शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

'मी जिंवत आहे!'; कृषी अधिकाऱ्याने कामावर कार्यरत ६ मजुरांना दाखविले मयत

By मारोती जुंबडे | Updated: September 19, 2023 17:04 IST

मजुरांच्या आंदोलनानंतर कामावर रुजू होण्याचे दिले आदेश

परभणी : जिल्ह्यातील कृषी विभागांतर्गत गंगाखेड, चिखलठाणा, जिंतूर आणि परभणी या चार कृषी बीज गुणन केंद्रात कार्यरत सहा शेतमजुरांची कार्यालयीन अभिलेखात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलेला हा प्रकार मजुरांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी सोमवारी विविध ठिकाणच्या मजुरांसोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

गंगाखेड तालुका कृषी बीज केंद्रात शंकर थावरू राठोड, गंगूबाई राम जाधव, शिवाजी थावरू राठोड, जळबा रंगनाथ भालेराव हे सर्व जण, चिकलठाण्यात (ता. सेलू) हरिभाऊ नाथोबा वाघ तर परभणी फळ रोपवाटिकामध्ये कार्यरत हलीमाबी जैनुद्दीन या मजुरांना मयत दाखविण्यात आले. शेतमजुरास वर्षात २४० दिवस काम केले असता, त्यांना शासकीय सेवेत समावून घेण्याचा २०१९ मधील निर्णय आहे. या कामगारांसंदर्भातील पूर्वीच्या कायद्यानुसार त्यांना कृषी विभागाने कायम करणे आवश्यक आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही शेतमजूर या लाभापासून वंचित आहेत. त्यांना कायम करण्याऐवजी त्यातीलच काही मजुरांना विविध कारणे दाखवून अपात्र करत कामावरून कमी केले. तेवढेच नव्हे, तर सहा मजुरांना मयत म्हणून दाखविले. हा प्रकार मजुरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर आमदार राहुल पाटील यांनी आंदोलनस्थळी मजुरांची भेट घेऊन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हरणे यांची भेट घेऊन जाब विचारला. यावर त्यांनी तातडीने चूक दुरुस्त करून मजुरांना कामावर रुजू होण्याचे पत्र दिले.

कामावर रुजू करण्याचे दिले पत्रशिवाजी राठोड, शंकर राठोड तालुका बीज केंद्र गंगाखेड यांना उद्यापासून वयाच्या दाखल्याप्रमाणे गंगाखेडमध्ये कामावर घेण्यात येईल. त्याचबरोबर थकबाकी व नियमाप्रमाणे त्यांना महागाई भत्ता अनुदान मागणी करून त्यांना नियमाप्रमाणे कोर्ट आदेशाप्रमाणे मजुरी वेतन अदा करण्यात येईल, न्याय निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित प्रस्ताव आयुक्तालय कार्यालयास सादर करणार असल्याचे पत्र उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे यांनी संबंधित आंदोलकांना दिले.

न्यायालयीन लढा लढणारचूक झालेली कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली असता, त्यांनी त्या मजुरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले; परंतु जाणीवपूर्वक अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयीन लढा लढणार आहोत.- बळवंत मोरे, शेतकरी शेतमजूर पंचायत, राज्य उपाध्यक्ष

कृषी खात्याचे पाप जिवंत माणसाला मृत घोषित करण्याचे पाप या कृषी खात्याने केले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, मजुरांना महागाई भत्ता देण्यात यावा, २४० दिवस काम करणाऱ्या मजुरांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.- डॉ. राहुल पाटील, आमदार

नजर चुकीने झालेपंधरा दिवसांपुर्वी कृषी आयुक्तालयात मयत, अपात्र मजुरांचा प्रस्ताव पाठवला होता. यात नजर चुकीने काही मजुरांना मयत दाखविण्यात आले होते. परंतु, चुक लक्ष्यात आल्यावर आम्ही सुधारित प्रस्ताव तातडीने वरिष्ठांना पाठविला आहे.- आर.बी. हरणे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी