शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

एक लाख निराधारांना आधार प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात ...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात निराधार मंडळींची उपासमार होऊ नये, त्यांना आर्थिक अडचण जाणवू नये, या उद्देशाने प्रत्येक निराधाराच्या खात्यावर १ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख ५ हजार निराधार नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या श्रावण बाळ आणि वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी आहेत. ५२ हजार १७९ लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनेचा, तर ३५ हजार ८१ लाभार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे १८ हजार २ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा वेतन मिळते. या सर्व लाभार्थ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदतीचा आधार दिला आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच १ हजार रुपयांची मदत जमा होणार आहे. संचारबंदी आणि निर्बंधांमुळे लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये, या उद्देशाने ही मदत जाहीर करण्यात आली आहे.