शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

रोजगार हमी योजनेतून 129 हेक्टरवर फळबाग लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 16:26 IST

२०२०-२१  या वर्षासाठी जिल्ह्यात ५८४ हेक्टर क्षेत्रावर फळबागा लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

ठळक मुद्दे२१ लाख रुपये खर्चतीन तालुक्यातील एकानेही घेतला नाही लाभ

परभणी :  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत १२९ हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली असून या कामांवर आतापर्यंत २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने विविध शासकीय विभागांतून कामांचे नियोजन केले जाते. कृषी विभागांतर्गत फळबाग लागवडीची कामे या योजनेतून घेतली जातात. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळते. शिवाय फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. २०२०-२१  या वर्षासाठी जिल्ह्यात ५८४ हेक्टर क्षेत्रावर फळबागा लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट निर्माण झाले. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांनाही फटका बसला आहे. मध्यंतरी ४ ते ५ महिने ही कामे बंद होती.

सप्टेंबर महिना अखेर रोहयोतून फळबाग लागवड करण्यासाठी १ हजार ६४९ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. १ हजार ५७२ लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात केवळ १५४ लाभार्थ्यांनी फळबागांची लागवड केली आहे. सुमारे १२९ हेक्टर क्षेत्रावर या योजनेतून फळबाग लागवड करण्यात आली असून त्यावर  १ कोटी १८ लाख ५७ हजार रुपये अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक उद्दिष्ट लक्षात घेता फळबाग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रशासनाला प्राधान्याने कामे हाती घ्यावी लागणार आहेत. 

२१ लाखांचा खर्चरोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये २ लाख रुपये, मानवत तालुक्यामध्येे १४ लाख, पाथरी ३ लाख ९४ हजार, पूर्णा ९१ हजार आणि सोनपेठ तालुक्यात ७६ हजार रुपयांचा खर्च या योजनेवर झाला आहे. 

मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रतिसादरोहयोतून फळबाग लागवड योजनेला मानवत तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या तालुक्यासाठी केवळ ३५ हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात ७८ लाभार्थ्यांनी ७०.७० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. जिंतूर तालुक्यामध्ये १४.९५ हेक्टर, परभणी ३६.३० हेक्टर, पूर्णा ३, सेलू २.९ आणि सोनपेठ तालुक्यात १.८ हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड झाली आहे. गंगाखेड, पालम, पाथरी या तालुक्यात मात्र एकाही लाभार्थ्याने योजनेचा लाभ घेतला नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती