शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

टीईटी पास नसलेल्या दीडशे शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

परभणी : जिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांची संख्या साधारणत: दीडशेच्या आसपास असून, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे या शिक्षकांची ...

परभणी : जिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांची संख्या साधारणत: दीडशेच्या आसपास असून, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.

शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (डी.एड्. सीईटी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने दाखल झालेल्या याचिका खंडपीठाने दोन दिवसांपूर्वी निकाली काढल्या आहेत. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली आहे. टीईटी उत्तीर्ण नसणारे किती शिक्षक जिल्ह्यात आहेत, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र शिक्षक संघटनांकडून मिळालेल्या अनधिकृत माहितीनुसार टीईटी उत्तीर्ण नसणारे साधारणत: दीडशे शिक्षक आहेत. या शिक्षकांसाठी आता न्यायालयीन लढाई लढली जात असून, त्यात काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील शिक्षक

टीईटी उत्तीर्ण नसलेले किती शिक्षक जिल्ह्यात आहेत, याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसली तरी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये असे दीडशे शिक्षक असल्याची माहिती शिक्षक संघटनांकडून मिळाली. त्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो. त्यामुळे या शिक्षकांच्या सेवा संरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

केंद्र शासनाने २०१० मध्ये टीईटीसंदर्भात निर्णय घेतला. राज्याने तो २०१३ मध्ये लागू केला. त्याची अंमलबजावणी २०१६ पासून केली जात आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना या निर्णयाची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे ते टीईटीपासून वंचित राहिले. न्यायालयानेही ३१ मार्च २०१९ पूर्वी टीईटी उत्तीर्ण असणाऱ्यांनाच संरक्षण दिले. २०१९ नंतरही अनेक शिक्षक टीईटी उत्तीर्ण आहेत. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षकांवर अन्याय झाला आहे.

- माधव लोखंडे, विभागीय सचिव, मुप्टा संघटना

टीईटीच्यासंदर्भात राज्य शासनाचे धोरण चुकीचे आहे. २०१३ आणि २०१६ मध्ये राज्य शासनाने टीईटी परीक्षाच घेतली नाही. त्यामुळे या दोन संधी शिक्षकांना परत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे या संधी देण्याची मागणी केली पाहिजे. जोपर्यंत या दोन संधी शिक्षकांना प्राप्त होत नाहीत. तोपर्यंत त्यांच्या सेवा संरक्षित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेणे आवश्यक आहे. या प्रकरणात राज्य सरकारने माणुसकीच्या भावनेतून पुढाकार घेणे आवश्यक आहे.

- धर्मराज शिंदे, जिल्हाध्यक्ष, मुप्टा संघटना

टीईटी उत्तीर्ण होण्याची संधी द्यावी

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका शिक्षकांना सहन करावा लागत आहे. एक तर केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी उशिराने झाली. प्रत्येकवेळी वेगवेगळे शासन आदेश काढण्यात आले. तसेच टीईटी उत्तीर्ण आवश्यक आहे, हे माहीत असताना, त्यांना नियुक्ती आदेश दिले कसे? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे एकट्या शिक्षकाचेच नुकसान होत नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होत आहे. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण होण्याची संधी देणे आवश्यक आहे.