शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राष्टÑवादीत लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:17 IST

लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले़ यावरून वादावादीही झाल्याचे समजते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले़ यावरून वादावादीही झाल्याचे समजते़लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पक्षाचे अध्यक्ष खा़ शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ़ जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ.सुनील तटकरे, माजीमंत्री फौजिया खान यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती़यावेळी परभणी लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची नावे सांगण्याबाबत जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांना आवाहन करण्यात आले़ यावेळी दुर्राणी यांनी पहिल्या क्रमांकावर आ़ विजय भांबळे यांचे तर दुसऱ्या क्रमांकावर माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर यांचे नाव सांगितले़ या दोघांपैकी एकास संधी दिल्यास राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे, असे आ़ दुर्राणी म्हणाले़यावेळी विटेकर यांनीही आपण स्वत: लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले़ या दृष्टीकोणातून आपण तयारी केली असून, संधी दिल्यास परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात खेचून आणू, असे त्यांनी यावेळी सांगितले़यावेळी माजी खा़ सुरेश जाधव यांनी आपण स्वत: लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले़ याशिवाय माजी खा़ गणेश दुधगावकर यांनीही पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले़माजी महापौर प्रताप देशमुख यांनी मुस्लीम उमेदवारास संधी देण्याची मागणी केली़ तर परभणी महानगराध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांनी बाळासाहेब जामकर यांच्या नावाची शिफारस केली़ यावेळी उमेदवारीच्या मागणीवरून व शिफारशीवरून बरीच खडाजंगी झाल्याची चर्चा आहे़शिवसेना-भाजपाच्या युतीवर : बरेच काही अवलंबूनपरभणी लोकसभा मतदार संघावर गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे़ प्रत्येक निवडणूक शिवसेनेने भाजपाशी युती करूनच जिंकली आहे़ २०१४ च्या निवडणुकीतही शिवसेनेच्या विजयात भाजपाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे़ आता राज्यस्तरावर शिवसेनेकडून स्वबळाची भाषा केली जात आहे़ त्यामुळे लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढल्यास निकालाचे चित्र वेगळे असू शकते़ भाजपनेही लोकसभा निवडणुकीची तयारी यापूर्वीपासूनच सुरू केली आहे़ या अनुषंगाने पक्षाच्या लोकसभा प्रभारींनी दोन-तीन वेळा कार्यकर्त्यांचे शिबिरेही घेतली आहे़ असे असले तरी शिवसेनेसोबत युती करण्यातच भाजपाला रस आहे़ त्यामुळे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होईल, असे राजकीय जाणकारांना वाटते़ त्यामुळे या निवडणुकीत विजय मिळविणे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या उमेदवारांना सोपे नाही़ सर्व बाजुंनी विचार करूनच राष्ट्रवादीला उमेदवार द्यावा लागणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकसभा मतदार संघातील ३ विधानसभा मतदार संघ असून, शिवसेनेकडे फक्त एकच विधानसभा मतदारसंघ आहे़ दोन मतदार संघात सध्या भाजपाचे वर्चस्व आहे़ असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र नेहमी शिवसेनेचाच वरचष्मा राहिला आहे़ त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची गणिते मांडताना आघाडीच्या उमेदवारांना बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईElectionनिवडणूक