शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय रस्त्याने काढला अधिकाऱ्यांचा घाम; पाहणीसाठी आलेल्या तहसीलदारांची गाडी चिखलात फसली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 13:23 IST

गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला.

ठळक मुद्देतीन तास पायपीट करून अधिकाऱ्यांनी घेतली ग्रामसभाग्रामसभा संपताच वीजपुरवठा खंडित

पूर्णा (परभणी )  : तालुक्यातील माहेर गावचा मुख्य रस्ता पाहण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रस्ता नसल्याने मंगळवारी ( दि 29 ) तीन किलोमीटर चिखल दगडाच्या रस्त्यातून पायी प्रवास करावा लागला. यावेळी तहसीलदारांची गाडी चिखलात फसल्याने चक्क ट्रॅक्टर लावून बाहेर काढावी लागली. ग्रामस्थांच्या रोजच्या जीवघेण्या समस्यांचा प्रत्येक्ष अनुभव यावेळी अधिकाऱ्यांना आला. 

ताडकळस परिसरात असलेल्या माहेर या गावच्या रस्त्याचा प्रश्न काही दिवसापूर्वी चव्हाट्यावर आला होता. या रस्त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ यांनी दखल घेतली. गावाला भेट घेऊन त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. तालुकास्तरीय सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थित 29 जून रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेसाठी जिल्हा परिषदचे उप कार्यकारी मुख्यधिकरी ओम प्रकाश यादव, तहसीलदार पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी अमित राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा साबळे, कार्यकारी अभियंता यमडवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे, तालुका कृषी अधिकारी तांबिले, विस्ताराधिकारी सूरेवाड, तलाठी अमदुरे यांच्यासह महावितरण आरोग्य विभागाचे अधिकारी माहेर गावाच्या दिशेने सकाळी निघाले. मात्र, गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा गावापासून तीन किलोमीटर अलीकडेच थांबवावा लागला. 

गावात जाणारा मुख्यरस्ता हा चिखलमय असल्याने वाहने पुढे जाऊ शकत नव्हते. याच रस्त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना तहसीलदार पल्लवी टेमकर यांची गाडी चिखलात फसली होती. काही वेळाने गावकऱ्यांच्या मदतीने ट्रॅक्टरच्या सहय्याने त्यांची गाडी बाहेर काढावी लागली. ग्रामसभेसाठी आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना तीन किलोमीटरचा चिखल दगडांचा रस्ता तुडवत माहेर गावामध्ये प्रवेश करावा लागला. गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला. गावकऱ्यांच्यावतीने उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत करून ग्रामसंवाद कार्यक्रमास सुरुवात झाली. ग्रामस्थांनी प्रमुख रस्त्याच्या मागणीसह पेयजल योजना, शाळा दुरुस्ती, स्वच्छता, आरोग्य सुविधा, अखंडित वीज पुरवठा याची मागणी केली. गावकऱ्यांना लवकरात लवकर सुविधा पुरवण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.  

ग्रामसभा संपताच वीजपुरवठा खंडितमाहेर गावाच्या रस्त्यासोबतच या गावातील वीजपुरवठा प्रश्नही महत्त्वाचा आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामसभेच्या दिवशी दिवसभर सुरळीत सुरू असलेला वीज पुरवठा अधिकारी गावाबाहेर जाताच खंडित करण्यात आला.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी