शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २८ सार्वजनिक विहिरींना पाणीपुरवठ्यासाठी मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:06 IST

तालुक्यात काही भागात नित्याच्या बनलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक विहीर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेतून तालुक्यात पंचायत समितीकडे दाखल झालेल्या ६४ प्रस्तावांपैकी २८ सार्वजनिक विहिरींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यात काही भागात नित्याच्या बनलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक विहीर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेतून तालुक्यात पंचायत समितीकडे दाखल झालेल्या ६४ प्रस्तावांपैकी २८ सार्वजनिक विहिरींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. शासनाकडून सार्वजनिक पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या जातात. यामध्ये जलस्वराज्य प्रकल्प, भारत निर्माण योजना, त्यानंतर राष्ट्रीय पेयजल योजनेतून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची कामे करण्यात आली. काही ठिकाणी या योजनेतील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही दिसून आले तर काही ठिकाणी या योजना यशस्वी झाल्याचे पहावयास मिळत आहे. तालुक्यात मागील चार-पाच वर्षात दुष्काळसदृश्य व दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्या नंतर तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना रात्र-रात्र जागून दोन-दोन कि.मी.ची पायपीट करत पाणी आणावे लागते. त्यामुळे मानसिक संतापासह नागरिक त्रस्त होत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी अनेकवेळा तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन व राज्यशासनाकडून लावून धरली. त्यानंतर राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१९-२० या वर्षापासून पाणीपुरवठ्यासाठी सार्वजनिक विहिरीच्या कामांना निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. ज्या ग्रामपंचायतींना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवते अशा ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेवून तो पंचायत समिती प्रशासनाकडे सादर करावयाचा आहे. संबंधित ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाल्यानंतर त्या प्रस्तावावर कार्यवाही होवून तो प्रस्ताव पंचायत समिती प्रशासन, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सादर करते. त्यानंतर जि.प.चा पाणीपुरवठा विभाग त्यावर कार्यवाही करुन सार्वजनिक विहिर खोदण्यासाठी मान्यता देतो. मान्यता दिल्यानंतर सार्वजनिक विहिरीसाठी ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. यामध्ये ६० टक्के अकुशल व ४० कुशलवर खर्च करण्यात येतो.पाथरी पंचायत समितीकडे ६४ सार्वजनिक विहिरींचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छानणी समितीकडे ३९ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यातील एकूण २८ विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यातील सहा गावांतील विहिरींच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कामाचे मार्कआऊट देण्यात येवून मस्टर जनरेट करण्यातही आले आहे. त्यामुळे आगामी काळात २८ गावांतील ग्रामस्थांना उन्हाळ्यातील पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.या गावांतील विहिरींना दिली मान्यता४महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक विहिरींच्या कामास तालुक्यातील २८ गावांमध्ये विहीर खोदण्यास मान्यात देण्यात आली आहे. यामध्ये मरडसगाव, आनंदनगर, गोंडगाव, बाबूलतार, फुलारवाडी, डाकूपिंपरी गाव, डाकूपिंपरी वस्ती, अंधापुरी, लिंबा, लिंबा तांडा, रामपुरी खु., लिंबा (बनई वस्ती), कासापुरी, लोणी बु., वरखेड, देवेगाव, चाटेपिंपळगाव, जवळाझुटा, खेरडा सारोळा, पाटोदा, नाथरा, विटा बु., डोंगरगाव, उमरा, हादगाव (नितीननगर), हादगाव (शिवाजीनगर) या २८ गावांचा समावेश आहे. यामधील नाथरा, नाथरा नेहरुनगर, बाभळगाव, हादगाव, हादगाव (बु), वाघाळा या ६ गावांमध्ये कामे सुरू करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी