शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

एक हजार ८४३ कृषीपंप ग्राहक झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:18 IST

परभणी : जिल्ह्यातील एक हजार ८४३ कृषीपंप ग्राहकांनी ५८ लाख ९९ हजार रुपयांचा भरणा करत महाकृषी ऊर्जा अभियानात सहभाग ...

परभणी : जिल्ह्यातील एक हजार ८४३ कृषीपंप ग्राहकांनी ५८ लाख ९९ हजार रुपयांचा भरणा करत महाकृषी ऊर्जा अभियानात सहभाग नोंदविला. आता हे कृषीपंपधारक वीजवितरण कंपनीच्या थकबाकीतून मुक्त झाले आहेत.

परभणी मंडळांतर्गत असलेल्या ९६ हजार ८७० कृषीपंप ग्राहकांकडे सद्य:स्थितीत एक हजार ३८६ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी ग्राहकांकडून वसूल होत नसल्याने वीजवितरण कंपनीला वीजग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने कृषीपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महाकृषी ऊर्जा अभियान राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने जाहीर केले आहे. या धोरणानुसार जिल्ह्यातील ९६ हजार ८७० कृषीपंप वीजग्राहकांना आपले वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्य:स्थितीत एक हजार ३८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीमुळे निर्लखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण ५७४ कोटी १० लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहे. त्यामुळे या कृषीपंपधारकांनी उरलेल्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. या योजनेचा आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ८८३ कृषीपंपधारकांनी ५८ लाख ९९ हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे हे वीजग्राहक थकबाकीमुक्त झाले आहेत. यामुळे परभणी ग्रामीण उपविभागातील ३१६ कृषीपंपधारकांनी आठ लाख ३१ हजार, परभणी शहर उपविभागातील २९ कृषीपंपधारकांनी चार लाख २१ हजार, पाथरी उपविभागातील १८० जणांनी चार लाख ५२ हजार, पूर्णा उपविभागातील ३११ कृषीपंपधारकांनी नऊ लाख ६० हजार तर गंगाखेड उपविभागातील १६६ वीजग्राहकांनी आठ लाख ३१ हजार, जिंतूर उपविभागातील ३०१ वीजग्राहकांनी ६० लाख सात हजार तर मानवत उपविभागातील १२८ कृषीपंपधारकांनी दोन लाख ३७ हजार, पालम उपविभागातील २४१ कृषीपंपधारकांनी ११ लाख ९९ हजार रुपये, सेलू उपविभागातील १२७ जणांनी चार लाख २१ हजार तसेच सोनपेठ उपविभागातील ४४ कृषीपंपधारकांनी एक लाख ८९ हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

विशेष म्हणजे महाकृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषीपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचाही समावेश करण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंत्याचे जनसंपर्क अधिकाऱ्याकडे बोट

जिल्ह्यात एक हजार ८४३ कृषीपंपधारकांनी सहभाग घेत थकबाकीमुक्त झाले आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत आवश्यक तेवढा प्रचार व प्रचार या योजनेचा ग्रामीण भागात झालेला नाही. त्यामुळे इच्छुक असणारे शेतकरी या योजनेचा केवळ माहितीअभावी लाभ घेऊ शकत नाहीत. याबाबत अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व माहिती नांदेड येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून मिळेल, असे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात प्रचार व प्रसिद्धीसाठी येथील वीजवितरण कंपनीचे कसे नियोजन आहे, याबाबतची माहिती मिळू शकली नाही.