शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

परभणी : साडेदहा कोटी कंत्राटदाराच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:32 IST

शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे.महानगरपालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येक नळ जोडणीसाठी २ हजार रुपये अनामत रक्कम व ९ हजार रुपये एजन्सीसाठी नळ जोडणी, मीटर, रस्ता दुरुस्ती, १५ मीटर पाईप आदी साहित्य देण्यासाठी असे एकूण ११ हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. मनपात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधी पक्षात असताना या पक्षाचे पदाधिकारी या विषयावर गप्प बसले असताना सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकानेच आता या योजनेचा ढिसाळ कारभार आता चव्हाट्यावर आणला आहे. या संदर्भात काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी सांगितले की, नवीन नळ जोडणीसाठी २ हजार रुपये अनामत व ९ हजार रुपये नळ जोडणी देण्यासाठी मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीला नागरिकांनी द्यायचे आहेत. यामध्ये सदरील खाजगी एजन्सी १५ मीटर पाईप, कपलिंग, पाण्याचे मीटर व रस्ता दुरुस्तीसाठी काँक्रिट वापरणे आदी कामे करणार आहे. शहरामध्ये नवीन पाईपलाईन रस्त्याच्या एका बाजुला टाकलेली असून नागरिकांना नळ जोडणी घेण्यासाठी तीन मीटर पाईप लागणार आहे, असे असताना नागरिकांकडून सक्तीने १५ मीटरचे पैसे एजन्सीला द्यावे लागणार आहेत. तसेच एका बाजूस असलेल्या नळजोडणी धारकास रस्ता खोदण्याचे काम पडणार नसतानाही रस्ता दुरुस्तीचे व पुर्ण खोदकामाचे पैसे एजन्सीला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास ३५ हजार नळधारकांचे अंदाजे प्रत्येकी तीन हजार रुपये काहीही काम न करता एजन्सीला फुकटात मिळणार आहेत. म्हणजेच जवळपास १० कोटी ५० लाख रुपये हे आयते एजन्सीच्या खिशात जाणार आहेत. त्यामुळे सदरील तीन हजार रुपयांची रक्कम एकूण रक्कमेतून कपात करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांची मागणी योग्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.२६ हजार नळधारकांच्या अनामत रकमेवर मनपाचा कब्जा४महानगरपालिकेकडील अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या २६ हजार नळजोडणीधारक आहेत. प्रत्येक नळ जोडणीधारकाने नळ जोडणी घेताना मनपाकडे अनामत रक्कम जमा केलेली आहे. नवीन योजनेंतर्गत नळ जोडणी घेताना जुन्या रक्कमे संदर्भात कोणतीही भूमिका मनपाने घेतलेली नाही. त्यामुळे प्रत्येक नळ जोडणीधारकास मनपाने निश्चित केलेली ११ हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे ज्या २६ हजार नळ जोडणी धारकांनी अनामत रक्कम मनपाकडे अनेक वर्षापासून जमा केली होती. त्या रक्कमेवर मनपाचा कब्जा झाला आहे. सदरील रक्कमही अनामत रक्कमेमधून वजा करावी, अशी मागणी नगरसेवक सचिन देशमुख यांनी केली आहे.एजन्सीला झुकते माप४नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या एजन्सीला सत्ताधारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून झुकते माप देण्यात येत असल्याची चर्चा मनपात सुरु आहे. या संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच एजन्सी निश्चित करण्यात आली होती व सदरील एजन्सी ही यापूर्वीच पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मनपाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या संदर्भातील एजन्सी निवडत असताना स्पर्धाच झाली नसल्याचे समजते. त्यामुळे सदरील एजन्सीला झुकते माप देण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी