शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

राष्टÑवादीत लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:17 IST

लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले़ यावरून वादावादीही झाल्याचे समजते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले़ यावरून वादावादीही झाल्याचे समजते़लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पक्षाचे अध्यक्ष खा़ शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ़ जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ.सुनील तटकरे, माजीमंत्री फौजिया खान यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती़यावेळी परभणी लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची नावे सांगण्याबाबत जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांना आवाहन करण्यात आले़ यावेळी दुर्राणी यांनी पहिल्या क्रमांकावर आ़ विजय भांबळे यांचे तर दुसऱ्या क्रमांकावर माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर यांचे नाव सांगितले़ या दोघांपैकी एकास संधी दिल्यास राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे, असे आ़ दुर्राणी म्हणाले़यावेळी विटेकर यांनीही आपण स्वत: लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले़ या दृष्टीकोणातून आपण तयारी केली असून, संधी दिल्यास परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात खेचून आणू, असे त्यांनी यावेळी सांगितले़यावेळी माजी खा़ सुरेश जाधव यांनी आपण स्वत: लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले़ याशिवाय माजी खा़ गणेश दुधगावकर यांनीही पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले़माजी महापौर प्रताप देशमुख यांनी मुस्लीम उमेदवारास संधी देण्याची मागणी केली़ तर परभणी महानगराध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांनी बाळासाहेब जामकर यांच्या नावाची शिफारस केली़ यावेळी उमेदवारीच्या मागणीवरून व शिफारशीवरून बरीच खडाजंगी झाल्याची चर्चा आहे़शिवसेना-भाजपाच्या युतीवर : बरेच काही अवलंबूनपरभणी लोकसभा मतदार संघावर गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे़ प्रत्येक निवडणूक शिवसेनेने भाजपाशी युती करूनच जिंकली आहे़ २०१४ च्या निवडणुकीतही शिवसेनेच्या विजयात भाजपाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे़ आता राज्यस्तरावर शिवसेनेकडून स्वबळाची भाषा केली जात आहे़ त्यामुळे लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढल्यास निकालाचे चित्र वेगळे असू शकते़ भाजपनेही लोकसभा निवडणुकीची तयारी यापूर्वीपासूनच सुरू केली आहे़ या अनुषंगाने पक्षाच्या लोकसभा प्रभारींनी दोन-तीन वेळा कार्यकर्त्यांचे शिबिरेही घेतली आहे़ असे असले तरी शिवसेनेसोबत युती करण्यातच भाजपाला रस आहे़ त्यामुळे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होईल, असे राजकीय जाणकारांना वाटते़ त्यामुळे या निवडणुकीत विजय मिळविणे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या उमेदवारांना सोपे नाही़ सर्व बाजुंनी विचार करूनच राष्ट्रवादीला उमेदवार द्यावा लागणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकसभा मतदार संघातील ३ विधानसभा मतदार संघ असून, शिवसेनेकडे फक्त एकच विधानसभा मतदारसंघ आहे़ दोन मतदार संघात सध्या भाजपाचे वर्चस्व आहे़ असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र नेहमी शिवसेनेचाच वरचष्मा राहिला आहे़ त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची गणिते मांडताना आघाडीच्या उमेदवारांना बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईElectionनिवडणूक