शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

पंचनाम्याची पद्धत शेतकऱ्यांची चेष्टा करणारी; यंत्रणेला लाजा कशा वाटत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:51 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांची यंत्रणेवर टीका

ठळक मुद्देओला दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चाशेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व पीक विम्याची मदत देणे आवश्यक

परभणी- शेतातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरसकट भरपाई देण्याऐवजी कागदपत्रे मागवून घेऊन शेतकऱ्यांची पंचनामे करणारी यंत्रणा चेष्टा करीत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी शहरातील मोंढ्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर मोर्चा दाखल झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना माज खा.राजू शेट्टी म्हणाले की, पीक विमा काढत असताना शेतकऱ्यांकडून सातबारा होल्डींग, आधार कार्ड आदी बाबतची सर्व कागदपत्रे घेण्यात आली आहेत. आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व पीक विम्याची मदत देणे आवश्यक असताना पुन्हा शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना हेलपाटे करायला लावले जात आहेत. पंचनामे करणारी यंत्रणा शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

शेतकरी खवळला तर तुमचे काही खरे नाही

विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना कदाचित हप्ते मिळत असावेत. त्यामुळेच कागदपत्रात शेतकऱ्यांना अडकवून विम्याची रक्कम न देण्याचा त्यांचा इरादा दिसतोय. पीक विमा योजना या कार्पोरेट कंपन्यासाठीच आहेत की काय? असे सद्यस्थितीत वाटत आहे. या विमा कंपन्या सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. शेतकऱ्यांकडूनही पैसे घेत आहेत. खोटे अहवाल तयार करुन या कंपन्यांनी गेल्या पाच-सहा वर्षात कोट्यवधी रुपये कमाविले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.डिजीटल इंडियाच्या गोष्टी तुम्ही करता मग शेतकऱ्यांना नोटकॅमचे फोटो कशाला काढायला लावता. सॅटेलाईट सर्व्हेक्षण करुन सरकगट नुकसान भरपाई झाल्याचे गृहित धरा व शेतकऱ्यांना मदत द्या, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तो एकदा खवळला तर तुमचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीagricultureशेतीagitationआंदोलनparabhaniपरभणी