शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनास यश, जिल्हाधिका-यांनी दिले स्वतंत्र विद्यार्थी बस सुरु करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 18:15 IST

केवळ विद्यार्थ्यांसाठी 'परभणी-पालम' ही बस स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी अचानक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले.

 परभणी, दि. 18 : केवळ विद्यार्थ्यांसाठी 'परभणी-पालम' ही बस स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी अचानक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनीही तात्काळ केवळ विद्यार्थ्यांसाठी बस सोडण्याचे आदेश दिले. 

परभणी आगारातून सुटणा-या 'परभणी- पालम' या बसमधून इतर प्रवास्यांसोबत धानोरा काळे, कळगाव वाडी, ताडकळस, सिरसकळस, बलसा, मिरखेल, पिंगळी या 7 गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी परभणी शहराकडे दररोज ये-जा करतात़. या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून विद्यार्थी पासेसही घेतल्या आहेत़. परंतु, या बसमधून कायम क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही़.  परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी उशिर होतो़. अनेक विद्यार्थ्यांचे यातून शैक्षणिक नुकसान होते.यावर विद्यार्थ्यांनी अनेकदा 'परभणी- पालम' ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु, यास यश आले नाही. शेवटी आज या 7 गावच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानी सकाळी ७़.३० ते १० असे जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन केले़.

आंदोलनास आले यशयावेळी विद्यार्थ्याच्या या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. यानंतर त्यांनी  एसटी महामंडळाच्या अधिका-यांना बोलावून घेतले. या प्रश्नांवर त्यांच्याकडून माहिती घेत जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांसमक्ष 'परभणी-पालम' ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सोडावी असे आदेश दिले़. यावर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सिरसाठ यांनी मंगळवारपासून बस उपलब्ध होईल असे आश्वासन दिले. बसची मागणी पूर्ण झाल्याची खात्री होताच यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले़. या आंदोलनात ऋषीकेश सुकनूर, मोनिका देशमुख, सचिन डहाळे, केदार पाठक, ऋषीकेश वाघमारे, सोहेल शेख, तान्हाजी घोडके, अशोक अंभोरे आदींसह ६० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 

प्रशासनाची उडाली धांदलविद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी अचानक ठिय्या आंदोलन केले़. त्यामुळे पोलीस कर्मचा-यांची चांगलीच धांदल उडाली़.पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला़ परंतु, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़.