शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

परभणी : मृत महिलेसह १४ जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:15 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. सदरील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यासोबत इतर १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आतापर्यंत तरी दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. सदरील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यासोबत इतर १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आतापर्यंत तरी दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.परभणी तालुक्यातील एक महिला मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. सदरील महिलेस कोरोना सदृश्य लक्षणातील श्वसनचा त्रास होत होता. त्यामुळे सदरील महिलेस या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या महिलेच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल तब्बल दोन दिवसानंतर जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेना नि:श्वास टाकला आहे. असे असले तरी या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, प्रशासनाला मयत महिलेसह अन्य १३ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे अहवालही शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. असे असले तरी शुक्रवारी पुन्हा शासकीय रुग्णालयामध्ये १८ नवीन संशयित दाखल झाले. त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासण्यासाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत २८७ संशयितांची नोंद घेण्यात आली असून त्यातील २४२ जणांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यातील २०६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून २० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत १६ जणांचे स्वॅब तपासण्याची आवश्यकता नसल्याचे अहवाल प्रयोगाशाळेने दिला आहे. जिल्ह्यातील ११४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून २८ जण शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात आहेत. १४५ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे.आता मास्क घालणे प्रत्येकाला बंधनकारक४कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता प्रत्येकाला मास्क घालणे पोलिसांच्या वतीने बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा वेगाने प्रसार होतो. त्यामुळे जिल्ह्यात फिरतांना नागरिकांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावूनच फक्त अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडावे. मास्क किंवा रुमाल न वापरता भाजीपाला, किराणा साहित्य, औषधी आदी घ्यायचे आहे, अशी कारणे सांगून घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत कोणी घालू नये, अन्यथा त्यालाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असाही इशारा दिला आहे.पोलिसांना चकवा दिलेले ६ जण होम क्वारंटाईनमध्ये४पाथरी: जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्या तरी बाहेरुन येणाºयांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. मिळेल त्या मार्गाने ग्रामस्थ गावी परतत आहेत. १० एप्रिल रोजी पोलिसांना चकवा दिलेल्या ६ जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. आतापर्यंत तालुक्यात २७८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात बाहेरगावाहून येणाºया नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे; परंतु, बाहेरगावाहून येणाºया ग्रामस्थांचा ओघ सुरुच आहे. ९ एप्रिल रोजी तालुक्यातील गुंज येथे एक, १० एप्रिल रोजी कासापुरी, रामपुरी येथील एकास आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तर वडी येथे एक जण बाहेरगावाहून आल्याने त्यास पाथरी येथे आणण्यासाठी गेलेले दोघेजण, अशा एकूण ६ जणांना आरोग्य विभागाने गावामध्ये होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी.चौधरी यांनी दिली.दोन संशयितांचे घेतले स्वॅब४सोनपेठ: येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांचे १० एप्रिल रोजी स्वॅब घेण्यात आले असून हे स्वॅब पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ.सिद्धेश्वर हालगे यांनी दिली. सोनपेठ शहरात ९ एप्रिल रोजी दोघे जण दाखल झाले होते.या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता या दोघांचे स्वॅब घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या