शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

परभणी : ५ ब्रास वाळूचा निर्णय नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:49 IST

जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नसल्याने एकीकडे तब्बल २५ हजार रुपयांना ३ ब्रास वाळू काळ्या बाजारात विकली जात असताना प्रशासनाने मात्र संबंधित गावच्या ग्रामस्थांनी वाळूची मागणी केल्यानंतर त्यांना ४०० रुपये प्रति ब्रासने वाळू देण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या अनुपालन अहवालात दिली आहे. त्यामुळे हा निर्णय जिल्हाभरात तरी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नसल्याने एकीकडे तब्बल २५ हजार रुपयांना ३ ब्रास वाळू काळ्या बाजारात विकली जात असताना प्रशासनाने मात्र संबंधित गावच्या ग्रामस्थांनी वाळूची मागणी केल्यानंतर त्यांना ४०० रुपये प्रति ब्रासने वाळू देण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या अनुपालन अहवालात दिली आहे. त्यामुळे हा निर्णय जिल्हाभरात तरी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांमधील ६३ वाळू घाटांचा लिलाव करून नागरिकांना दरवर्षी वाळू उपलब्ध करुन दिली जाते. चालू आर्थिक वर्षात न्यायालयीन निर्णयामुळे या वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे अधिकृतरित्या जिल्ह्यात कोठेही वाळू उपलब्ध नाही; परंतु, अवैधरित्या वाळू उपसा करुन ती विकण्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. सद्यस्थितीत जवळपास २५ हजार रुपयांना तीन ब्रास वाळू विकली जात आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी ही वाळू इच्छित व्यक्तीला आणून दिली जाते. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. या सर्व प्रक्रियेत महसूल, पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात निर्माण झालेली कृत्रिम वाळू टंचाई लक्षात घेता २६ जून रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्या बैठकीचा अनुपालन अहवाल तब्बल ६ महिन्यानंतर २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या अहवालात प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना वाळू देण्यासंदर्भात नमूद केलेली माहितीच जाहीर नसल्याची बाब समोर आली आहे. अनुपालन अहवालातील माहितीनुसार १७ नोव्हेंबर २०१८ मधील विहित केलेल्या नियमांमध्ये वाळू उत्खनन करिता पर्यावरण अनुमती प्राप्त झालेल्या तथापि लिलावाद्वारे अंतिम न झालेल्या रेती गटातून तहसीलदार यांच्या लेखी पूर्व परवानगीचे जिल्हाधिकाऱ्यांनी राखीव ठेवलेल्या रेती गटातून ४०० रुपये प्रति ब्रासने गावातील कोणत्याही रहिवाशास त्याच्या घरगुती किंवा शेतीच्या प्रयोजनासाठी ५ ब्रासपर्यंत वाळू काढण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे उत्तर जिल्हा खनीकर्म अधिकाºयांनी दिले आहे. तसेच केंद्र शासनाच्या २०१६ च्या मार्गदर्शक तत्वानुसार गावकºयांच्या वैयक्तिक किंवा सामूदायिक कार्यासाठी ग्रा.पं.हद्दीतील नदी/ नाले/ ओढे इतर ठिकाणाहून वाळू त्याच ग्रामपंचायतच्या रहिवाशास पर्यावरण अनुमती न घेता तहसीलदारांच्या पूर्व परवानगीचे प्रचलित दरानुसार ५ ब्रासपर्र्यंत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या सूचनेची अंमलबजावणी किती तहसीलदारांनी केली हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हाभरात बहुतांश ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नाही. परिणामी शासकीय योजनेतील घरकुलांच्या बांधकामासाठी ग्रामस्थांना वाळू उपलब्ध झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील घरकुलांची कामे रखडली आहेत. ही बाब सातत्याने चर्चेत आली असताना प्रशासनाकडून मात्र कागदोपत्री माहितीचा ताळमेळ लावून ग्रामस्थांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना केल्याचे सांगितले जात आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल: घटकांकरीता विनामूल्य वाळू४जिल्हा खणीकर्म अधिकाºयांनी दिलेल्या लेखी माहितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरीता विनामूल्य वाळू उपलब्ध करुन देण्याचे आदेश तहसीलदारांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात अशी प्रकरणे बोटावर मोजण्या इतकी देखील नाहीत.४जिल्हा प्र्रशासनानेच अशा किती लाभार्थ्यांना विनामूल्य वाळू दिली? तसेच ४०० रुपये ब्रासने किती ब्रास व किती लाभार्थ्यांना वाळू दिली हे जाहीर करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग