शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

परभणी : १० वाळूघाट उपशासाठी झाले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:24 IST

जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल.जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूघाटाचे लिलाव रखडल्याने वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. परिणामी बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक कचाट्यात सापडले होते. दुष्काळी परिस्थिती आणि त्यात वाळूअभावी बांधकामे ठप्प असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांनी रोजीरोटीसाठी इतर व्यवसाय सुरु केले. तसेच वाळू मिळत नसल्याने शासकीय योजनांची कामेही ठप्प पडली होती. घरकुल बांधकामांसह इतर कामांवर वाळूचा मोठा परिणाम झाला. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने १५ वाळूघाट लिलावासाठी ठेवले होते. त्यापैकी १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून कंत्राटदाराने या वाळूघाटाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केल्यानंतर वाळूचा अधिकृत उपसा सुरु केला जाणार आहे.जिल्हा प्रशासनाने वाळू घाटांसाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यात दुस्सलगाव येथील वाळूघाट ६४ लाख ८४ हजार ५८४ रुपयांना जय नृसिंह बिल्डींग मटेरियल यांना सुटला आहे. काजळा रोहिणा हा वाळूघाट ३५ हजार ३१ हजार ४० रुपयांचा श्री साई भुसार दुकान या कंत्राटदारास मिळाला आहे. मुद्गल येथील वाळू घाट १ कोटी १३ लाख १८ हजार ४२८ रुपयांना शेख बिल्डींग मटेरियल यांनी घेतला आहे.पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील वाळू घाट ८१ लाख रुपयांना साई अर्थमूव्हर्स अ‍ॅण्ड बोअरवेल बिल्डींग या कंत्राटदारास, चिंचटाकळी येथील वाळूघाट ६१ लाख १ हजार १०० रुपयांना कृष्णा त्र्यंबक कचरे यांना मिळाला आहे. गुंजचा वाळू घाट ६४ लाख ९१ हजार रुपयांना अग्रवाल ट्रेडिंग कंपनीला, रावराजूर येथील वाळू घाट विष्णू शंकर नारणवार यांना १ कोटी १ लाख ९५ हजार रुपयांना मिळाला आहे. तर कुंभारी येथील वाळू घाट शेख चाँद शेख हबीब यांना ६० लाख ६२ हजार ६०० रुपयांना मिळाला आहे. वांगी येथील वाळू घाटाचा लिलाव झाला असून हा घाट १ कोटी १४ लाख ६ हजार ५४८ रुपयांना बप्पा श्री कन्स्ट्रक्शनला सुटला आहे. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील पार्डी येथील वाळू घाटाचाही लिलाव झाला असून हा घाट १२ लाख ४० हजार रुपयांना सुटला आहे.जिल्ह्यातील १० वाळू घाटांचे लिलाव पूर्ण झाल्याने या वाळू घाटामधून लवकरच वाळू उपसा होणार असून खुल्या बाजारपेठेत वाळू उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूची कृत्रिम टंचाई आहे. वाळू घाटांच्या लिलावामुळे आगामी काळात बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल, अशी शक्यता आहे.वाळूच्या किंमतीत घट होण्याची शक्यता४वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने खुल्या बाजारातून वाळू गायब झाली होती; परंतु, चोरुन- लपून वाळूची विक्री सुरुच होती. वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ० हजार रुपयांना तीन ब्रास वाळू मिळत होती. वाळूचे भाव गगनाला भिडल्याने नागरिक जेरीस आले होते. शिवाय काळ्या बाजारात वाळू खरेदी केल्यानंतर कारवाईचा धसका असल्याने वाळू खरेदीकडेच अनेकांनी पाठ फिरवली होती. दरम्यान, १० वाळू घाटांमधील अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने वाळूचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. यातून बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.७ कोटींचा महसूल होणार जमा४जिल्ह्यातील १० वाळू घाटांचे लिलाव झाल्याने या माध्यमातून प्रशासनातील तिजोरीमध्ये ७ कोटी ९ लाख ३० हजार ३०० रुपयांचा महसूल जमा होणार आहे. यावर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने जिल्हा प्रशासनाला महसूल जमा करताना अडचणींचा सामना करावा लागला. मार्च महिन्याच्या अखेरीस १० घाटांचे लिलाव झाल्याने ७ कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या महसुली उत्पादनात वाढ होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग