नळधारकांच्या अनामत रकमेवर मनपाचा कब्जा४महानगरपालिकेकडील अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या २६ हजार नळजोडणीधारक आहेत. प्रत्येक नळ जोडणीधारकाने नळ जोडणी घेताना मनपाकडे अनामत रक्कम जमा केलेली आहे. नवीन योजनेंतर्गत नळ जोडणी घेताना जुन्या रक्कमे संदर्भात कोणतीही भूमिका मनपाने घेतलेली नाही. त्यामुळे प्रत्येक नळ जोडणीधारकास मनपाने निश्चित केलेली ११ हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे ज्या २६ हजार नळ जोडणी धारकांनी अनामत रक्कम मनपाकडे अनेक वर्षापासून जमा केली होती. त्या रक्कमेवर मनपाचा कब्जा झाला आहे. सदरील रक्कमही अनामत रक्कमेमधून वजा करावी, अशी मागणी नगरसेवक सचिन देशमुख यांनी केली आहे.एजन्सीला झुकते माप४नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या एजन्सीला सत्ताधारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून झुकते माप देण्यात येत असल्याची चर्चा मनपात सुरु आहे. या संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच एजन्सी निश्चित करण्यात आली होती व सदरील एजन्सी ही यापूर्वीच पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मनपाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या संदर्भातील एजन्सी निवडत असताना स्पर्धाच झाली नसल्याचे समजते. त्यामुळे सदरील एजन्सीला झुकते माप देण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी