शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

परभणी : १६१ वाळू घाटांचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:07 IST

जिल्ह्यातील १६१ वाळू घाट लिलावामध्ये ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने या घाटांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर प्रत्यक्षात लिलावाच्या प्रक्रियेसाठी या वाळू घाटांची मान्यता घेतली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १६१ वाळू घाट लिलावामध्ये ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने या घाटांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर प्रत्यक्षात लिलावाच्या प्रक्रियेसाठी या वाळू घाटांची मान्यता घेतली जाणार आहे.जिल्ह्यात मागील वर्षभरापासून वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने वाळूचे भाव कडाडले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. मागील वर्षी सुरुवातीच्या काळात न्यायालयाच्या निर्णयामुळे वाळू घाटाचे लिलाव रखडले होते. सुरुवातीचे सहा महिने घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यानंतरच्या काळात हरित लवादाने लिलाव करण्यास परवानगी दिल्याने काही वाळू घाट लिलावात ठेवण्यात आले. या घाटांचा लिलाव झाल्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया न्यायालयात अडकली होती. मागील वर्षभरात केवळ १६ वाळू घाटांचे ई-लिलाव झाले. त्यामुळे संपूर्ण वर्षभर जिल्ह्यामध्ये वाळूचा प्रश्न निर्माण झाला होता. १० ते १२ हजार रुपये ३ ब्रास मिळणारी वाळू २० हजार रुपयांना ३ ब्रास या प्रमाणे विक्री होऊ लागली. अजूनही वाळूचे भाव कडाडलेले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर पुढील वर्षी वाळू घाटाचे लिलाव वेळेत व्हावेत आणि वाळू वेळेवर उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना नदीपात्रातील वाळू घाट लिलावासाठी ठेवले जातात.या वाळू घाटांचा लिलाव करण्यासाठी सुरुवातीला पर्यावरणाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १६१ नवीन घाटांचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूजल विभागाकडून सर्व्हेक्षण केले जात आहे.या सर्व्हेक्षणानंतर लिलावासाठी पात्र असलेल्या वाळू घाटांची यादी तयार करुन या वाळू घाटांच्या लिलावासाठी राज्यस्तरावरुन परवानगी घेतली जाणार असून त्यानंतर प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे वाळू घाटाच्या सर्व्हेक्षणाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.चार घाटांमधून उपसा सुरु४सद्यस्थितीला जिल्ह्यात चार वाळू घाट वाळूचा उपसा करण्यासाठी खुले आहेत. त्यामध्ये डिग्रस खु. या वाळू घाटातून ६६३ ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर देवठाणा वाळू घाटातून १३७२ ब्रास, गोगलगाव घाटातून ४४२ ब्रास आणि मंजरथ येथील वाळू घाटातून २९१५ ब्रास वाळूचा उपसा करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.४लिलावातील या तरतुदीनुसार वाळू उपसा झाल्यानंतर या घाटांची मुदतही संपणार आहे. त्यामुुळे जिल्हावासियांना खुल्या बाजारात केवळ ५ हजार ३९२ ब्रास वाळू मिळणार आहे. उपलब्ध वाळू कमी असल्याने सध्या तरी बांधकामे ठप्प आहेत. त्यामुळे जिल्हावासियांचे नवीन वाळू घाटांच्या लिलावाकडे लक्ष लागले आहे.१२ वाळू घाटांची संपली मुदत४जिल्ह्यात मागील वर्षी १६ वाळू घाटांचे लिलाव झाले होते. त्यापैकी १२ वाळू घाटांची मुदत संपली आहे.४पहिल्या टप्प्यामध्ये पार्डी, गुंज, रावराजूर, वांगी, मुद्गल, काजळे रोहिणा, धानोरा मोत्या, चिंचटाकळी, दुसलगाव, सावंगी मगर, धारखेड या वाळू घाटांना लिलावात दिलेल्या तरतुदीप्रमाणे वाळू उपसा पूर्ण झाला असल्याने या घाटांवरील वाळू उपसा बंद आहे. त्यामुळे नवीन वाळू घाटांच्या लिलावाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग