शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

पंचनाम्याची पद्धत शेतकऱ्यांची चेष्टा करणारी; यंत्रणेला लाजा कशा वाटत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:51 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांची यंत्रणेवर टीका

ठळक मुद्देओला दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चाशेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व पीक विम्याची मदत देणे आवश्यक

परभणी- शेतातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरसकट भरपाई देण्याऐवजी कागदपत्रे मागवून घेऊन शेतकऱ्यांची पंचनामे करणारी यंत्रणा चेष्टा करीत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी शहरातील मोंढ्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर मोर्चा दाखल झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना माज खा.राजू शेट्टी म्हणाले की, पीक विमा काढत असताना शेतकऱ्यांकडून सातबारा होल्डींग, आधार कार्ड आदी बाबतची सर्व कागदपत्रे घेण्यात आली आहेत. आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व पीक विम्याची मदत देणे आवश्यक असताना पुन्हा शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना हेलपाटे करायला लावले जात आहेत. पंचनामे करणारी यंत्रणा शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

शेतकरी खवळला तर तुमचे काही खरे नाही

विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना कदाचित हप्ते मिळत असावेत. त्यामुळेच कागदपत्रात शेतकऱ्यांना अडकवून विम्याची रक्कम न देण्याचा त्यांचा इरादा दिसतोय. पीक विमा योजना या कार्पोरेट कंपन्यासाठीच आहेत की काय? असे सद्यस्थितीत वाटत आहे. या विमा कंपन्या सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. शेतकऱ्यांकडूनही पैसे घेत आहेत. खोटे अहवाल तयार करुन या कंपन्यांनी गेल्या पाच-सहा वर्षात कोट्यवधी रुपये कमाविले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.डिजीटल इंडियाच्या गोष्टी तुम्ही करता मग शेतकऱ्यांना नोटकॅमचे फोटो कशाला काढायला लावता. सॅटेलाईट सर्व्हेक्षण करुन सरकगट नुकसान भरपाई झाल्याचे गृहित धरा व शेतकऱ्यांना मदत द्या, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तो एकदा खवळला तर तुमचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीagricultureशेतीagitationआंदोलनparabhaniपरभणी