शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

परभणी : वर्षभरात ७३ नवजात बालकांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 22:30 IST

एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विविध कारणांवरुन ० ते ५ वर्षे वयोगटातील ७३ बालकांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या कालावधीत ३ मातांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विविध कारणांवरुन ० ते ५ वर्षे वयोगटातील ७३ बालकांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या कालावधीत ३ मातांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची जन्मसंख्या, मृत्यू, सर्वात कमी वजनाची बालके आदी संदर्भातील बाबींचा आढावा घेण्यात येतो. या बाबतची माहिती केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत येणाऱ्या हेल्थ मॅनेजमेंट इनफर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येत असते. या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच याबाबत शासनाला माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या १० महिन्यांच्या कालावधीत ० ते ५ वर्षे वयोगटातील ३८ मुली व ३५ मुले अशा ७३ नवजात अर्भक व बालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत २ आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत १ अशा दोन मातांचा बाळंतपणात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एचएमआयएसच्या अहवालानुसार राज्यात १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत १२ हजार १४७ अर्भकांचा मृत्यू झाला असून ११ हजार ६६ बालमृत्यू व नवजात मृत्यू झाले आहेत. तसेच १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत १ हजार ७० मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तत्त्पूर्वी २०१८-१९ या कालावधीत १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एचएमआयएसच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अकाली जन्मास आलेले बालक, जन्मत: कमी वजनाचे बालक, जंतू संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सीस, जन्मत: श्वासावरोध, आघात, रेस्पिरेटरी, डिस्ट्रेट सिंड्रोम आदी कारणांमुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमदू करण्यात आले आहे.बालमृत्यू , मातामृत्यू: कमी करण्यासाठी या योजना४ १३ व्या वित्त आयोगांतर्गत इंन्टेसीफाईड एचबीएनसी, होम बेस्ड केअर फॉर यंग चाईल्ड, जंत नाशक व जीवनसत्व अ मोहीम, अ‍ॅनिमियामुक्त भारत, अतिसार नियंत्रण पंधरवडा, ३५ अतिसंवेदनशील तालुक्यांचे सनियंत्रण, आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, नवजात शिशू स्थीरकरण कक्ष,४नवजात शिशू कोपरा, बालउपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रातील आशामार्फत अतिसार, न्यूमोनिया व सेप्सीस आजारांचे व्यवस्थापन४ भरारी पथक योजना, मातृत्व अनुदान योजना, दायी बैठक योजना, मान्सूनपूर्व उपाययोजना, नियमित लसीकरण, बालमृत्यू अन्वेषण, माता आरोग्य संबंधी योजना, गरोदरपणातील संपूर्ण तपासणी व उपचार, संस्थात्मक प्रसुती,४जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना आदी योजना या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीnew born babyनवजात अर्भक