शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

एक दिवसआड पाणीपुरवठा

By admin | Updated: November 6, 2014 13:57 IST

भारत निर्माण योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी असूनही केवळ नादुरुस्त जलवाहिनीमुळे ऐन हिवाळ्यात दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

 

दैठणा : येथील पाणीपुरवठा योजनेस घरघर लागली असून भारत निर्माण योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी असूनही केवळ नादुरुस्त जलवाहिनीमुळे ऐन हिवाळ्यात दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे दैठणेकरांच्या नशिबी भटकंती करण्याची वेळ आली आहे. 
गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांना दुपारपर्यंत भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल, याचीही चिंता दैठणेकरांना लागली आहे. मागील सात वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेंतर्गत सव्वाकोटी रुपये निधी मिळाला होता. साळापुरी येथील गोदावरी पात्रात भारत निर्माण योजनेंतर्गत विहिरीचे खोदकाम केले होते. 
या विहिरीला भरपूर पाणीही लागले. त्यामुळे विहिरीचे काम थांबले. त्यानंतर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने विहिरीतील पाणी गावापर्यंत पोहचू शकले नाही. ही जलवाहिनी वारंवार जागोजागी फुटत असल्याने या पाण्याचा उपयोग दैठणेकरांना झाला नाही. या जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्यासाठी सरपंच उद्धवरावकच्छवे, जिल्हा परिषदेचे सदस्य उत्तमराव कच्छवे हे प्रयत्नशील आहेत. भारत निर्माण योजनेची पाईप लाईन दुरुस्त करून हे पाणी ग्रामस्थांना मिळाले तर दैठणेकरांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो. (वार्ताहर)
■ भारत निर्माण योजनेचा बोजवारा उडाल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत एक दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा दैठणेकरांच्या नशिबी आल्यामुळे ग्रामस्थ या पाण्याची साठवण दिवसेंदिवस करीत आहेत. त्यामुळे या पाण्यामध्ये डासांचे प्रमाण वाढले असून आजाराला आमंत्रण असाच प्रकार येथे पहावयास मिळत आहे. तसेच पिण्यासाठी ग्रामस्थ गोदावरी नदीतील पाण्याचा उपयोग करीत असल्यामुळे हे पाणी क्षारयुक्त असल्याने ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.त्यामुळे ग्रा.पं. ने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
■ भारत निर्माण योजनेंतर्गत जलवाहिनीची दुरुस्ती करून आठ दिवसांमध्ये ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा केला करून नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दैठणा येथील सरपंच उद्धवराव कच्छवे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिले. पाणीपुरवठा सुरळीत करणार