शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष क्षीण; जनतेलाच विरोधी भूमिका घ्यावी लागेल : जिग्नेश मेवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:55 IST

भाजपला देशात विरोधी पक्षच नको आहे आणि त्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत़

ठळक मुद्दे रोजगार देण्याऐवजी रोजगार हिसकावून घेतला जात आहेसर्वसामान्य नागरिकांनाही ईव्हीएमविषयी शंका

परभणी : काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्या भाजपला देशात विरोधी पक्षच नको आहे आणि त्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत़ विरोधी पक्ष क्षीण झाले असून, देशभरात नैराश्याचे वातावरण आहे़ त्यामुळे जनतेलाच आता विरोधी भूमिका घ्यावी लागेल, असे मत आ़ जिग्नेश मेवाणी यांनी येथे व्यक्त केले़ 

राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या माध्यमातून जिग्नेश मेवाणी यांनी ‘संविधान बचाव देश बचाओ’ या अभियानांतर्गत संविधान सन्मानयात्रा सुरू केली आहे़ मंगळवारी ही यात्रा परभणीत दाखल झाली़ या निमित्ताने आ़ जिग्नेश मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते़ मात्र प्रत्यक्षात त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे़ देशभरात मंदीची लाट आहे़ विविध कंपन्या रोजगार देण्याऐवजी असलेल्या कर्मचाऱ्यांना काढत आहेत़ त्यामुळे रोजगार देण्याऐवजी रोजगार हिसकावून घेतला जात आहे, ‘हेच का अच्छे दिन’  असा सवाल त्यांनी केला.

आ़ मेवाणी म्हणाले, ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी असल्याचा कुठलाही आधार नाही़ परंतु, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांनाही ईव्हीएमविषयी शंका निर्माण झाली आहे़ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामाणिक असतील तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले़ या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे जिल्हाध्यक्ष रवी सोनकांबळे, निवृत्ती सांगवे, निलेश देशभ्रतार, दिलीप साळवे, संजय टेकुळे, रोहिदास लांडगे आदींची उपस्थिती होती़ 

गुजरात मॉडेलच्या बहकाव्यात येऊ नयेगुजरात मॉडेलचा कांगावा केला जात आहे़ परंतु, या बहकाव्यात राज्यातील नागरिकांनी येऊ नये. २२ वर्षांत देशात ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी देणे घेणे नसल्याचे दिसत आहे़ या राज्यात संविधान मोडून काढणे आणि त्या जागी मनुस्मृतीचा अवलंब करणे ही एकमेव संघप्रणित कार्यप्रणाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला़  दाभोळकर यांची हत्या संविधान मूल्यांची हत्या आहे, असे सांगून राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन करणे, विज्ञानवादी विचार रुजविणे आणि विपक्ष म्हणून जनतेची जागृती करणे यासाठी ही यात्रा काढली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीparabhaniपरभणीBJPभाजपा