शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसआड पाणीपुरवठा

By admin | Updated: November 6, 2014 13:57 IST

भारत निर्माण योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी असूनही केवळ नादुरुस्त जलवाहिनीमुळे ऐन हिवाळ्यात दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

 

दैठणा : येथील पाणीपुरवठा योजनेस घरघर लागली असून भारत निर्माण योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी असूनही केवळ नादुरुस्त जलवाहिनीमुळे ऐन हिवाळ्यात दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे दैठणेकरांच्या नशिबी भटकंती करण्याची वेळ आली आहे. 
गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांना दुपारपर्यंत भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल, याचीही चिंता दैठणेकरांना लागली आहे. मागील सात वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेंतर्गत सव्वाकोटी रुपये निधी मिळाला होता. साळापुरी येथील गोदावरी पात्रात भारत निर्माण योजनेंतर्गत विहिरीचे खोदकाम केले होते. 
या विहिरीला भरपूर पाणीही लागले. त्यामुळे विहिरीचे काम थांबले. त्यानंतर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने विहिरीतील पाणी गावापर्यंत पोहचू शकले नाही. ही जलवाहिनी वारंवार जागोजागी फुटत असल्याने या पाण्याचा उपयोग दैठणेकरांना झाला नाही. या जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्यासाठी सरपंच उद्धवरावकच्छवे, जिल्हा परिषदेचे सदस्य उत्तमराव कच्छवे हे प्रयत्नशील आहेत. भारत निर्माण योजनेची पाईप लाईन दुरुस्त करून हे पाणी ग्रामस्थांना मिळाले तर दैठणेकरांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो. (वार्ताहर)
■ भारत निर्माण योजनेचा बोजवारा उडाल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत एक दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा दैठणेकरांच्या नशिबी आल्यामुळे ग्रामस्थ या पाण्याची साठवण दिवसेंदिवस करीत आहेत. त्यामुळे या पाण्यामध्ये डासांचे प्रमाण वाढले असून आजाराला आमंत्रण असाच प्रकार येथे पहावयास मिळत आहे. तसेच पिण्यासाठी ग्रामस्थ गोदावरी नदीतील पाण्याचा उपयोग करीत असल्यामुळे हे पाणी क्षारयुक्त असल्याने ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.त्यामुळे ग्रा.पं. ने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
■ भारत निर्माण योजनेंतर्गत जलवाहिनीची दुरुस्ती करून आठ दिवसांमध्ये ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा केला करून नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दैठणा येथील सरपंच उद्धवराव कच्छवे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिले. पाणीपुरवठा सुरळीत करणार