शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

पंचनाम्याची पद्धत शेतकऱ्यांची चेष्टा करणारी; यंत्रणेला लाजा कशा वाटत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:51 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांची यंत्रणेवर टीका

ठळक मुद्देओला दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चाशेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व पीक विम्याची मदत देणे आवश्यक

परभणी- शेतातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरसकट भरपाई देण्याऐवजी कागदपत्रे मागवून घेऊन शेतकऱ्यांची पंचनामे करणारी यंत्रणा चेष्टा करीत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी शहरातील मोंढ्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर मोर्चा दाखल झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना माज खा.राजू शेट्टी म्हणाले की, पीक विमा काढत असताना शेतकऱ्यांकडून सातबारा होल्डींग, आधार कार्ड आदी बाबतची सर्व कागदपत्रे घेण्यात आली आहेत. आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व पीक विम्याची मदत देणे आवश्यक असताना पुन्हा शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना हेलपाटे करायला लावले जात आहेत. पंचनामे करणारी यंत्रणा शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

शेतकरी खवळला तर तुमचे काही खरे नाही

विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना कदाचित हप्ते मिळत असावेत. त्यामुळेच कागदपत्रात शेतकऱ्यांना अडकवून विम्याची रक्कम न देण्याचा त्यांचा इरादा दिसतोय. पीक विमा योजना या कार्पोरेट कंपन्यासाठीच आहेत की काय? असे सद्यस्थितीत वाटत आहे. या विमा कंपन्या सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. शेतकऱ्यांकडूनही पैसे घेत आहेत. खोटे अहवाल तयार करुन या कंपन्यांनी गेल्या पाच-सहा वर्षात कोट्यवधी रुपये कमाविले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.डिजीटल इंडियाच्या गोष्टी तुम्ही करता मग शेतकऱ्यांना नोटकॅमचे फोटो कशाला काढायला लावता. सॅटेलाईट सर्व्हेक्षण करुन सरकगट नुकसान भरपाई झाल्याचे गृहित धरा व शेतकऱ्यांना मदत द्या, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तो एकदा खवळला तर तुमचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीagricultureशेतीagitationआंदोलनparabhaniपरभणी