शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जिल्ह्यात केवळ १६ टक्केच पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना १२१३ कोटी २२ लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना ...

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना १२१३ कोटी २२ लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना दिले होते. परंतु, १७ जूनपर्यंत केवळ १६ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अद्यापही जवळपास ८५ टक्के पीक कर्ज वाटप बाकी आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना ७८१ कोटी ५८ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, या बँकांनी आतापर्यंत केवळ ४ हजार ९३२ शेतकऱ्यांना ४७ कोटी ४५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर खासगी बँकांना १०१ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकांनी आतापर्यंत केवळ ३३१ शेतकऱ्यांना ३ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत १७ जूनपर्यंत ३ टक्केच पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँकेने बँकेला १८७ कोटी ६३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट असताना खरीप हंगामाची पेरणी संपत आलेली असतानाही २ हजार १६० शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ कोटी ९० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे, तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या वतीने शाखेला १४२ कोटी ८३ लाख रुपये उद्दिष्ट या खरीप हंगामात देण्यात आले आहे. आतापर्यंत या बँकेने ३४ हजार ४१२ शेतकऱ्यांना १२४ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत सर्वाधिक ८७ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. १७ जूनपर्यंत जिल्ह्यात १ हजार ८३५ शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ १९५ कोटी ५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना याहीवर्षी उसनवारी करूनच आपली पेरणी पूर्ण करावी लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक बँकेत स्वतंत्र खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे,

बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँकेकडून कानाडोळा

यावर्षीच्या खरीप हंगामात व्यावसायिक बँकांमध्ये आत्तापर्यंत एसबीआय बँकेने ३ हजार ९४२ शेतकऱ्यांना ३६ कोटी ८५ लाख रुपयांचे वाटप केले आहे, तर दुसरीकडे बँक ऑफ इंडियाने केवळ ७ शेतकऱ्यांना ६ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे व्यावसायिक बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाकडून पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खासगी बँकांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक आयडीबीआय बँकेने १६५ शेतकऱ्यांना १ कोटी ५ लाख रुपयांचे वाटप केले आहे. एचडीएफसी बँकेने आतापर्यंत केवळ एका शेतकऱ्याला ७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे व्यावसायिक बँकेमध्ये बँक ऑफ इंडिया तर खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.