शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय रस्त्याने काढला अधिकाऱ्यांचा घाम; पाहणीसाठी आलेल्या तहसीलदारांची गाडी चिखलात फसली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 13:23 IST

गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला.

ठळक मुद्देतीन तास पायपीट करून अधिकाऱ्यांनी घेतली ग्रामसभाग्रामसभा संपताच वीजपुरवठा खंडित

पूर्णा (परभणी )  : तालुक्यातील माहेर गावचा मुख्य रस्ता पाहण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रस्ता नसल्याने मंगळवारी ( दि 29 ) तीन किलोमीटर चिखल दगडाच्या रस्त्यातून पायी प्रवास करावा लागला. यावेळी तहसीलदारांची गाडी चिखलात फसल्याने चक्क ट्रॅक्टर लावून बाहेर काढावी लागली. ग्रामस्थांच्या रोजच्या जीवघेण्या समस्यांचा प्रत्येक्ष अनुभव यावेळी अधिकाऱ्यांना आला. 

ताडकळस परिसरात असलेल्या माहेर या गावच्या रस्त्याचा प्रश्न काही दिवसापूर्वी चव्हाट्यावर आला होता. या रस्त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ यांनी दखल घेतली. गावाला भेट घेऊन त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. तालुकास्तरीय सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थित 29 जून रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेसाठी जिल्हा परिषदचे उप कार्यकारी मुख्यधिकरी ओम प्रकाश यादव, तहसीलदार पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी अमित राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा साबळे, कार्यकारी अभियंता यमडवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे, तालुका कृषी अधिकारी तांबिले, विस्ताराधिकारी सूरेवाड, तलाठी अमदुरे यांच्यासह महावितरण आरोग्य विभागाचे अधिकारी माहेर गावाच्या दिशेने सकाळी निघाले. मात्र, गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा गावापासून तीन किलोमीटर अलीकडेच थांबवावा लागला. 

गावात जाणारा मुख्यरस्ता हा चिखलमय असल्याने वाहने पुढे जाऊ शकत नव्हते. याच रस्त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना तहसीलदार पल्लवी टेमकर यांची गाडी चिखलात फसली होती. काही वेळाने गावकऱ्यांच्या मदतीने ट्रॅक्टरच्या सहय्याने त्यांची गाडी बाहेर काढावी लागली. ग्रामसभेसाठी आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना तीन किलोमीटरचा चिखल दगडांचा रस्ता तुडवत माहेर गावामध्ये प्रवेश करावा लागला. गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला. गावकऱ्यांच्यावतीने उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत करून ग्रामसंवाद कार्यक्रमास सुरुवात झाली. ग्रामस्थांनी प्रमुख रस्त्याच्या मागणीसह पेयजल योजना, शाळा दुरुस्ती, स्वच्छता, आरोग्य सुविधा, अखंडित वीज पुरवठा याची मागणी केली. गावकऱ्यांना लवकरात लवकर सुविधा पुरवण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.  

ग्रामसभा संपताच वीजपुरवठा खंडितमाहेर गावाच्या रस्त्यासोबतच या गावातील वीजपुरवठा प्रश्नही महत्त्वाचा आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामसभेच्या दिवशी दिवसभर सुरळीत सुरू असलेला वीज पुरवठा अधिकारी गावाबाहेर जाताच खंडित करण्यात आला.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी