शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

परभणी : मृत महिलेसह १४ जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:15 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. सदरील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यासोबत इतर १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आतापर्यंत तरी दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. सदरील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यासोबत इतर १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आतापर्यंत तरी दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.परभणी तालुक्यातील एक महिला मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. सदरील महिलेस कोरोना सदृश्य लक्षणातील श्वसनचा त्रास होत होता. त्यामुळे सदरील महिलेस या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या महिलेच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल तब्बल दोन दिवसानंतर जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेना नि:श्वास टाकला आहे. असे असले तरी या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, प्रशासनाला मयत महिलेसह अन्य १३ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे अहवालही शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. असे असले तरी शुक्रवारी पुन्हा शासकीय रुग्णालयामध्ये १८ नवीन संशयित दाखल झाले. त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासण्यासाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत २८७ संशयितांची नोंद घेण्यात आली असून त्यातील २४२ जणांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यातील २०६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून २० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत १६ जणांचे स्वॅब तपासण्याची आवश्यकता नसल्याचे अहवाल प्रयोगाशाळेने दिला आहे. जिल्ह्यातील ११४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून २८ जण शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात आहेत. १४५ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे.आता मास्क घालणे प्रत्येकाला बंधनकारक४कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता प्रत्येकाला मास्क घालणे पोलिसांच्या वतीने बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा वेगाने प्रसार होतो. त्यामुळे जिल्ह्यात फिरतांना नागरिकांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावूनच फक्त अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडावे. मास्क किंवा रुमाल न वापरता भाजीपाला, किराणा साहित्य, औषधी आदी घ्यायचे आहे, अशी कारणे सांगून घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत कोणी घालू नये, अन्यथा त्यालाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असाही इशारा दिला आहे.पोलिसांना चकवा दिलेले ६ जण होम क्वारंटाईनमध्ये४पाथरी: जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्या तरी बाहेरुन येणाºयांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. मिळेल त्या मार्गाने ग्रामस्थ गावी परतत आहेत. १० एप्रिल रोजी पोलिसांना चकवा दिलेल्या ६ जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. आतापर्यंत तालुक्यात २७८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात बाहेरगावाहून येणाºया नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे; परंतु, बाहेरगावाहून येणाºया ग्रामस्थांचा ओघ सुरुच आहे. ९ एप्रिल रोजी तालुक्यातील गुंज येथे एक, १० एप्रिल रोजी कासापुरी, रामपुरी येथील एकास आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तर वडी येथे एक जण बाहेरगावाहून आल्याने त्यास पाथरी येथे आणण्यासाठी गेलेले दोघेजण, अशा एकूण ६ जणांना आरोग्य विभागाने गावामध्ये होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी.चौधरी यांनी दिली.दोन संशयितांचे घेतले स्वॅब४सोनपेठ: येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांचे १० एप्रिल रोजी स्वॅब घेण्यात आले असून हे स्वॅब पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ.सिद्धेश्वर हालगे यांनी दिली. सोनपेठ शहरात ९ एप्रिल रोजी दोघे जण दाखल झाले होते.या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता या दोघांचे स्वॅब घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या