शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनास यश, जिल्हाधिका-यांनी दिले स्वतंत्र विद्यार्थी बस सुरु करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 18:15 IST

केवळ विद्यार्थ्यांसाठी 'परभणी-पालम' ही बस स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी अचानक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले.

 परभणी, दि. 18 : केवळ विद्यार्थ्यांसाठी 'परभणी-पालम' ही बस स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी अचानक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनीही तात्काळ केवळ विद्यार्थ्यांसाठी बस सोडण्याचे आदेश दिले. 

परभणी आगारातून सुटणा-या 'परभणी- पालम' या बसमधून इतर प्रवास्यांसोबत धानोरा काळे, कळगाव वाडी, ताडकळस, सिरसकळस, बलसा, मिरखेल, पिंगळी या 7 गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी परभणी शहराकडे दररोज ये-जा करतात़. या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून विद्यार्थी पासेसही घेतल्या आहेत़. परंतु, या बसमधून कायम क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही़.  परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी उशिर होतो़. अनेक विद्यार्थ्यांचे यातून शैक्षणिक नुकसान होते.यावर विद्यार्थ्यांनी अनेकदा 'परभणी- पालम' ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु, यास यश आले नाही. शेवटी आज या 7 गावच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानी सकाळी ७़.३० ते १० असे जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन केले़.

आंदोलनास आले यशयावेळी विद्यार्थ्याच्या या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. यानंतर त्यांनी  एसटी महामंडळाच्या अधिका-यांना बोलावून घेतले. या प्रश्नांवर त्यांच्याकडून माहिती घेत जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांसमक्ष 'परभणी-पालम' ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सोडावी असे आदेश दिले़. यावर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सिरसाठ यांनी मंगळवारपासून बस उपलब्ध होईल असे आश्वासन दिले. बसची मागणी पूर्ण झाल्याची खात्री होताच यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले़. या आंदोलनात ऋषीकेश सुकनूर, मोनिका देशमुख, सचिन डहाळे, केदार पाठक, ऋषीकेश वाघमारे, सोहेल शेख, तान्हाजी घोडके, अशोक अंभोरे आदींसह ६० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 

प्रशासनाची उडाली धांदलविद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी अचानक ठिय्या आंदोलन केले़. त्यामुळे पोलीस कर्मचा-यांची चांगलीच धांदल उडाली़.पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला़ परंतु, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़.