शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

परभणी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ ४०८ क्विंटल तुरीची खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:47 IST

नाफेड मार्फत जिल्ह्यातील चार हमीभाव खरेदी केंद्रांवर १३ फेब्रुवारीपर्यंत ५० शेतकर्‍यांची ४०८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. तर सेलू, गंगाखेड, बोरी हे तीन केंद्र सुरू होण्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही.

परभणी : नाफेड मार्फत जिल्ह्यातील चार हमीभाव खरेदी केंद्रांवर १३ फेब्रुवारीपर्यंत ५० शेतकर्‍यांची ४०८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. तर सेलू, गंगाखेड, बोरी हे तीन केंद्र सुरू होण्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही.

यावर्षी जिल्ह्यामध्ये  खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिकांची पेरणी केली. त्यानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद ही पिके शेतकर्‍यांच्या हातची गेली. त्यानंतर परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तूर पीक चांगले बहरले. त्यातून शेतकर्‍यांना चांगले उत्पादनही मिळाले. 

मात्र शेतकर्‍यांचा शेतमाल जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आल्यानंतर खाजगी व्यापार्‍यांनी कवडीमोल दराने शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संतप्त झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, जिंतूर, सेलू, गंगाखेड व बोरी या सहा ठिकाणी नाफेड मार्फत तर मानवत येथे विदर्भ फेडरेशनच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. 

या केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या ५ हजार ४५० रुपये या हमीभाव दराने तूर खरेदीस सुरुवात झाली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत परभणी केंद्रावर १०५ क्विंटल, पूर्णा येथील केंद्रावर ६५, जिंतूर २४ तर मानवत येथील केंद्रावर २१४ क्टिंल अशी एकूण जिल्ह्यातील सात केंद्रापैकी चार केंद्रवर ४०८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. सध्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तूर साठवण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष  देऊन हमीभाव खरेदी केंद्रावरील तूर खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. 

तीन केंद्रांना मिळेना मुुहूर्त जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार सात खरेदी केंद्रावर ८ हजार ४५ शेतकर्‍यांनी तूर विक्रीसाठी नोंदणीही केली आहे; परंतु, अद्यापपर्यंत केवळ चार ठिकाणचेच केंद्र सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड, बोरी या तीन केंद्रांवर ८ हजार ४५ शेतकर्‍यांपैकी सर्वाधिक ५ हजार ३५९ शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे; परंतु, अद्यापपर्यंत ही केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकर्‍यातून संताप व्यक्त होत आहे. 

तूर विक्रीसाठी ८ हजार शेतकर्‍यांनी केली नोंदणीखाजगी बाजारपेठेमध्ये शेतकर्‍यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील ८ हजार ४५ तूर उत्पादक शेतकर्‍यांनी आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये परभणी तूर खरेदी केंद्रावर ३९२ शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. परंतु, केवळ ७ शेतकर्‍यांचीच आतापर्यंत तूर खरेदी करण्यात आली आहे. पूर्णा ३२५, जिंतूर ७५६, सेलू २०००, गंगाखेड १ हजार ३८, बोरी २ हजार ३२१ तर मानवत खरेदी केंद्रावर १ हजार २१३ शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत केवळ ५० शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी